शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पदरमोड करीत वीज बिलाचा भरणा करावा लागत असल्याचे चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:34 IST

तळोदा : निधी अभावी तालुक्यातील महसूल विभागातील तलाठी आपल्या कार्यालयाचे वीज बिल स्वतःच्या खिशातून पदरमोड करत वीज वितरण कंपनीला ...

तळोदा : निधी अभावी तालुक्यातील महसूल विभागातील तलाठी आपल्या कार्यालयाचे वीज बिल स्वतःच्या खिशातून पदरमोड करत वीज वितरण कंपनीला भरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासनाने हा प्रश्न मार्गी लावावा, अशी त्यांची मागणी आहे.

तळोदा तालुक्यात ९१ महसूल गावे आहेत. शेतकऱ्यास त्यांचा सातबारा उतारा अथवा तत्सम कागदपत्रे गावातच मिळावी यासाठी शासनाने त्यांना गावातच कार्यालयात राहण्याची सक्ती केली आहे. साहजिकच तलाठ्यांनी आपापल्या गावाच्या ठिकाणी ग्राम पंचायतींच्या एका खोलीत कार्यालये थाठली आहेत. त्यांना प्रशासनाने कार्यालयात उपस्थित राहण्याचे वेळापत्रकदेखील ठरवून दिले आहे. त्यानुसार संबंधित कर्मचारी उपस्थित राहत असतात. मात्र, कार्यालयाचा ठिकाणी ज्या सुविधा देणे अपेक्षित असताना त्यांना त्या उपलब्ध नसल्याचं चित्र आहे. एवढेच नव्हे तर सध्या लाईट बिलाची तजवीजदेखील होत नसल्याची त्यांची व्यथा आहे. कारण कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅब, पंखा या वस्तू आवश्यक आहेत. त्यासाठी वीजपुरवठादेखील अत्यावश्यक आहे.परंतु त्याच्या बिलाची रक्कम त्यांना आपल्या स्वतःचा खिशातून पदरमोड करत भरावे लागते. अन्यथा वीज वितरण कंपनीच्या कार्यालयकडून जोडणी कट करण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत असते. वास्तविक शेतकऱ्यांचा सातबारा व कागद पत्रांसाठी शासनास शेतकऱ्यांकडून महसूल मिळतो. शिवाय आता शासनाने डिजीटल सताबऱ्याची सक्ती शेतकऱ्यांना केली आहे. त्यामुळे कोणतेही कार्यालय ऑफलाईन सातबारा घेत नाही. साहजिकच शेतकऱ्यांचे बँकांमधील कर्ज प्रकरण असो की, योजनांच्या लाभ अथवा विविध अनुदान असो याशिवाय प्रकरण पुढे सरकत नाही. परिणामी शेतकऱ्यांनाही लाभापासून वंचित राहावे लागत असते, अशी वस्तुस्थिती असताना शासनाने आपल्या अखत्यारीत असलेल्या कार्यालयांच्या वीज पुरवठ्यासाठी भरीव तरतुदी बाबत उदासीन भूमिका घेतली आहे. तहसील, पंचायत समिती सारख्या प्रमुख कार्यालयांनादेखील दरवर्षी थकीत वीज बिलांपोटी खंडित वीज पुरवठ्याच्या नामुष्कीस तोंड द्यावे लागते. संबंधित अधिकारी तेवढ्या पुरता त्यातील काही रक्कम भरून ही डोकेदुखी थांबवतात. निदान शासनाने कार्यालयांचा वीज बिल भरण्यासाठी भरीव तरतूद करून हा प्रश्न कायमचा मार्गी लावावा, अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे.

पाच टक्के निधी खर्चाची मूभा घेतली काढून

नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या नुकसान ग्रस्तांचा अनुदानातून उरलेली रक्कम अथवा इतर योजेनेच्या निधीतून उरलेल्या रकमेतून लाईट बिल अथवा स्टेशनरीसाठी पाच टक्के रक्कम खर्च करण्याचा अधिकार पूर्वी महसूल प्रशासनास दिला होता. मात्र, तोही अधिकार गेल्या तीन वर्षापासून शासनाने काढून घेतला आहे. साहजिकच प्रशासना पुढे निधीचा प्रश्न निर्माण होवून ही देणी सुध्दा थकत असतात. त्यामुळे कामेही खोळंबतात. शासनाने या प्रकरणी ठोस उपाययोजना कराव्यात.

सज्जांचा बांधकामाचा प्रस्ताव

येथील महसूल विभागाच्या सर्वच सज्जे इमारती विना आहेत. तळोदा येथील त्याचे कार्यालय शहरातील नागरिकांनी लोकसहभागातून बांधून दिले आहे तर इतर ठिकाणी ग्राम पंचायतींच्या कार्यालयात सुरू आहेत. तलाठी, सर्कल कार्यालयाअभावी शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे निदान तळोदा, सोमावल, प्रतापपूर, बोरद या चार मंडळाची कार्यालये बांधण्याची नितांत आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर येथील महसूल प्रशासनाने तेथील इमारतींचा प्रस्ताव दिला आहे. आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी उदासीनता झटकून तातडीने त्याचे इस्तीमेट तयार करून पाठवण्याची गरज आहे.