शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

नऊ हजार क्विंटल तांदूळ दिला मोफत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संचारबंदी आणि लॉकडाऊनच्या काळात गरीब, सर्वसामान्य जनतेची दोन वेळेची चूल पेटावी यासाठी प्रशासनाने त्यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : संचारबंदी आणि लॉकडाऊनच्या काळात गरीब, सर्वसामान्य जनतेची दोन वेळेची चूल पेटावी यासाठी प्रशासनाने त्यांच्या हक्काचे धान्य त्यांच्यार्पयत पोहचावे यासाठी युद्धपातळीर काम सुरू आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत अवघ्या दोन दिवसात 38 हजार शिधापत्रिकाधारकांना तब्बल नऊ हजार क्विंटल तांदुळ मोफत वितरीत करण्यात आला आहे.याबाबत माहिती देतांना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी सांगितले, प्रधान मंत्री गरीब कल्याण येाजनेअंतर्गत दोन दिवसात जिल्ह्यातील 38 हजार शिधापत्रिकाधारकांना नऊ हजार 161 क्विंटल मोफत तांदळाचे वाटप करण्यात आले आहे.  सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत आतापयर्ंत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील दोन लाख 28 हजार 141 कार्डधारकांना 56 हजार 193 क्विंटल धान्य वाटप करण्यात आले आहे. शिधापत्रिकेवर नमूद दोन्ही येाजनेतील सुमारे 11 लाख 25 हजार नागरिकांना पाच किलो तांदळाचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.कोरोना संकटाच्या पाश्र्वभूमीवर अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील सदस्यांना वेळेवर धान्य वितरण करण्यासाठी शासनाच्या निदेर्शानुसार नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याला नियमित वितरणासाठी एकूण गव्हाचे 26 हजार 840 क्विंटल आणि तांदुळाचे 37 हजार 820 क्विंटल नियतन प्राप्त झाले आहे. तर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत 57 हजार 10 क्विटल तांदळाचे नियतन प्राप्त झाले आहे. ई-पॉस मशिनने धान्य वितरीत करताना दुकानदाराला स्वत:चे बायोमेट्रीक उपयोगात आणून वितरण करण्याची अनुमती देण्यात आली आहे.सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत अंत्योदय लाभाथ्र्यास 15 किलो गहू दोन रुपये प्रति किलो दराने व 20 किलो तांदूळ तीन रुपये प्रति किलो दराने दिला जातो. तर 20 रुपये दराने एक किलो साखर देण्यात येते.जिल्ह्यात एकूण 88 टक्के कार्डधारकांना नियमित धान्याचे वितरण करण्यात आले आहे. नियमित धान्य घेतल्यानंतर कुटुंबातील प्रत्येक सदस्याला पाच किलो याप्रमाणे सदस्यसंख्येनुसार तांदूळ मोफत वितरीत करण्यात येत आहे. दोन दिवसापूर्वी तांदूळाचे वितरण सुरू करण्यात आले असून आतापयर्ंत अक्कलकुवा तालुक्यातील 52 शिधापत्रिका धारकांना 1,181 किलो, अक्राणी 562 शिधापत्रिका धारकांना 17.8 क्विंटल, नंदुरबार 13,567 शिधापत्रिका धारकांना 318 क्विंटल, नवापूर 5,649 शिधापत्रिका धारकांना 125 क्विंटल, शहादा 11 हजार 11 शिधापत्रिका धारकांना 283 क्विंटल आणि तळोदा तालुक्यातील 7,160 शिधापत्रिका धारकांना 169 क्विंटल तांदुळाचे वितरण करण्यात आले आहे. अंत्योदय योजनेतील 13 हजार 747 शिधापत्रिका धारकांना 341 क्विंटल तर प्राधान्य कुटुंब योजनेतील 24,557 शिधापत्रिका धारकांना 574 क्विंटल तांदुळाचे वाटप करण्यात आले आहे.धान्य वितरण नियमानुसार होण्यासाठी पुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष वितरणस्थळी भेटी देत आहेत. याशिवाय जि.प. शिक्षण विभागाचे मुख्याध्यापक, केंद्र अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांची पर्यवेक्षणाकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. धान्य वितरणाचे वेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येत आहे. गरजूना नियमानुसार धान्य मिळावे याकडे विशेषत्वाने लक्ष दिले जात असून आतापयर्ंत नियमानुसार वितरण न करणा:या दोन दुकानदारांचे परवाने आतापयर्ंत रद्द करण्यात आले आहे.