शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

आनंदटेंभा पाडय़ात ग्रामस्थांची ‘आनंद’ भरारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 13:00 IST

अतिदुर्गम भागातील मनवाणी खुर्दची यशोगाथा : लखपती किसान स्मार्ट योजनेत आदिवासींना मिळाली विकासाची दिशा

रमाकांत पाटील । लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 8 : गेल्या तीन पिढय़ांपासून अज्ञान आणि दारिद्रय़ाच्या अंधारात दु:ख आणि वेदनेच्या पीडा सोसणा:या मनवाणी खुर्द येथील आनंदपाडय़ातील आदिवासी सध्या पाडय़ाच्या नावाप्रमाणे जगण्याचा नवा अनुभव घेत आहेत. टाटा ट्रस्टने या गावात ‘मिशन 2020 लखपती किसान स्मार्ट योजने’त विकासाची नवी दिशा दिल्याने येथील आदिवासींच्या चेह:यावर आनंद फुलला आहे.धडगाव तालुक्यात सिनी टाटा ट्रस्टच्या क्लस्टर डेव्हलपमेंट प्लॅनअंतर्गत 21 गावांमध्ये ‘मिशन 2020 लखपती किसान स्मार्ट गाव योजना’ सुरू आहे. याअंतर्गत आदिवासी शेतक:यांना स्वयंरोजगार, शेतीतील उत्पन्नवाढीचे, जीवनमान बदलण्याचे प्रयोग राबवले जात आहेत. याच योजनेअंतर्गत मनवाणी खुर्द येथील आनंदटेंभापाडय़ात अनोखा प्रयोग राबविण्यात आला आहे. हा पाडा तसे अतिदुर्गम भागात विस्तारलेला. धडगाव शहरापासून साधारणत: 20 किलोमीटर अंतरावरचा हा पाडा. हमरस्त्यापासून काही अंतर पायी गेल्यानंतर पाडय़ात जाता येते. या पाडय़ात 24 कुटुंब वास्तव्याला आहेत. गावात पाण्याचे स्त्रोत नसल्याने लोकांकडे शेती असूनही ती हंगामीच. पिण्याच्या पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर पायपीट करून हातपंपावरून अथवा नदीतील झ:यावरून पाणी आणावे लागते. त्यामुळे येथील महिलादेखील त्रस्त झाल्या होत्या. गेल्या वर्षार्पयत हा पाडा पूर्णपणे परराज्यात रोजगारासाठी स्थलांतरित होत असे. यावर्षी चित्र वेगळे आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी टाटा ट्रस्टने या गावात कूपनलिका खोदली असून त्यावर सौरपंप बसविला आहे. पाडय़ातील प्रत्येक घरार्पयत जलवाहिनी टाकून  पाण्याचे कनेक्शन दिले आहे. आजच्या स्थितीला आनंदटेंभा पाडय़ातील प्रत्येक घरासमोर गिलकीच्या बागा बहरल्या असून त्यातून दर दोन-तीन दिवसांआड या कुटुंबांना दोन ते तीन हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. दूरवरून पाणी आणण्याचा त्रासही कमी झाल्याने शिवाय उत्पन्नही मिळू लागल्याने या पाडय़ातील आदिवासींच्या चेह:यावर आनंद फुलला आहे.कूपनलिकेला पाणी मुबलक असल्याने आणि सौरपंप असल्याने 24 तास पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणी वाटपासाठी स्वतंत्र महिलांचा राणीकाजल पाणी वापर गट तयार करण्यात आला आहे. या गटातर्फे पाण्याचे नियोजन केले जाते. त्यासाठी प्रत्येक घरातून दर महिन्याला 100 रुपये वर्गणी गोळा केली जाते. शिवाय सदस्य फी म्हणून सुरुवातीला प्रती घर 500 रुपये जमा करण्यात आले आहेत. हा सर्व निधी बँकेत जमा आहे. प्रत्येक घराला पाणी वापरासाठी व पिण्यासाठी जेवढे लागते त्यापेक्षा दुपटीने पाणी प्रती घराला मिळते. त्यामुळे या जादा पाण्याचा वापर परसबागेसाठी करण्यात आला आहे. प्रत्येक कुटुंबाने आपल्या घराजवळील किमान 10 गुंठे ते 20 गुंठे जागेत ही परसबाग फुलवली आहे. सध्या सर्व कुटुंबांना टाटा ट्रस्टतर्फे गिलकीचे बी देण्यात आले होते. हे बी टाकून प्रत्येकाने त्याठिकाणी तारेचा मंडप तयार केला आहे. प्रत्येक रोपाला पाणी देण्यासाठी जवळच्या आरोग्य केंद्रातून निकामी झालेले सलाईनच्या बाटल्या वापरात घेतल्या आहेत. सलाईनच्या या बाटल्या खालून कापल्या आहेत व त्या उलटय़ा लावल्या आहेत. त्यात पाणी भरले जाते. ते पाणी सलाईनच्या नळीद्वारे थेंब थेंब अर्थात ठिबकप्रमाणे सोडले जाते. त्यामुळे पाण्याचा वापरही कमी होतो व रोपही चांगले वाढते.