लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांची अवघ्या साडेचार महिन्यात बदली झाली आहे. त्यांच्या जागी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मुळचे सामोडे, ता.साक्री येथील रहिवासी राजेंद्र भारुड यांची बदली झाली आहे. दरम्यान, प्रांताधिकारी तथा नंदुरबार आदिवासी प्रकल्पाधिकारी वान्मती सी. यांची धुळे जि.प.च्या सीईओपदी नियुक्ती झाली आहे. जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांची 25 फेब्रुवारी नंदुरबार जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळातील 45 दिवस लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत गेले. त्यानंतर 16 जुलै रोजी त्यांच्या बदलीचे आदेश येथे प्राप्त झाले. त्यांच्या जागी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड यांची बदली करण्यात आली आहे. भारूड हे मुळचे सामोडे, ता.साक्री येथील रहिवासी आहेत. अतिशय खडतर परिस्थितीत त्यांनी युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांचे आत्मचरित्रपर पुस्तक देखील अनेकांना प्रेरणादायी ठरत आहे. लवकरच ते पदभार घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.वान्मती सी. यांचीही बदलीदीड वर्षापूर्वी येथे नियुक्ती झालेल्या प्रांताधिकारी तथा नंदुरबार आदिवासी प्रकल्पाधिकारी वान्मती सी. यांची देखील बदली झाली आहे. त्यांच्या जागी अद्याप कुणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही.
अवघ्या चार महिन्यात जिल्हाधिका:यांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 12:50 IST