शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षतोड परवाणगीचे अवघे १८ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पालिका हद्दीत वर्षभरात केवळ १८ जणांनी झाड तोडण्याचे अर्ज केले होते. जुने वृक्ष तोडण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पालिका हद्दीत वर्षभरात केवळ १८ जणांनी झाड तोडण्याचे अर्ज केले होते. जुने वृक्ष तोडण्याची गेल्या सहा महिन्यात जणू स्पर्धाच लागली आहे. मध्यवस्तीत अनेक जुने व डेरेदार वृक्ष जमिनदोस्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ते तोडण्यासाठी पालिकेकडे साधा अर्ज दिला गेला. वन विभगाची ‘ना हरकत’ घेतली गेली नाही. असे असतांना पालिकेने कुठल्या आधारावर वृक्ष तोडण्यास परवाणगी दिली याची चौकशी होणे आवश्यक आहे. शिवाय संबधितांवर देखील गुन्हे दाखल करावे अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून होत आहे.वर्षभरापूर्वी नंदुरबारातील माणिक चौकातील एक डेरेदार आणि जुने वृक्ष तोडण्यात आले होते. त्याबाबत काहींनी तक्रारी केल्या परंतु काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे इतरांना वृक्ष तोडीबाबत हिंमत आली. त्यामुळे गणपती मंदीर परिसर, नेहरू चौक, शेतकी संघ आॅफीस जवळ, हाटदरवाजा परिसर, सिंधी कॉलनी यासह परिसरातील अनेकांनी वृक्ष तोडले. त्यांच्यावरही कुणी करवाई केली नाही.बांधकाम अभियंता वृक्ष अधिकारीपालिका क्षेत्रात एका वृक्ष अधिकाऱ्याची नेमणूक करावी लागते. सहसा बांधकाम विभागाचे अभियंता हेच वृक्ष अधिकारी असतात. शिवाय एक समिती देखील असते त्या समितीचे अध्यक्ष हे मुख्याधिकारी असतात. वृक्ष अधिकाºयाकडे अर्ज केल्यावर सात दिवसाच्या आत झाड तोडण्याची परवाणगी देणे किंवा नाकारावी लागते.जर एखादे झाड जिर्ण झाले असेल, वीज तारांना धोका असेल, रहदरीस अडथळा येत असेल, पडण्याचा धोका असेल तर असे झाड तोडण्याची लागलीच परवाणगी द्यावी लागते. जर झाड मोठे असेल तर वन विगागाची ना हरकत असावी लागते. या सर्व प्रक्रिया करूनच झाड तोडता येते. शिवाय जेव्हढी झाडे तोडाला त्या संख्येने नवीन झाडे लावावी लागतात. तसे लिहून द्यावे लागते.लाकूड गेले कुठेनंदुरबारात दहा ते बारा मोठी आणि जुनी वृक्षे तोडण्यात आल आहेत. या वृक्षांचे लाकूड कुठे विकले गेले, वन विभागाची त्यासाठी परवाणगी घेतली का? ज्या सॉ मिलने हे लाकूड खरेदी केले त्यांनी देखील वन विभागाला कळविले का? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. हजारो रुपयांचे लाकूड विक्रीचे पैसे कुणाच्या घशात गेले याबाबत वन विभागाने देखील चौकशी करणे आवश्यक आहे.वीज कंपनीकडून सर्रास कत्तलवीज कंपनी देखील पावसाळ्याच्या सुरुवातीला वीज तारांना अडचणीचे ठरणारे झाडांच्या फांद्या तोडल्य जातात. त्याला कुणाची हरकत नसते. पावसाळ्यात अपघात होऊ नये यासाठी ही मोहिम असते. परंतु वीज कंपनीच्या आडून अनेक जण आपले इप्सित साध्य करीत असतात.तोडलेल्या वृक्षाचे खोड उभेतोडलेल्या जुन्य वृक्षांचे खोड आजही ठिकठिकाणी उभे आहे. ‘लोकमत’ल गुरुवारी बातमी येताच असे खोड गायब करण्याचे काम काहींनी सुरू केले होते. तर काहींनी खोडाच्या आजूबाजूला काही वस्तू ठेवण्याचा प्रयत्न केला.याशिवाय अनेकांनी ‘लोकमत’ला फोन करून कुठल्या भागात आणखी वृक्षतोड झाली आहे याची माहिती देण्यचा प्रयत्न केला.नंदुरबार पालिकेकडे गेल्या वर्षात केवळ १३ जणांनी झाड तोडण्यासाठी अर्ज केले होते.चालू वर्षात आतार्पंत १८ जणांनी अर्ज केले होते.अर्ज हे केवळ अडचणीचे ठरणारे झाडे तोडणे, त्यांच्या फांद्या तोडणे, जिर्ण झाडं तोडणे या स्वरूपाचे होते.अनेकांनी घरे बांधणे, शॉपींग कॉम्पलेक्स बांधणे यासाठी मोठ्या झाडांचा बळी दिला असल्याचे दिसून येते.झाडं तोडलेल्या व्यक्तींनी नवीन झाडं लावली का?, ती जगली का? याची शहनिशा मात्र पालिकेकडून झाली नाही.ही झाडे तोडता येत नाहीत...हिरडा, साग, चिंच, आंबा, जांभूळ, खैर, चंदन, तिवस, अंजन, फणस, किंजळ, हळदू, बिजा, ऐन, मॅन्ग्रोव्ह ही झाडे तोडण्यास सक्त मनाई आहे.बांधकाम परवाणगीसाठीही अट...घर, व्यावसायिक इमारत अथवा इतर कुठल्याही बांधकामासाठी पालिका बांधकाम परवाणगी देतांना वृक्ष लागवडीची अट टाकते. परंतु ती अट कितीजण पुर्ण करतात. पालिका देखील त्य अटीप्रमाणे कार्यवाही करते का? हा प्रश्नच आहे.