यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक प्रमोद पाटील, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक संजय संगेकर, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख राजेंद्र दहातोंडे, तालुका कृषी अधिकारी शेळके उपस्थित होते. प्रसंगी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रात्यक्षिक क्षेत्रावर भेट दिली. यात पोषणबाग, जल पुनर्भरण, उंच गादीवाफ्यावरील पपई लागवड, रेनपाइप सिंचन पद्धती, स्वयंचलित हवामान केंद्र, एकात्मिक कीड पद्धती उद्यान, मधमाशीपालन, बैलचलित सुधारित अवजारे, विकास भारती कम्युनिटी रेडिओ स्टेशन, विविध चारा पिकांची बियाणे, श्रम कमी करणारी अवजारे, पोषण तृणधान्याची प्रक्रिया पदार्थ, रायपनिंग चेंबर, जैविक खते, माती परीक्षण किट, माविमच्या महूपासून निर्मित पदार्थ, केळीपासून निर्मित पदार्थ, आदी प्रकल्पांना भेट देऊन समाधान व्यक्त केले. कार्यशाळेत विकास पर्वातील संधी आणि आव्हाने या विषयावर विचारमंथन झाले.
नाबार्डचे प्रमोद पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यशाळेत डॉ. हेडगेवार सेवा समिती, गायत्री फाउंडेशन, रुलर फाउंडेशन, डेवलपमेंट सपोर्ट सेंटर, बायफ टाटा सीनी, लुपिन फाउंडेशन या संस्थांचे प्रमुख पदाधिकारी आणि प्रतिनिधी सहभागी झाले होते.