शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

लोकांनी भरभरून आशीर्वाद दिले; आता कामेही करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:29 IST

भारती पवार यांचा मात्र जिल्ह्याशी फारशा संबंध नसताना, त्या भाजपच्या केंद्राच्या मंत्री असल्याने त्यांचे जिल्ह्यातील जनतेनेही उत्स्फूर्तपणे स्वागत केले. ...

भारती पवार यांचा मात्र जिल्ह्याशी फारशा संबंध नसताना, त्या भाजपच्या केंद्राच्या मंत्री असल्याने त्यांचे जिल्ह्यातील जनतेनेही उत्स्फूर्तपणे स्वागत केले. हे स्वागत करताना ठिकठिकाणी त्यांना समस्यांचे निवेदनही देण्यात आले. त्यांनी ही निवेदने नम्रपणे स्वीकारलीही; त्यामुळे आता त्यांच्या भूमिकेकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. तसेच जिल्ह्यात आरोग्याचे अनेक प्रश्न आहेत. भारती पवार यांच्या खात्याकडूनच ते सुटू शकतात. त्यात विशेषत: सिकलसेल ॲनिमिया आणि कुपोषणाच्या प्रश्नावर खूप काही करण्यासारखे आहे. नंदुरबार जिल्ह्यात सिकलसेल ॲनिमियाचा प्रश्न खूपच गंभीर आहे. जवळपास ४० टक्क्यांपेक्षाही अधिक सिकलसेलचे वाहक तयार झाले आहेत. हा प्रश्न सोडविण्यासाठी जनजागृती हा सगळ्यांत प्रभावी उपचार आहे. आतापर्यंत या प्रश्नावर रक्ततपासणी व इतर आरोग्य मोहीम राबविली जाते. परंतु ठोस अशी मोहीम राबविली गेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबनिहाय प्रत्येक व्यक्तीची तपासणी करून त्या व्यक्तीला आधार कार्डप्रमाणे सिकलसेलचेही ओळखपत्र द्यावे, अशी योजना मागे प्रस्तावित होती. विशेषत: आदिवासी भागासाठी ही मोहीम गरजेची आहे. त्यामुळे केंद्राकडून ‘सिकलसेल ओळखपत्र योजना’ राबविणे आवश्यक आहे. कुपोषणाच्या प्रश्नावरदेखील आजवर अनेक प्रयोग झाले; पण कुपोषित बालकांची संख्या मात्र घटत नाही. बालमृत्यूंचेही प्रमाण वाढतच आहे. आजच्या स्थितीत जवळपास साडेतीन हजार अतितीव्र कुपोषित बालके असून, १७ हजारांपेक्षा अधिक मध्यम कुपोषित बालके आहेत. या बालकांना एकाच वेळी आरोग्य केंद्रांमध्ये उपचार देण्याची सुविधा नाही. त्यामुळे सध्या आहे त्या आरोग्य केंद्रांमध्ये किमान २५ आरोग्यकेंद्रांत बाल उपचार केंद्रे सुरू करण्याचा प्रशासनाचा विचार सुरू आहे. त्यासाठी सुमारे तीन कोटींपेक्षा अधिक निधी आवश्यक असून, हा निधी केंद्राने दिल्यास कुपोषणाच्या प्रश्नावर किमान मलम लावल्यासारखे होईल.

जिल्ह्यात आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची संख्या अजूनही कमी आहे. शासनाच्या लोकसंख्येचा निकष पाहता आदिवासी भागातील २० हजार लोकसंख्येच्या मर्यादेसाठी एक आरोग्य केंद्र व तीन हजार लोकसंख्येसाठी एक उपकेंद्र असावे, असा निकष आहे. तर सपाटीवरील भागासाठी ३० हजार लोकसंख्येला एक आरोग्य केंद्र व पाच हजार लोकसंख्येला एक उपकेंद्र असावे. या निकषाचे समीकरण लक्षात घेता जिल्ह्यात ८२ आरोग्य केंद्रे आणि सुमारे ५०० उपकेंद्रांची आवश्यकता आहे; पण प्रत्यक्षात मात्र केवळ ६० आरोग्य केंद्रे आणि ३२२ उपकेंद्र आहेत. हाच निकष गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने शासनाकडे अजून १४ नवीन आरोग्य केंद्र आणि ५० उपकेंद्रांचा प्रस्ताव पाठविला आहे. किमान या प्रस्तावाला तरी मंजुरी मिळणे आवश्यक आहे.

भारती पवार यांच्याकडे आरोग्य राज्यमंत्रिपद असल्याने त्यांनी जिल्ह्यातील हे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा विचार केल्यास ते सहज सुटू शकतात. त्यामुळे जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने लोकांनी केलेल्या भव्य स्वागताचा प्रतिसाद म्हणून त्यांनी जिल्ह्यातील आरोग्याचे प्रश्न अग्रक्रमाने सोडवावे हीच अपेक्षा.