शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
2
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
3
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
4
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
5
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
6
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
7
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
8
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
9
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
10
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
11
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
12
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
13
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
14
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
15
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
16
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
18
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
19
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
20
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!

निवडणूक निकालानंतर महाआघाडी पॅटर्नची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:22 IST

यातून ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे पदाधिकारी असलेले नेते व कार्यकर्ते पॅनलच्या माध्यमातून ...

यातून ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे पदाधिकारी असलेले नेते व कार्यकर्ते पॅनलच्या माध्यमातून स्वतंत्रपणे लढत आहेत. विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू असताना पक्षाचा आदेश मानत निष्ठेने काम करणारे पुढारी व कार्यकर्ते निवडणूक प्रचारात पक्षाच्या चिन्हाचा किंवा पदाचा वापर न करता गावातील मुद्द्यांवर चर्चा करत असल्याने या निवडणुका राजकीय पक्षविरहित ठरत आहेत. असे असले तरी येत्या काळात ग्रामपंचायतीत बहुमत सिद्ध करून सरपंचपद मिळविण्यासाठी राज्यात सत्तेत असलेले किंवा विरोधात असलेल्या हातमिळवणी करण्याची वेळ आल्यास तसेही शक्य करून दाखविण्याचा निश्चय पुढारी व कार्यकर्त्यांचा आहे. सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पदाधिकारी ज्या पक्षाचा असेल त्याच्या पॅनललाही त्याच पक्षाचा म्हणून ओळख मिळत आहे. केवळ एवढ्याचा एका बाबीतून ही निवडणूक राजकीय पक्षांसोबत निगडीत असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे नंदुरबार तालुक्यात बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींवर मात्र महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांचाच बाेलबाला आहे. तीन ठिकाणच्या बिनविरोध ग्रामपंचायतीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील तोडगा काढून सरपंचपदावर हक्क सांगितला आहे.

निवडणुकीत एकमेकांचे उणे-दुणे काढणे टाळण्यावरच अधिक भर

दरम्यान, सध्या निवडणूक प्रचार सुरू असताना गावात गेल्या पाच वर्षांतील विकास आणि येत्या पाच वर्षांतील विकास यावरच बोलण्याची तसदी उमेदवार घेत आहेत.

केवळ गावातील मुद्द्यावर चर्चा होत असल्याने येत्या काळात ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी मदत लागल्यास वाद हाेऊ नये, म्हणून वादाचे मुद्दे टाळले जात असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

दरम्यान, याबाबत काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष दिलीप नाईक यांना संपर्क केला असता, प्रकृती बरी नसल्याने आरामक करत असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकांचा येत्या आठवड्यात आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. आघाडीची शक्यताही त्यांनी बोलून दाखवली. दुसरीकडे काँग्रेसचे इतर पदाधिकारीही निकालानंतरच्या आघाडीसाठी अनुकूल असल्याचे सांगण्यात आले आहे.

ग्रामीण निवडणुका हा राजकारणाचा पाया आहे. तेथील स्थानिक नेत्यांची मते व विचारांना महत्त्व आहे. स्थानिक पातळीवर त्यांनी घेतलेल्या निर्णयांना पक्षीय पातळीवर स्थान आहे. यातून आघाडीसारखे निर्णय झालेले नाहीत. निकालानंतर मात्र चित्र बदलू शकते.

- डाॅ. अभिजित मोरे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी

निकालानंतर चित्र बदलेल

नंदुरबार जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. १५ रोजी मतदान झाल्यानंतर मतमोजणी होणार आहे. मतमोजणीनंतर निवडून येणाऱ्या जागांनुसार सरपंच पदावर दावे-प्रतिदावे होणार आहेत. यात मित्रपक्षांची गरज भासण्याची शक्यता आहे. पॅनलला संपूर्ण बहुमत न मिळाल्यास निवडून आलेल्या दुसऱ्या पॅनलच्या उमेदवाराला सोबत घेता यावे यासाठीही आतापासून फिल्डिंग लावली जात आहे.

गावपातळीवरील नेत्यांचा निर्णय हा महत्त्वाचा आहे. ते गावाचे राजकारण करत असल्याने त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये यापूर्वी झालेले वाद व भानगडींमुळे अनेकांचे संबंध खराब झाले आहेत. यामुळे या निवडणुका पक्षविरहीत व्हाव्यात अशी अपेक्षा आहे. निकालानंतर बदल शक्य आहेत.

- डाॅ. विक्रांत मोरे

जिल्हाध्यक्ष, शिवसेना