शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

जिल्ह्यात पुन्हा पावसाची रिपरिप दोन दिवस मुसळधारचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पुन्हा पावसाची रिपरिप सुरू आहे.दरम्यान, तापीच्या पाण्याची पातळी स्थिर आहे. येत्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पुन्हा पावसाची रिपरिप सुरू आहे.दरम्यान, तापीच्या पाण्याची पातळी स्थिर आहे. येत्या दोन दिवसात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात जुलैचा शेवटचा व ऑगस्ट महिन्याचा पहिल्या आठवडय़ात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे सर्वच नदी, नाल्यांना पूर आला होता. एक हजारापेक्षा अधीक घरांची पडझड झाली होती तर  सहा हजार हेक्टरपेक्षा अधीक शेतीचे नुकसान झाले होते. जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता. जेमतेम गेल्या आठवडय़ात रस्त्याची डागडुजी करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. त्यातच पुन्हा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे   प्रशासनाने पुन्हा सतर्कता बाळगली आहे. दिवसभर पावसाची रिपरिपसोमवारी पहाटेपासूनच जिल्ह्यातील सर्वच भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. नंदुरबार, तळोदा व शहादा तालुक्यातील अनेक भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे जनजिवनावर त्याचा परिणाम दिसून आला. येत्या 24 तासात जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.शेती कामांना पुन्हा ब्रेकसतत तीन आठवडे पावसाची संततधार राहिल्यामुळे शेती कामांना ब्रेक मिळाला होता. परिणामी शेतांमध्ये तण वाढले होते. निंदणी व कोळपणीसारखी कामे करता आली नव्हती. वेळेवर खतांचा व किटकनाशकांचा मात्रा देखील देता आला नव्हता. गेल्या आठवडाभरापासून पावसाने विश्रांती घेवून ब:यापैकी ऊन देखील पडले होते. त्यामुळे शेतक:यांनी जास्तीत जास्त आंतरमशागतीच्या कामांना वेग दिला होता. परिणामी शेती कामांना मजूर देखील मिळत नव्हते. अशातच पुन्हा पावसाची संततधार सुरू झाल्याने शेती कामांना ब्रेक लागला आहे.प्रशासन सतर्कजिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. सर्व अधिकारी व कर्मचा:यांना मुख्यालयी थांबण्याच्या सुचना जिल्हाधिका:यांना देण्यात आल्या आहेत. नदी काठच्या     गावांना दवंडीद्वारे माहिती देण्यात येत आहे. 

हतनूर धरण पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन 26 ऑगस्ट रोजी पहाटे एक वाजता धरणाचे सर्व 36 गेट पुर्ण उघडून सुमारे एक लाख 92 हजार क्युसेक्स प्रवाह तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे सारंगखेडा बॅरेजचे 15 गेट पुर्ण उघडण्यात आले असून सुमारे एक लाख 28 हजार क्युसेक्स, तर प्रकाशा बॅरेजचे आठ गेट पुर्ण उघडण्यात येऊन एक लाख 44 हजार क्युसेक्स पाणी तापी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. तापी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे व नदी काठावार थांबू नये, असे जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे.