शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पुन्हा पावसाची रिपरिप दोन दिवस मुसळधारचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पुन्हा पावसाची रिपरिप सुरू आहे.दरम्यान, तापीच्या पाण्याची पातळी स्थिर आहे. येत्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पुन्हा पावसाची रिपरिप सुरू आहे.दरम्यान, तापीच्या पाण्याची पातळी स्थिर आहे. येत्या दोन दिवसात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात जुलैचा शेवटचा व ऑगस्ट महिन्याचा पहिल्या आठवडय़ात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे सर्वच नदी, नाल्यांना पूर आला होता. एक हजारापेक्षा अधीक घरांची पडझड झाली होती तर  सहा हजार हेक्टरपेक्षा अधीक शेतीचे नुकसान झाले होते. जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता. जेमतेम गेल्या आठवडय़ात रस्त्याची डागडुजी करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. त्यातच पुन्हा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे   प्रशासनाने पुन्हा सतर्कता बाळगली आहे. दिवसभर पावसाची रिपरिपसोमवारी पहाटेपासूनच जिल्ह्यातील सर्वच भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. नंदुरबार, तळोदा व शहादा तालुक्यातील अनेक भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे जनजिवनावर त्याचा परिणाम दिसून आला. येत्या 24 तासात जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.शेती कामांना पुन्हा ब्रेकसतत तीन आठवडे पावसाची संततधार राहिल्यामुळे शेती कामांना ब्रेक मिळाला होता. परिणामी शेतांमध्ये तण वाढले होते. निंदणी व कोळपणीसारखी कामे करता आली नव्हती. वेळेवर खतांचा व किटकनाशकांचा मात्रा देखील देता आला नव्हता. गेल्या आठवडाभरापासून पावसाने विश्रांती घेवून ब:यापैकी ऊन देखील पडले होते. त्यामुळे शेतक:यांनी जास्तीत जास्त आंतरमशागतीच्या कामांना वेग दिला होता. परिणामी शेती कामांना मजूर देखील मिळत नव्हते. अशातच पुन्हा पावसाची संततधार सुरू झाल्याने शेती कामांना ब्रेक लागला आहे.प्रशासन सतर्कजिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. सर्व अधिकारी व कर्मचा:यांना मुख्यालयी थांबण्याच्या सुचना जिल्हाधिका:यांना देण्यात आल्या आहेत. नदी काठच्या     गावांना दवंडीद्वारे माहिती देण्यात येत आहे. 

हतनूर धरण पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन 26 ऑगस्ट रोजी पहाटे एक वाजता धरणाचे सर्व 36 गेट पुर्ण उघडून सुमारे एक लाख 92 हजार क्युसेक्स प्रवाह तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे सारंगखेडा बॅरेजचे 15 गेट पुर्ण उघडण्यात आले असून सुमारे एक लाख 28 हजार क्युसेक्स, तर प्रकाशा बॅरेजचे आठ गेट पुर्ण उघडण्यात येऊन एक लाख 44 हजार क्युसेक्स पाणी तापी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. तापी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे व नदी काठावार थांबू नये, असे जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे.