शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
3
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
4
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
5
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
6
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
7
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
8
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
9
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
10
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
11
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
12
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
13
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
14
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
15
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
16
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
17
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
18
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
19
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
20
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!

लोकांनी भरभरून आशीर्वाद दिले; आता कामेही करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:29 IST

भारती पवार यांचा मात्र जिल्ह्याशी फारशा संबंध नसताना, त्या भाजपच्या केंद्राच्या मंत्री असल्याने त्यांचे जिल्ह्यातील जनतेनेही उत्स्फूर्तपणे स्वागत केले. ...

भारती पवार यांचा मात्र जिल्ह्याशी फारशा संबंध नसताना, त्या भाजपच्या केंद्राच्या मंत्री असल्याने त्यांचे जिल्ह्यातील जनतेनेही उत्स्फूर्तपणे स्वागत केले. हे स्वागत करताना ठिकठिकाणी त्यांना समस्यांचे निवेदनही देण्यात आले. त्यांनी ही निवेदने नम्रपणे स्वीकारलीही; त्यामुळे आता त्यांच्या भूमिकेकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. तसेच जिल्ह्यात आरोग्याचे अनेक प्रश्न आहेत. भारती पवार यांच्या खात्याकडूनच ते सुटू शकतात. त्यात विशेषत: सिकलसेल ॲनिमिया आणि कुपोषणाच्या प्रश्नावर खूप काही करण्यासारखे आहे. नंदुरबार जिल्ह्यात सिकलसेल ॲनिमियाचा प्रश्न खूपच गंभीर आहे. जवळपास ४० टक्क्यांपेक्षाही अधिक सिकलसेलचे वाहक तयार झाले आहेत. हा प्रश्न सोडविण्यासाठी जनजागृती हा सगळ्यांत प्रभावी उपचार आहे. आतापर्यंत या प्रश्नावर रक्ततपासणी व इतर आरोग्य मोहीम राबविली जाते. परंतु ठोस अशी मोहीम राबविली गेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबनिहाय प्रत्येक व्यक्तीची तपासणी करून त्या व्यक्तीला आधार कार्डप्रमाणे सिकलसेलचेही ओळखपत्र द्यावे, अशी योजना मागे प्रस्तावित होती. विशेषत: आदिवासी भागासाठी ही मोहीम गरजेची आहे. त्यामुळे केंद्राकडून ‘सिकलसेल ओळखपत्र योजना’ राबविणे आवश्यक आहे. कुपोषणाच्या प्रश्नावरदेखील आजवर अनेक प्रयोग झाले; पण कुपोषित बालकांची संख्या मात्र घटत नाही. बालमृत्यूंचेही प्रमाण वाढतच आहे. आजच्या स्थितीत जवळपास साडेतीन हजार अतितीव्र कुपोषित बालके असून, १७ हजारांपेक्षा अधिक मध्यम कुपोषित बालके आहेत. या बालकांना एकाच वेळी आरोग्य केंद्रांमध्ये उपचार देण्याची सुविधा नाही. त्यामुळे सध्या आहे त्या आरोग्य केंद्रांमध्ये किमान २५ आरोग्यकेंद्रांत बाल उपचार केंद्रे सुरू करण्याचा प्रशासनाचा विचार सुरू आहे. त्यासाठी सुमारे तीन कोटींपेक्षा अधिक निधी आवश्यक असून, हा निधी केंद्राने दिल्यास कुपोषणाच्या प्रश्नावर किमान मलम लावल्यासारखे होईल.

जिल्ह्यात आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची संख्या अजूनही कमी आहे. शासनाच्या लोकसंख्येचा निकष पाहता आदिवासी भागातील २० हजार लोकसंख्येच्या मर्यादेसाठी एक आरोग्य केंद्र व तीन हजार लोकसंख्येसाठी एक उपकेंद्र असावे, असा निकष आहे. तर सपाटीवरील भागासाठी ३० हजार लोकसंख्येला एक आरोग्य केंद्र व पाच हजार लोकसंख्येला एक उपकेंद्र असावे. या निकषाचे समीकरण लक्षात घेता जिल्ह्यात ८२ आरोग्य केंद्रे आणि सुमारे ५०० उपकेंद्रांची आवश्यकता आहे; पण प्रत्यक्षात मात्र केवळ ६० आरोग्य केंद्रे आणि ३२२ उपकेंद्र आहेत. हाच निकष गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने शासनाकडे अजून १४ नवीन आरोग्य केंद्र आणि ५० उपकेंद्रांचा प्रस्ताव पाठविला आहे. किमान या प्रस्तावाला तरी मंजुरी मिळणे आवश्यक आहे.

भारती पवार यांच्याकडे आरोग्य राज्यमंत्रिपद असल्याने त्यांनी जिल्ह्यातील हे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा विचार केल्यास ते सहज सुटू शकतात. त्यामुळे जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने लोकांनी केलेल्या भव्य स्वागताचा प्रतिसाद म्हणून त्यांनी जिल्ह्यातील आरोग्याचे प्रश्न अग्रक्रमाने सोडवावे हीच अपेक्षा.