शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
3
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
4
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
5
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
6
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
7
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
8
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
9
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
10
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
11
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
12
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
13
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
14
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
16
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
17
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
18
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
19
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
20
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार

योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे नागरिकांचे आयुष्य बदलले : डॉ़ हीना गावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 12:32 IST

खासदार डॉ.हीना गावीत : स्थलांतर रोखण्याला राहणार सर्वोच्च प्राधान्य

नंदुरबार : वैयक्तिक लाभाच्या ७ योजनांची प्रभावी अंमलबजावणी मतदारसंघातील ८ तालुक्यांमध्ये केल्याने नागरिकांचे आयुष्य बदलता आले, याचे समाधान असल्याची भावना नंदुरबार मतदारसंघाच्या खासदार डॉ.हीना गावीत यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना व्यक्त केली.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ.हीना गावीत या भाजपाच्या खासदार पुन्हा एकदा उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार आहेत. पाच वर्षांच्या कार्यकाळातील कामगिरी, भविष्यातील योजना यासंबंधी त्यांनी मनमोकळी चर्चा केली.प्रश्न : उज्ज्वला योजनेचा लाभ आदिवासी महिलांना किती प्रमाणात मिळाला?डॉ.हीना गावीत : या पाच वर्षांच्या कार्यकाळात आम्ही १.५० लाख गॅस कनेक्शन या योजनेच्या माध्यमातून दिले. २०१४ पर्यंत २७ टक्के लोकांकडे गॅस कनेक्शन होते. आम्ही प्रयत्न करून मतदारसंघातील प्रत्येक गावात ही योजना पोहोचवली. विशेष म्हणजे, ६७ टक्के महिलांनी दुसऱ्यांदा सिलिंडर घेतले आहे. याचा अर्थ त्या योजनेच्या पूर्ण लाभार्थी आहेत. महिलांच्या नावे बँकेत स्वतंत्र खाते उघडले, त्यामुळे सबसिडी त्या खात्यात जमा होऊ लागली. जंगलतोड कमी झाली आणि धुरापासून सुटका झाली हे दोन प्रमुख फायदे या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे झाले.प्रश्न : ग्रामस्वराज अभियानाचा आदिवासी बांधवांना मोठा लाभ झाला आहे?डॉ.हीना गावीत : खरंय ते. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करताना आदिवासी बांधवांकडे आधार कार्ड, रेशनकार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. ही कागदपत्रे नसल्याने त्यांना योजनेचा लाभ घेताना अडचणी येत होत्या. त्यामुळे अडीच महिन्यात एक हजार गावांमध्ये आम्ही शिबिरे घेतली. ४ लाख लाभार्थींनी या शिबिराचा लाभ घेतला. जिल्हा प्रशासनाचे मोठे सहकार्य लाभले.प्रश्न : नंदुरबार जिल्ह्यावरील कुपोषणाचा डाग अद्याप मिटलेला नाही? काय अडचणी आहेत त्यात?डॉ.हीना गावीत : मी स्वत: वैद्यकीय व्यावसायिक आहे. खासदार होण्यापूर्वी मी आरोग्य शिबिरे घेतली आहेत. कुपोषणाचा डाग मिटविण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, स्थलांतर ही मोठी अडचण त्यात आहे. पायाभूत सुविधा, रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यास स्थलांतर रोखता येईल. या समस्येवर मात करण्यासाठी आम्ही सूक्ष्म नियोजन सुरू केले. धडगाव तालुक्यात वनबंधू कल्याण योजनेचा पथदर्शी प्रकल्प राबविला. आरोग्य केंद्रे आहेत, पण तेथे वैद्यकीय अधिकारी नाहीत. अधिकारी का नाही, तर त्या गावात पायाभूत सुविधा नाहीत. म्हणून पंतप्रधान ग्रामसडक योजनेत १३ नवीन रस्ते मंजूर केले. आंब्याचे मोठे उत्पादन असल्याने आमचूर बनविण्यासाठी २१८ महिला बचत गटांना सोलर ड्रायर सिस्टिम दिली. कुक्कुटपालनासाठी प्रत्येक लाभार्थीला ४५ पिल्ले दिली. महूच्या फुलांपासून ज्युस आणि जॅम बनविण्याचे प्रयत्न आम्ही करीत आहोत. ‘आत्मा’ अंतर्गत तांदूळ प्रक्रिया केंद्र ११ ठिकाणी उभारण्यात येत आहेत.प्रश्न : प्रत्येक गावात वीज पोहोचविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, आपल्या जिल्ह्यातील परिस्थिती कशी आहे?डॉ.हीना गावीत : ३१ मार्च २०१९ पर्यंत प्रत्येक गावात वीज पोहोचविण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट होते. त्यानुसार ८६ गावे आणि ७६३ पाड्यांमधील एक लाख २५ हजार घरांपर्यंत आम्ही वीज पोहोचविली आहे. त्यापैकी वनविभागाच्या जमिनीमुळे २५ हजार घरांमध्ये सौर दिवे आम्ही दिले आहेत.प्रश्न : रेल्वेच्या प्रश्नासंबंधी काय प्रयत्न झाले?डॉ.हीना गावीत : रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. मुंबईसाठी स्वतंत्र गाडी सुरू करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण झाले आहे. सोयीची वेळ असल्याने या गाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. दोन गाड्यांना नंदुरबार येथे थांबा मिळवून देण्यात यश आले.प्रश्न : चारवेळा तुम्हाला संसदरत्न पुरस्कार मिळाला, ही तुमच्या कामगिरीची पावतीच म्हणायला हवी, नाही का?डॉ.हीना गावीत : संसदेत मी १०७८ प्रश्न विचारले. महत्त्वाच्या योजना, विधेयक मंजुरीच्या प्रक्रियेत मी होते. त्या कामगिरीचा हा सन्मान आहे.