शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
6
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
7
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
8
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
9
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
10
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
11
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
12
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
13
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
14
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
15
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
16
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
17
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
18
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
19
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
20
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?

जातीय तेढच्या पोस्टला लाईक, शेअर करताना जपून, अन्यथा जेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:35 IST

नंदुरबार : जातीय तेढ निर्माण करणाऱ्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेक जण भावनेच्या भरात लाईक, शेअर किंवा फॉरवर्ड करतात. त्यामुळे ...

नंदुरबार : जातीय तेढ निर्माण करणाऱ्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेक जण भावनेच्या भरात लाईक, शेअर किंवा फॉरवर्ड करतात. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो. तर अनेकांना जेलची हवा खावी लागते. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत अशा प्रकारचे तीन ते चार गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे अशा पोस्ट लाईक, शेअर किंवा फॉरवर्ड करताना काळजी घेणेच अधिक सोयीस्कर आहे.

सध्या काही युवकांमध्ये जात, धर्म, धार्मिक, पारंपरिक याविषयी विशेष टोकाची भावना आहे. त्याला विविध कारणे असली तरी ही भावना सोशल मीडियावर उमटली तर त्याचा अर्थाचा अनर्थ होऊन कायद्याच्या कचाट्यात अडकावे लागते. अनेक जण दुर्लक्ष करतात, तर काही जण त्याला अधिक रंगवून पुढे पाठवतात आणि फसतात. त्यामुळे अशा पोस्टबाबत दहा वेळा विचार करणे आवश्यक आहे.

अशी घ्या काळजी...

सोशल मीडियावर आलेली कुठलीही पोस्ट लाईक, शेअर व फॉरवर्ड करण्याआधी तिची सत्यता तपासून पाहा. पोस्ट टाकणारी व्यक्ती किती विश्वासू आहे. त्यानेच ती टाकली आहे का? हे तपासावे.

काही जण मुद्दाम धार्मिक भावना भडकविण्यासाठी इतिहासाचा चुकीचा संदर्भ देऊन पोस्ट टाकत असतात. त्याला बळी पडू नये. आवडली, नाही आवडली तरी ती आपल्यापर्यंतच मर्यादित ठेवणे सोयीस्कर ठरते.

आक्षेपार्ह पोस्टला साधे लाईक जरी केले तरी तुम्ही कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतात. अशा पोस्टबाबत शासनाने विविध कायदे व नियम घालून दिले आहेत, त्याचे पालन होणे आवश्यक आहे.

मुलींनो डीपी सांभाळा...

n सोशल मीडियावर अर्थात फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, ट्विटर यावर आपला डीपी ठेवताना अनेक जण आपला फोटो ठेवतात. काही जण आपल्या मुलींचा, पत्नीचा डीपी ठेवतात. त्याचा दुरुपयोग करणारे अनेक सायबर गुन्हेगार समाजात आहेत. त्यामुळे डीपी किंवा प्रोफाईलचा फोटो केवळ जवळच्या लोकांनाच पाहता येईल या ऑप्शनचा उपयोग करणे आवश्यक आहे.

सोशल मीडियाचा वापर करा सांभाळून...

n सोशल मीडिया हे ज्ञानाचे भांडार आहे. त्याचा उपयोग आपण कसा करावा हे आपल्यावर अवलंबून आहे.

n मात्र सोशल मीडियामुळे अनेक जण भलत्याच मार्गाला जातात आणि फसतात. ते टाळता येऊ शकते. फक्त आपण सजग असले पाहिजे.

सोशल मीडियावर बदनामी : अनेकांवर गुन्हे

गेल्या दोन वर्षात सोशल मीडियाच्या माध्यमातून कुणाची बदनामी करणे, कुणाच्या जातीय, धार्मिक भावना भडकावणे याविषयीच्या सोशल मीडियाच्या पोस्टमुळे अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. काही गुन्हे हे बाहेरच्या पोस्टला लाईक करणे किंवा ती इतर ग्रुपवर शेअर करणे यामुळे गुन्हे दाखल झाले असल्याचे चित्र आहे.

कायदा व सुव्यवस्था बिघडवू शकतील अशा कुठल्याही पोस्टला कुणीही थारा देऊ नये. काही जण मुद्दाम अशा पोस्ट टाकून काहींना कायद्याच्या कचाट्यात आणण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कुठलीही पोस्ट ग्रुपवर लाईक, शेअर, फॉरवर्ड करताना शहानिशा करावी. अशा पोस्टवर सायबर क्राईम कक्ष लक्ष ठेऊन असतो.

- रवींद्र कळमकर, पोलीस निरीक्षक, सायबर सेल, नंदुरबार