शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पाणी तुंबल्याने व्यावसायिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शहरातील काही प्रमुख गटारींवरील पक्के अतिक्रमण व साफ-सफाई अभावी गुरूवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शहरातील काही प्रमुख गटारींवरील पक्के अतिक्रमण व साफ-सफाई अभावी गुरूवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी हुतात्मा चौक बाजारपेठ व बसस्थानक परिसरात प्रचंड पाणी तुंबले होते. परिणामी येथील रहदारीदेखील प्रभावीत झाली होती. दरवर्षी पावसाळ्यात हा प्रकार नेहमीच घडत असतो. मात्र पालिका त्यावर ठोस कार्यवाही करायला पुढे येत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, या प्रकरणी पदाधिकारी व प्रशासनाने उदासिनता झटकण्याची अपेक्षा आहे.गुरूवारी रात्री शहराबरोबरच संपूर्ण तालुक्यात मुसळधार पावसाने  हजेरी लावली होती. संपूर्ण रात्रभर जोरदार झालेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी सखलभागात पाणी साचले होते. त्यातही कॉलेज रस्त्याकडून येणारे पाणी स्मारक चौक, तहसील परिसर, बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात साचले होते.अक्षरश: या परिसराला एखाद्या नदीचे स्वरूप आले होते. त्यामुळे येथील रहदारीदेखील प्रभावीत झाली होती. काही दुकानांमध्ये पाणी शिरून किरकोळ नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. याशिवाय बसस्थानक परिसरातही रस्त्यावर पाणी आले होते. त्यामुळे व्यावसायिकांबरोबर पादचारी व वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. शुक्रवारी बाजार पेठेचा दिवस होता. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे मोठय़ा प्रमाणात हाल झाले. याशिवाय बाहेरील व्यावसायिकांनी लोणचाच्या कै:या विक्रीसाठी आणल्या होत्या. सकाळी पुन्हा कॉलेज रस्त्यावरून पाणी आल्यामुळे त्यांच्या कै:याही वाहून गेल्याची व्यथा व्यावसायिकांनी बोलून दाखविली होती. बस स्थानक व कॉलेज रस्त्याकडील मुख्य गटारींमध्ये प्रचंड गाळ साचला आहे. शिवाय गटारींवरील पक्के अतिक्रमणामुळेच पावसाचे पाणी साचल्याचे नागरिक सांगतात. वास्तविक पावसाळ्यापूर्वी या गटारींची साफ-सफाई होणे अपेक्षित असतांना त्याकडे गांभीर्याने लक्ष घातले जात नसल्याचा आरोप आहे. कॉलेज रोड, स्मारक चौक व बसस्थानक रोडकडील गटारींवर व्यावसायिकांनी पक्के अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणाबाबत कधीच ठोस कार्यवाही केली जात नसल्यामुळे त्यांचे फावत आहे. परंतु पावसाळ्यात शहरवासीयांना अडचणींचा सामना करावा लागत असतो. जिल्हा प्रशासनाने तरी या प्रकरणी ठोस भूमिका घेण्याची नागरिकांची मागणी आहे.दरम्यान ही परिस्थिती लक्षात घेऊन पालिकेने जेसीबीद्वारे गटारींची साफ-सफाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. नवापूरहळदाणी, ता.नवापूर परिसरात गुरुवारी व शुक्रवारी पावसाने हजेरी लावल्याने खरीपला काही अंशी त्याचा फायदा होणार असल्याने दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. 4गेल्या आठवडय़ात जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे विकास कामांच्या पाहणीसाठी तळोदा तालुक्याच्या दौ:यावर आले होते. त्यावेळी त्यांनी तळोदा पालिकेस भेट दिली होती. पालिकेत त्यांच्या हस्ते अपंगांना सायकलींचे वाटप करण्यात आले होते. या वेळी प्रभाग एक मधील नागरिकांनी गटारींची साफ-सफाईचा मुद्दा उपस्थित केला होता. याप्रसंगी प्रशासनाने गटारींवरील अतिक्रमणामुळे सफाई कर्मचा:यांना गटारीतील गाळ काढतांना अडचणी निर्माण होत असल्याचे कारण सांगितले होते. परंतु साफ-सफाईबाबत पालिकेची ही अडचण खरी असली तरी गटारींवरील वाढलेल्या अतिक्रमणाबाबत कठोर भूमिका घेण्याची ही आवश्यकता आहे. तरच अतिक्रमणाची शहरवासीयांची डोके दुखी दूर होणार आहे. याबाबत पालिका पदाधिका:यांनीदेखील आपली राजकीय अनास्था बाजूला सारली पाहिजे.