शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
3
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
4
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
5
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
6
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
7
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
8
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
9
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
10
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
11
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
12
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
13
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
14
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
15
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
16
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
17
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
18
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
19
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
20
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”

आठ मिठाई विक्रेत्यांना अन्न व औषध प्रशासनाची नोटिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 17:47 IST

नंदुरबार : अन्न व सुरक्षा विभागाकडून जिल्ह्यातील आठ मिठाई विक्रेत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत़ व्यावसायिकांकडे 10 मिठाई नमुने हे ...

नंदुरबार : अन्न व सुरक्षा विभागाकडून जिल्ह्यातील आठ मिठाई विक्रेत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत़ व्यावसायिकांकडे 10 मिठाई नमुने हे खाण्यायोग्य नसल्याचे आढळून आल्यानंतर ही कारवाई झाली आह़े दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने चार दिवसांपासून तपासणी मोहिम हाती घेतली आह़े यांतर्गत जिल्ह्यातील 18 परवानाधारक मिठाई विक्रेत्यांकडील खाद्यपदार्थाची  पडताळणी करण्यात येत होती़ यात आठ विक्रेत्यांकडील 10 मिठाईचे नमुने हे अयोग्य असल्याचे लक्षात आल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी दिनेश तांबोळी यांनी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत़ दरम्यान हे नमुने पूर्णपणे दूषित आहेत किंवा कसे याचा अहवाल येत्या आठवडय़ात प्राप्त होणार आह़े अहवालात विक्रेते दोषी आढळल्यास फौजदारी कारवाईसह दंडाची शिक्षा होणार असल्याची माहिती आह़े अहवालाकडे विक्रेत्यांसह नागरिकांचेही लक्ष लागून आह़े संकलित करण्यात आलेले हे नमुने मावा मिठाई, फरसाण यांचे असल्याची माहिती आह़े नोटिसा बजावण्यात आल्यानंतर अहवाल येईर्पयत संबधित विक्रेत्यांनी नमुने घेतलेल्या पदार्थाची विक्री बंद केल्याचे सांगण्यात आले आह़े जिल्ह्यात दिवाळी काळात मोठय़ा प्रमाणात मिठाईची खरेदी होणार आह़े यातून नागरिकांना सुरक्षित पदार्थ मिळावेत यासाठी खाद्यपदार्थासोबतच कच्चा मावा आणि खवा यांचीही तपासणी करण्यात येणार आह़े नंदुरबार येथे अन्न व औषध प्रशासनाचे स्वतंत्र कार्यालय नसल्याने  जिल्हाधिका:यांच्या आदेशानंतर कार्यालय सुरु करण्यात आले आह़े जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत  असलेल्या या कार्यालयात अन्न सुरक्षा अधिकारी नियुक्त आहेत़  तपासणी मोहिम दिवाळीनंतरही सुरु राहणार असल्याचे कळवण्यात आले आह़े जिल्ह्यात प्रामुख्याने तयार करण्यात येणा:या मिठाईसाठी लागणारा मावा आणि खवा हा गुजरात आणि राजस्थानातून आयात केला जातो़ त्याची योग्य ती तपासणी करण्याची मोहिम सध्या विभागाने हाती घेतल्याचे कळवण्यात आले आह़े विभागाकडून शहादा आणि नंदुरबार येथील व्यावसायिकांना या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत़ नोटिसनुसार येत्या 20 दिवसात संबधितांना सुधारणा करून म्हणणे मांडावयाचे आह़े तसेच स्वच्छता आणि अन्न पदार्थाचा दर्जा सुधारण्याचीही सूचना करण्यात आल्याची माहिती आह़े जिल्ह्यातील मिठाई विक्रेत्यांकडे आजघडीस तब्बल 500 क्विंटलपेक्षा अधिक  खवा आणि मावा कच्चा माल म्हणून वापरात आह़े यातही येत्या चार दिवसात परराज्यातून आणखी 500 क्विंटल कच्च्या मालाची आवक होणार आह़े या मालाची योग्य ती तपासणी करण्याची गरज असल्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आह़े