शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

दप्तरात चॉकलेट नको, सॅनिटायझर हवे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:34 IST

नंदुरबार : कोरोनाने सर्वच ट्रेण्ड बदलून टाकले आहेत. विद्यार्थ्यांच्या शालेय दप्तरात शालेय साहित्यासोबत डबा, पाण्याची बाटली राहत होती. त्यात ...

नंदुरबार : कोरोनाने सर्वच ट्रेण्ड बदलून टाकले आहेत. विद्यार्थ्यांच्या शालेय दप्तरात शालेय साहित्यासोबत डबा, पाण्याची बाटली राहत होती. त्यात आता भर पडली आहे ती सॅनिटायझर व मास्कची. शाळेत येताना सॅनिटायझर व मास्क सक्तीचा करण्यात आल्याने भले डबा राहिला तरी चालेल, परंतु सॅनिटायझर आणि मास्क विद्यार्थी आठवणीने घेत आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील शाळा आता नियमित भरू लागल्या आहेत. विद्यार्थी उपस्थिती ५० टक्केच्या वर जाऊ लागली आहे.

पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. सुरुवातीला विद्यार्थी उपस्थिती २० टक्केच्या आत होती. परंतु नंतर आता त्यात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे शाळेत येताना मास्क व सॅनिटायझर सक्तीचे झाले आहे. त्यामुळे बाजारात विद्यार्थ्यांसाठी खास सॅनिटायझरची बाटली, मास्क विक्रीस आले आहेत. विद्यार्थ्यांकडून त्यांना मागणीदेखील चांगली आहे. फॅशनेबल मास्कलाही मागणी वाढल्याचे चित्र आहे.

एकही विद्यार्थी अद्याप बाधित नाही...

जिल्ह्यात उच्च माध्यमिक तसेच नववी व दहावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू झाले आहेत. तर २७ जानेवारीपासून माध्यमिकचे पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. इयत्ता पाचवी ते बारावीचे एकूण ५५ टक्केपर्यंत विद्यार्थी उपस्थित राहत आहेत, तर पाचवी ते आठवीचे जवळपास ४५ ते ५० टक्के विद्यार्थी उपस्थित राहत आहेत. सर्व शाळांनी आवश्यक त्या उपाययोजना केलेल्या असून खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे आतापर्यंत एकही विद्यार्थी कोरोनाबाधित झालेला नाही. शाळांनीदेखील विविध माध्यमाने विद्यार्थी उपस्थिती वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही हा त्यामागील उद्देश आहे.

जिल्ह्यात शाळा यशस्वीपणे सुरू झाल्या आहेत. विद्यार्थी उपस्थितीदेखील वाढू लागली आहे. सुदैवाने एकही विद्यार्थी आतापर्यंत कोरोनाबाधित आढळून आलेला नाही. शिक्षक बाधिताचे प्रमाणदेखील अत्यल्प आहे. त्यामुळे पालकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून ते आपल्या पाल्यांना शाळेत पाठवू लागले आहेत. शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार सर्व शाळांनी आवश्यक त्या उपाययोजना केलेल्या आहेत. येत्या काळात उपस्थिती ७० टक्केपेक्षा अधिक जाईल या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. पालकांनीही निसंकोचपणे पाल्यांना शाळेत पाठवावे.

- एम.व्ही. कदम, माध्यमिक शिक्षणाधिकारी, नंदुरबार