शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

पाणी तुंबल्याने व्यावसायिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शहरातील काही प्रमुख गटारींवरील पक्के अतिक्रमण व साफ-सफाई अभावी गुरूवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शहरातील काही प्रमुख गटारींवरील पक्के अतिक्रमण व साफ-सफाई अभावी गुरूवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी हुतात्मा चौक बाजारपेठ व बसस्थानक परिसरात प्रचंड पाणी तुंबले होते. परिणामी येथील रहदारीदेखील प्रभावीत झाली होती. दरवर्षी पावसाळ्यात हा प्रकार नेहमीच घडत असतो. मात्र पालिका त्यावर ठोस कार्यवाही करायला पुढे येत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, या प्रकरणी पदाधिकारी व प्रशासनाने उदासिनता झटकण्याची अपेक्षा आहे.गुरूवारी रात्री शहराबरोबरच संपूर्ण तालुक्यात मुसळधार पावसाने  हजेरी लावली होती. संपूर्ण रात्रभर जोरदार झालेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी सखलभागात पाणी साचले होते. त्यातही कॉलेज रस्त्याकडून येणारे पाणी स्मारक चौक, तहसील परिसर, बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात साचले होते.अक्षरश: या परिसराला एखाद्या नदीचे स्वरूप आले होते. त्यामुळे येथील रहदारीदेखील प्रभावीत झाली होती. काही दुकानांमध्ये पाणी शिरून किरकोळ नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. याशिवाय बसस्थानक परिसरातही रस्त्यावर पाणी आले होते. त्यामुळे व्यावसायिकांबरोबर पादचारी व वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. शुक्रवारी बाजार पेठेचा दिवस होता. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे मोठय़ा प्रमाणात हाल झाले. याशिवाय बाहेरील व्यावसायिकांनी लोणचाच्या कै:या विक्रीसाठी आणल्या होत्या. सकाळी पुन्हा कॉलेज रस्त्यावरून पाणी आल्यामुळे त्यांच्या कै:याही वाहून गेल्याची व्यथा व्यावसायिकांनी बोलून दाखविली होती. बस स्थानक व कॉलेज रस्त्याकडील मुख्य गटारींमध्ये प्रचंड गाळ साचला आहे. शिवाय गटारींवरील पक्के अतिक्रमणामुळेच पावसाचे पाणी साचल्याचे नागरिक सांगतात. वास्तविक पावसाळ्यापूर्वी या गटारींची साफ-सफाई होणे अपेक्षित असतांना त्याकडे गांभीर्याने लक्ष घातले जात नसल्याचा आरोप आहे. कॉलेज रोड, स्मारक चौक व बसस्थानक रोडकडील गटारींवर व्यावसायिकांनी पक्के अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणाबाबत कधीच ठोस कार्यवाही केली जात नसल्यामुळे त्यांचे फावत आहे. परंतु पावसाळ्यात शहरवासीयांना अडचणींचा सामना करावा लागत असतो. जिल्हा प्रशासनाने तरी या प्रकरणी ठोस भूमिका घेण्याची नागरिकांची मागणी आहे.दरम्यान ही परिस्थिती लक्षात घेऊन पालिकेने जेसीबीद्वारे गटारींची साफ-सफाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. नवापूरहळदाणी, ता.नवापूर परिसरात गुरुवारी व शुक्रवारी पावसाने हजेरी लावल्याने खरीपला काही अंशी त्याचा फायदा होणार असल्याने दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. 4गेल्या आठवडय़ात जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे विकास कामांच्या पाहणीसाठी तळोदा तालुक्याच्या दौ:यावर आले होते. त्यावेळी त्यांनी तळोदा पालिकेस भेट दिली होती. पालिकेत त्यांच्या हस्ते अपंगांना सायकलींचे वाटप करण्यात आले होते. या वेळी प्रभाग एक मधील नागरिकांनी गटारींची साफ-सफाईचा मुद्दा उपस्थित केला होता. याप्रसंगी प्रशासनाने गटारींवरील अतिक्रमणामुळे सफाई कर्मचा:यांना गटारीतील गाळ काढतांना अडचणी निर्माण होत असल्याचे कारण सांगितले होते. परंतु साफ-सफाईबाबत पालिकेची ही अडचण खरी असली तरी गटारींवरील वाढलेल्या अतिक्रमणाबाबत कठोर भूमिका घेण्याची ही आवश्यकता आहे. तरच अतिक्रमणाची शहरवासीयांची डोके दुखी दूर होणार आहे. याबाबत पालिका पदाधिका:यांनीदेखील आपली राजकीय अनास्था बाजूला सारली पाहिजे.