शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान उज्वला योजनेचा शुभारंभ

By admin | Updated: March 7, 2017 23:26 IST

अक्कलकुवा : तालुक्यात आज खासदार डॉ़ हिना गावीत यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे उदघाटन करण्यात आले़

अक्कलकुवा : तालुक्यात आज खासदार डॉ़ हिना गावीत यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे उदघाटन करण्यात आले़ या               वेळी पंतप्रधान उज्वला योजनेचा शुभारंभ ब्राम्हणगाव येथून करण्यात आला़या वेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, सरचिटणीस डॉक़ांतीलाल टाटीया, मांगीलाल जैन, जयमल पाडवी,   अजय पटेल, पंचायत समिती            सदस्या कविता कामे, मनोज डागा,  प्रा़ दिनेश खरात, सुरेशचंद जैन, योगेश सोनार, जि़प़ सदस्य           किरेसिंग वसावे, तालुकाध्यक्ष घनश्याम पाडवी, कपिल चौधरी जयेश चौधरी, संगिता कुमावत,चंपाबाई वळवी, योगेंद्र दोरकर आदी उपस्थित होते़ अक्कलकुवा तालुक्यात ११           रस्त्यांच्या कामांची उद्घाटने           तसेच देशातील उज्वला योजनेचा शुभारंभ ब्राम्हणगाव येथे करण्यात आला़ या वेळी डॉ़ गावीत म्हणाल्या की लवकरच गावात पंतप्रधान   आवास योजनेची कामे सुरु करण्यात येणार आहेत़ तसेच ज्यांची                  गॅस योजनेचा लाभ घेतला असेल त्यांनाही पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले़आदिवासी महिलांचे आरोग्य चांगले रहावे व त्यांचे कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यासाठी आपण विविध योजना राबविणार असल्याचेही खा़ डॉ़ गावीत            यांनी सांगितले़ दरम्यान, कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य किरेसिंग            वसावे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस                 डॉ़ कांतीलाल टाटीया, नागेश            पाडवी आदींनीदेखील विविध विषयांवर मार्गदर्शन केले़ कार्यक्रम यशस्वीतेसाठी इंडियन गॅसचे संचालक देविलाल भंसाली, राहुल चव्हाण, संदिप भंसाली            आदींनी परिश्रम घेतले़ या वेळी देशातील पहिली लाभार्थी हावडूबाई वसावे, ब्राम्हणगावचे सरपंच जितेंद्र वसावे, उपसरपंच अनवर वसावे, अजबसिंग महाराज, सिंधूबाई वसावे, जगदिश चित्रकथी आदी उपस्थित होते़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललीत जाट यांनी तर आभार प्रा़ दिनेश खरात यांनी मानले़दरम्यान, योजनेचा लाभ घेण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित होते़ (वार्ताहर)योजनेसाठी पंतप्रधानांकडे पाठपुरावा- खा़डॉ़ गावीतआमदार डॉ़ विजयकुमार गावीत आदिवासी विकासमंत्री असताना आदिवासींना गॅस कनेक्शन ही योजना सुरु करण्यात आली होती़ मात्र त्यावेळी विरोधकांनी ही योजना बंद करण्यासाठी तक्रारी करण्यास सुरुवात करुन योजना बंद पाडली़ परंतु सध्या केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे़ आपण पंतप्रधानांकडे पाठपुरावा करुन पंतप्रधान उज्वला योजना  सुरु केली असून त्याचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळवून देऊ असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला़ आदिवासी दुर्गम भागातील ग्रामस्थांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी केंद्रसरकारकडे प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही या वेळी खासदार डॉ़ हिना गावीत यांनी सागितले़