शहरं
Join us  
Trending Stories
1
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
2
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
3
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
4
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
5
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
6
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
7
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
8
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
9
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
10
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
12
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
13
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
14
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
15
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!
16
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
17
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
18
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
19
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
20
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!

ग्रामीण व दुर्गम भागासाठी ऑनलाइन शिक्षणाचे ना कुठले व्हिजन ना नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यंदाचे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होणार आहे. असे असले तरी गेल्या वर्षाप्रमाणेच शाळा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : यंदाचे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होणार आहे. असे असले तरी गेल्या वर्षाप्रमाणेच शाळा बंद राहतील हे स्पष्टच आहे. असे असतानाही ऑनलाइन शिक्षणाचे ना कुठले व्हिजन ना नियोजन असल्याचे जिल्ह्यात दिसत आहे. त्यामुळे यंदाही ग्रामीणसह आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात राहण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्याची गुणवत्ता आणखी घसरून विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

कोरोनामुळे गेली वर्षभर शाळा सुरूच झाल्या नाहीत. ऑनलाइन शिक्षण देण्याचा दावा केला गेला, तरी तो पूर्णत: फोल ठरला. त्यामुळे शिक्षणाच्या टप्प्यातील त्या वर्षाचा शिक्षणक्रमातील अभ्यासाला विद्यार्थी मुकले. त्याचा परिणाम पुढील शिक्षणात त्यांना भोगावा लागणार आहे. खाजगी शाळा व काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील सुशिक्षित आणि बऱ्यापैकी सधन असलेल्या कुटुंबातील विद्यार्थी थोडेफार अभ्यासक्रम समजू शकले; परंतु ग्रामीण आणि आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपासून ऑनलाइन शिक्षण फारच दूरच राहिल्याचे वेळोवेळी झालेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. असे असतानाही येत्या शैक्षणिक वर्षासाठी किमान जिल्ह्यासाठी तथा आदिवासी दुर्गम भागासाठी काही व्हिजन ठेवले नाही ना काही नियोजन केले गेले. जिल्हा प्रशासनासह शिक्षण विभाग आणि या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनाही उदासीनच राहिल्या.

गेल्या वर्षाचीच ‘री’ ओढणार?

कोरोनाची तिसरी लाट लवकरच येण्याची शक्यता सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे. तिसरी लाट बालकांसाठी धोकादायक राहणार असल्याचाही अंदाज बांधला जात आहे. अशा स्थितीत प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू होणे येत्या शैक्षणिक वर्षात तरी शक्य नाही. त्यातच १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आलेले आहे. शाळा बंद असताना या शैक्षणिक वर्षात गेल्या वर्षाची ‘री’ ओढली जाईल हे स्पष्टच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान यंदाही निश्चित आहे.

पहिलीचे विद्यार्थी काय शिकले?

ज्या विद्यार्थ्यांनी शाळेचा श्रीगणेशा गेल्या वर्षी केला त्या पहिलीच्या विद्यार्थ्यांचे सर्वाधिक नुकसान होणार आहे. ७० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी काहीही न शिकता दुसरीच्या वर्गात गेले आहेत. हे विद्यार्थी जसे पुढील शैक्षणिक वर्षाचा टप्पा गाठतील तसा त्यांना त्यांच्या अभ्यासक्रम काठिण्य पातळीवर जात राहील. परिणामी, असे विद्यार्थी मूळ शिक्षणालाच मुकलेले असतील हे स्पष्ट आहे.

वर्षभर काहीही हालचाली नाहीत

गेल्या वर्षी ऑनलाइन शिक्षणाचा प्रयोग जिल्ह्यात तरी फेल गेल्याचे सर्वश्रुत आहे. असे असताना येत्या शैक्षणिक वर्षात देखील शाळा बंद राहतील ही शक्यता गृहीत धरून जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाने काही व्हिजन का ठेवले नाही. नियोजन का केले गेले नाही? हा प्रश्न पालकांमधून उपस्थित होत आहे.