शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

जिल्ह्यात पुन्हा पावसाची रिपरिप दोन दिवस मुसळधारचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पुन्हा पावसाची रिपरिप सुरू आहे.दरम्यान, तापीच्या पाण्याची पातळी स्थिर आहे. येत्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पुन्हा पावसाची रिपरिप सुरू आहे.दरम्यान, तापीच्या पाण्याची पातळी स्थिर आहे. येत्या दोन दिवसात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात जुलैचा शेवटचा व ऑगस्ट महिन्याचा पहिल्या आठवडय़ात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे सर्वच नदी, नाल्यांना पूर आला होता. एक हजारापेक्षा अधीक घरांची पडझड झाली होती तर  सहा हजार हेक्टरपेक्षा अधीक शेतीचे नुकसान झाले होते. जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता. जेमतेम गेल्या आठवडय़ात रस्त्याची डागडुजी करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. त्यातच पुन्हा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे   प्रशासनाने पुन्हा सतर्कता बाळगली आहे. दिवसभर पावसाची रिपरिपसोमवारी पहाटेपासूनच जिल्ह्यातील सर्वच भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. नंदुरबार, तळोदा व शहादा तालुक्यातील अनेक भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे जनजिवनावर त्याचा परिणाम दिसून आला. येत्या 24 तासात जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.शेती कामांना पुन्हा ब्रेकसतत तीन आठवडे पावसाची संततधार राहिल्यामुळे शेती कामांना ब्रेक मिळाला होता. परिणामी शेतांमध्ये तण वाढले होते. निंदणी व कोळपणीसारखी कामे करता आली नव्हती. वेळेवर खतांचा व किटकनाशकांचा मात्रा देखील देता आला नव्हता. गेल्या आठवडाभरापासून पावसाने विश्रांती घेवून ब:यापैकी ऊन देखील पडले होते. त्यामुळे शेतक:यांनी जास्तीत जास्त आंतरमशागतीच्या कामांना वेग दिला होता. परिणामी शेती कामांना मजूर देखील मिळत नव्हते. अशातच पुन्हा पावसाची संततधार सुरू झाल्याने शेती कामांना ब्रेक लागला आहे.प्रशासन सतर्कजिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. सर्व अधिकारी व कर्मचा:यांना मुख्यालयी थांबण्याच्या सुचना जिल्हाधिका:यांना देण्यात आल्या आहेत. नदी काठच्या     गावांना दवंडीद्वारे माहिती देण्यात येत आहे. 

हतनूर धरण पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन 26 ऑगस्ट रोजी पहाटे एक वाजता धरणाचे सर्व 36 गेट पुर्ण उघडून सुमारे एक लाख 92 हजार क्युसेक्स प्रवाह तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे सारंगखेडा बॅरेजचे 15 गेट पुर्ण उघडण्यात आले असून सुमारे एक लाख 28 हजार क्युसेक्स, तर प्रकाशा बॅरेजचे आठ गेट पुर्ण उघडण्यात येऊन एक लाख 44 हजार क्युसेक्स पाणी तापी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. तापी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे व नदी काठावार थांबू नये, असे जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे.