शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

साखरेपेक्षा गूळच खातोय भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:21 IST

साखरेच्या किमती कमी असल्यातरी गुळाचा वापर जास्त वाढत चालला आहे. कारण गूळ नैसर्गिक पद्धतीने तयार करण्यात येत असल्याने त्यामुळे ...

साखरेच्या किमती कमी असल्यातरी गुळाचा वापर जास्त वाढत चालला आहे. कारण गूळ नैसर्गिक पद्धतीने तयार करण्यात येत असल्याने त्यामुळे विविध आजारांवर उपायकारक ठरत आहे. मधुमेह, स्थूलपणा यासह अनेक आजारांसाठी उपयुक्त असल्याने गुळाचा वापर वाढत आहे.

गुळाचा चहा बनला स्टेटस

ऊस गोड वाटला तर मुळासकट खाऊ नये, अशी म्हण आहे. परंतु गूळ हा उसापासून तयार केला जातो. दरम्यान, साखरेपेक्षा गुळालाच भाव अधिक, असे दिसून येत आहे. गत दोन दशकांच्या आकडेवारीवर नजर घातल्यास साखरेपेक्षा गुळाचे भाव जास्त आहेत.

पारंपरिक गुळाचा वापर होत असताना साखर कारखान्यातून निर्मिती होत असल्याने सुरुवातीच्या काळात साखरेची कमी भावाने विक्री होऊ लागल्याने लोकांना साखरेची सवय लागली. त्यामुळे साखरेचा वापर जास्त झाल्याने मध्यंतरी साखरेला जास्त भाव मिळू लागला होता. त्यामुळे गुळाच्या किमती कमी झाल्याने गूळ खरेदीला प्राध्यान्य मिळू लागले होते.

नव्वदीच्या काळात गूळ पारंपरिक पद्धतीने काढण्यात येत नसल्यानेे, चांगला प्रतिचा गूळ मिळत नसल्याने गुळाला दर कमी मिळू लागल्याने गुळाला गरिबीचे लक्षण समजले जाऊ लागले होते. तसेच गरिबांना पारंपरिक गूळ वापरण्याची सवय असल्याने साखरेच्या वापरा उशिरा चालना मिळाली.

सुरुवातीच्या काळात साखर स्वस्त मिळत असल्याने लोकांना त्यांची सवय लागली होती. त्यामुळे साखरेचा वापर वाढल्याने किमती वाढल्या मध्यातरी गुळाच्या किमती कमी असल्याने गूळ वापराला प्राधान्य मिळू लागल्याने गुळाच्या किमती वाढू लागल्या आहेत.

- सुभाष पाटील, दुकानदार

सीझनमध्ये गुळाला अधिक मागणी असते. मात्र, त्या तुलनेने साखरेचाही खप अधिक आहे. आता काळानुरूप बदल होत असला तरी अनेकजण गुळाचा चहा प्यायला लागल्याचेही सांगतात. दरम्यान, शहरातील बाजारपेठेत गुळाचे भाव वधारले आहेत.

वर्षामध्ये सीझननुसार गुळाला अधिक मागणी होत असते. मात्र त्या तुलनेत साखरेची विक्री जास्त प्रमाणात होत असली तरी काळानुरूप बदल होत असल्याने अनेक जणांना गुळाचा चहा प्यायला लागल्याने त्यादरम्यान शहरातील बाजारपेठेतच गुळाचे भाव वाढताना दिसून येत आहेत.

- राजू ओसवाल, दुकानदार

गावात मात्र साखरच

ग्रामीण भागात गुळाच्या किमती कमी असताना गुळाचा खप होता. मात्र गुळाच्या किमती साखरेच्या पुढे गेल्याने ग्रामीण भागात साखरेचा खप जास्त होऊ लागला आहे. साखरेच्या आणि गुळाच्या किमतीत १५ ते २० रुपयांचा फरक येत असल्याने सध्या गावात साखरेची खरेदी जास्त होताना दिसून येत आहे.

- युवराज अग्रवाल, दुकानदार