शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

१० केंद्रावर अवघे ७७ लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:32 IST

शहरी भागातील लसीकरण केंद्रांवर सुरूवातीच्या काळात मोठ्या रांगा लागत होत्या. पहिला डोस घेतलेल्यांची संख्या त्यामुळे वाढली देखील होती. परंतु ...

शहरी भागातील लसीकरण केंद्रांवर सुरूवातीच्या काळात मोठ्या रांगा लागत होत्या. पहिला डोस घेतलेल्यांची संख्या त्यामुळे वाढली देखील होती. परंतु दुसरा डोस घेण्यासाठीचा कालावधी किमान दोन ते तीन महिन्यांचा करण्यात आल्याने लसीकरण केंद्रांवर आता शुकशुकाट जाणवू लागला आहे. यामुळे लस घेणारे कमी आणि लसीकरण करण्यासाठी नियुक्त कर्मचारी जास्त अशी स्थिती नंदुरबारातील अनेक केंद्रावर दिसून येत आहे.

नंदुरबारात १० केंद्र

नंदुरबार शहरात लसीकरणासाठी एकुण १० केंद्र तयार करण्यात आले आहेत. सुरुवातीला केवळ तीन केंद्र होते. त्यात जिल्हा रुग्णालय आणि जेपीएन व माळीवाडा नागरी आरोग्य केंद्राचा समावेश होता. त्यामुळे या केंद्रांवर लसीकरणासाठी मोठी गर्दी होत होती. ती बाब लक्षात घेता प्रशासनाने लसीकरण केंद्रांची संख्या वाढवून ती १० पर्यंत नेली. त्यात शहरातील चारही भागात लसीकरण केंद्र करण्यात आले असून नागरिकांना आपल्या घरापासून जवळ केंद्र राहावे अशी सोय करण्यात आली.

पालिकेेचे सहकार्य

शहरातील लसीकरण केंद्रासाठी पालिकेने देखील मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले आहे. जागांची उपलब्धता, कर्मचाऱ्यांची उपलब्धता, सोयीसुविधा पालिकेने पुरविल्या आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाला ते सोयीचे ठरले आहे.

याशिवाय पालिकेतर्फे प्रत्येक प्रभागात लसीकरणासाठी जनजागृती देखील केली जात आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी लसीकरण वाढावे यासाठी त्या त्या भागातील नगरसेवकांना पुढाकार घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी जनजागृती करून ऑनलाईन नोंदणी करून दिली जात आहे. असे असले तरी नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नसल्याची स्थिती आहे.

कर्मचारी बसून

शहरातील अनेक लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी नियुक्त कर्मचारी अक्षरश: बसून राहत आहेत. एका केंद्रावर लस देणारी सिस्टर, ऑनलाईन नोंदणी करणारे तीन कर्मचारी, पडताळणी करणारा एक कर्मचारी असे पाच ते सहा कर्मचारी नियुक्त आहेत. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत लसीकरण करण्याची वेळ असते. पूर्वी जेथे रांगा लागत होत्या. रांगा लावण्यासाठी व त्यांच्यावर नियंत्रणासाठी सुरक्षा रक्षकांची मदत घेतली जात होती तेथे आता नुसताच शुकशुकाट दिसून येत आहे. त्यामुळे दिवसभर काम नसताना बसून राहत असल्यामुळे कर्मचारी देखील कंटाळले आहेत.

विशेष म्हणजे अनेक विभागातील कर्मचाऱ्यांची लसीकरण केंद्रांवर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे मुळ विभागातील काम देखील रेंगाळत जात आहे.

एका व्हायलमध्ये दहा जणांचे लसीकरण

लसीकरणाच्या एका व्हायलमध्ये दहा जणांचे लसीकरण केले जात असते. त्यामुळे किमान दहा जण झाल्याशिवाय काही ठिकाणी व्हायल फोडली जात नाही. तर काही ठिकाणी व्हायल फोडल्यानंतर ती सुरक्षीतपणे ठेवण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी कसरत होते. त्यामुळे एक किंवा दोनजण लसीकरणासाठी आले तर त्यांना नजीकच्या दुसऱ्या केंद्रावर पाठविले जात आहे. लस ठेवण्यासाठी शितपेटीची गरज असते. त्यातील तापमान शून्य अंशापर्यंत टिकवून ठेवावे लागते. तरच त्या लसीचा प्रभाव टिकत असतो असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणने आहे.

दुसरा डोसचा कालावधी वाढला

पहिला डोस घेतल्यानंतर किमान तीन ते साडेतीन महिन्यानंतर दुसरा डोस दिला जाणार आहे. पहिला डोस घेणाऱ्यांनी आधीच तो घेतला आहे. आता दुसऱ्या डोसचा कालावधी वाढविल्याने लसीकरण केंद्रांमध्ये शुकशुकाट वाढला आहे.

याशिवाय १८ ते ४४वयोगटातील लसीकरण देखील बंद करण्यात आले आहे. त्यामुळेही हा परिणाम दिसून येत आहे. आता दुसऱ्या डोसचा कालावधी वाढविण्यात आल्याने लसीकरण केंद्रातील शुकशुकाटपेक्षा १८ ते ४४ वयोटातील लोकांना लसीकरण सुरू करून वेळ भरून काढावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.