शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
3
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
4
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
5
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
6
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
7
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
8
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
9
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
10
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
11
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
12
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
13
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
14
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
15
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
16
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
17
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
18
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
19
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
20
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी

जयनगर परिसरात कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:37 IST

जयनगर : शहादा तालुक्यातील जयनगर परिसरात रिमझिम पावसामुळे कापूस पिकांचे पूर्णत: नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. सततच्या संततधार पावसामुळे ...

जयनगर : शहादा तालुक्यातील जयनगर परिसरात रिमझिम पावसामुळे कापूस पिकांचे पूर्णत: नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. सततच्या संततधार पावसामुळे कापूस पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसत असून, उत्पादन खर्च निघणेही मुश्कील झाले आहे. तसेच कांदा या पिकाचेही अतिपावसामुळे नुकसान होत असल्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.

सध्या सर्वत्र समाधानकारक पाऊस होत असला तरी जयनगर शिवारात सततच्या संततधार पावसामुळे कापूस पिकांसह इतर पिकांनाही फटका बसल्याचे दिसून येत आहे. जयनगर येथे मध्यंतरी दोन-तीन दिवस वगळता १० ते १२ दिवसांपासून सतत पाऊस चालू आहे. अतिमुसळधार पाऊस नसला तरी मध्यम स्वरूपाचा व रिमझिम पावसामुळे परिसरातील पिकांना फटका बसल्याचे दिसून येत असून, कापूस पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

जुलै महिन्याच्या शेवटी व ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी पिकांना पावसाच्या पाण्याची अत्यंत गरज होती. मात्र, त्यावेळेस पावसाने खूप दिवस दडी मारल्यामुळे पिके करपून खराब होऊ लागली होती. आता पाऊस आला असला तरी सतत रिमझिम पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी गणेश चतुर्थीच्या दिवशी नऊ हजारांच्यावर कापसाला विक्रमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, या आठवड्यात झालेल्या रिमझिम पावसामुळे कापूस लागवड केलेले क्षेत्र लाल पडत असून, झाडावरील पाने गळून नुसते काही ठिकाणी काड्या उभ्या दिसत असल्यामुळे समाधानकारक पाऊस पडूनही उत्पन्न निघणार नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

कांदा पिकावरही अतिपावसामुळे प्रादुर्भाव

शहादा तालुक्यात यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवड केलेली आहे. मात्र, अतिपावसामुळे सर्वच कांदा लागवड क्षेत्रामध्ये पात पिवळी पडणे, वाफे बसणे यांसारखे प्रकार कांदा लागवड क्षेत्रांमध्ये दिसून येत असून, मर आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव सर्वत्र दिसून येत आहे. दरवर्षी लागवड केलेल्या क्षेत्रापेक्षा या वर्षी पावसाळ्यात कांदा लागवड केलेले क्षेत्र शहादा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, अतिपावसामुळे तसेच रोगाच्या प्रादुर्भावामुळे कांद्याच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर फरक पडणार आहे.

रिमझिम पावसामुळे सर्वत्र शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यावर्षी सुरुवातीला कापसाला चांगला भाव आहे. मात्र, लाल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन खर्चही निघणार नसल्यामुळे शासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करून द्यायला हवी. - दिनेश माळी, शेतकरी, जयनगर.