शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

निवडणूक निकालानंतर महाआघाडी पॅटर्नची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:22 IST

यातून ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे पदाधिकारी असलेले नेते व कार्यकर्ते पॅनलच्या माध्यमातून ...

यातून ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे पदाधिकारी असलेले नेते व कार्यकर्ते पॅनलच्या माध्यमातून स्वतंत्रपणे लढत आहेत. विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू असताना पक्षाचा आदेश मानत निष्ठेने काम करणारे पुढारी व कार्यकर्ते निवडणूक प्रचारात पक्षाच्या चिन्हाचा किंवा पदाचा वापर न करता गावातील मुद्द्यांवर चर्चा करत असल्याने या निवडणुका राजकीय पक्षविरहित ठरत आहेत. असे असले तरी येत्या काळात ग्रामपंचायतीत बहुमत सिद्ध करून सरपंचपद मिळविण्यासाठी राज्यात सत्तेत असलेले किंवा विरोधात असलेल्या हातमिळवणी करण्याची वेळ आल्यास तसेही शक्य करून दाखविण्याचा निश्चय पुढारी व कार्यकर्त्यांचा आहे. सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पदाधिकारी ज्या पक्षाचा असेल त्याच्या पॅनललाही त्याच पक्षाचा म्हणून ओळख मिळत आहे. केवळ एवढ्याचा एका बाबीतून ही निवडणूक राजकीय पक्षांसोबत निगडीत असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे नंदुरबार तालुक्यात बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींवर मात्र महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांचाच बाेलबाला आहे. तीन ठिकाणच्या बिनविरोध ग्रामपंचायतीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील तोडगा काढून सरपंचपदावर हक्क सांगितला आहे.

निवडणुकीत एकमेकांचे उणे-दुणे काढणे टाळण्यावरच अधिक भर

दरम्यान, सध्या निवडणूक प्रचार सुरू असताना गावात गेल्या पाच वर्षांतील विकास आणि येत्या पाच वर्षांतील विकास यावरच बोलण्याची तसदी उमेदवार घेत आहेत.

केवळ गावातील मुद्द्यावर चर्चा होत असल्याने येत्या काळात ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी मदत लागल्यास वाद हाेऊ नये, म्हणून वादाचे मुद्दे टाळले जात असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

दरम्यान, याबाबत काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष दिलीप नाईक यांना संपर्क केला असता, प्रकृती बरी नसल्याने आरामक करत असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकांचा येत्या आठवड्यात आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. आघाडीची शक्यताही त्यांनी बोलून दाखवली. दुसरीकडे काँग्रेसचे इतर पदाधिकारीही निकालानंतरच्या आघाडीसाठी अनुकूल असल्याचे सांगण्यात आले आहे.

ग्रामीण निवडणुका हा राजकारणाचा पाया आहे. तेथील स्थानिक नेत्यांची मते व विचारांना महत्त्व आहे. स्थानिक पातळीवर त्यांनी घेतलेल्या निर्णयांना पक्षीय पातळीवर स्थान आहे. यातून आघाडीसारखे निर्णय झालेले नाहीत. निकालानंतर मात्र चित्र बदलू शकते.

- डाॅ. अभिजित मोरे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी

निकालानंतर चित्र बदलेल

नंदुरबार जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. १५ रोजी मतदान झाल्यानंतर मतमोजणी होणार आहे. मतमोजणीनंतर निवडून येणाऱ्या जागांनुसार सरपंच पदावर दावे-प्रतिदावे होणार आहेत. यात मित्रपक्षांची गरज भासण्याची शक्यता आहे. पॅनलला संपूर्ण बहुमत न मिळाल्यास निवडून आलेल्या दुसऱ्या पॅनलच्या उमेदवाराला सोबत घेता यावे यासाठीही आतापासून फिल्डिंग लावली जात आहे.

गावपातळीवरील नेत्यांचा निर्णय हा महत्त्वाचा आहे. ते गावाचे राजकारण करत असल्याने त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये यापूर्वी झालेले वाद व भानगडींमुळे अनेकांचे संबंध खराब झाले आहेत. यामुळे या निवडणुका पक्षविरहीत व्हाव्यात अशी अपेक्षा आहे. निकालानंतर बदल शक्य आहेत.

- डाॅ. विक्रांत मोरे

जिल्हाध्यक्ष, शिवसेना