शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : इंधन विक्री वेळेवरही निर्बंध, संचारबंदीही राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजना अंतर्गत जिल्ह्यात लागू असलेली जिल्हा सीमा बंदी ३० एप्रिलपर्यंत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजना अंतर्गत जिल्ह्यात लागू असलेली जिल्हा सीमा बंदी ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. या सोबतच उद्योग, कारखानेही ३० पर्यंत बंदसह इंधन विक्रीच्या वेळीचेही बंधन, संचारबंदी, सार्वजनिक कार्यक्रमावरही बंदी राहणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी आदेश काढले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या महिन्यापासून जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांनी विविध आदेश जारी केले. यामध्ये नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यात कलम १४४ लागू करीत पाच पेक्षा अधिक व्यंतींना एकत्र येण्यास बंदी घातली. १५ एप्रिलपर्यंत असणारी ही संचारबंदी आता ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. यासोबतच १४ एप्रिलपर्यंत कारखाने, उद्योग, कंपनी १४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश डोळे होते, तेदेखील ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. आजूबाजाच्या जिल्ह्यातील येणारे जाणारे यांची गर्दी होऊन येणारा संपर्क टाळण्यासाठी असलेली सीमाबंदी देखील ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. जिल्ह्यात सभा, मेळावे, सामाजिक उपक्रम, जत्रा, उरूस, धार्मिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा यांच्यावरही ३० एप्रिलपर्यंत बंदी कायम राहणार आहे. या सोबतच पेट्रोल, डिझेल विक्रीच्या वेळांवर असलेले बंधन देखील ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. असे पाच आदेश जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी काढले असून आदेशाचे उल्लंघन झाल्यास कारवाईचा इशारा देखील देण्यात आला आहे.