शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
4
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
5
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
6
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
7
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
8
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
9
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
10
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
11
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
12
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
13
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
14
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
15
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
16
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
17
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
18
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
19
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
20
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर

शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना परवाना सक्तीचा करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 12:18 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क जयनगर :  शहादा तालुक्यातील जयनगर परिसरात सध्या पपई, केळी, कापूस, मिरची आदी पिके काढण्याचे काम सुरू ...

 लोकमत न्यूज नेटवर्कजयनगर :  शहादा तालुक्यातील जयनगर परिसरात सध्या पपई, केळी, कापूस, मिरची आदी पिके काढण्याचे काम सुरू आहे. हा माल व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन घेऊन जातात. पण बऱ्याचवेळा व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याच्या घटना नंदुरबार जिल्ह्यात घडत आहेत. शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी स्थानिक व बाहेरील व्यापाऱ्यांना परवाना देण्याची आवश्यकता आहे. त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांना शेतकऱ्यांकडून देण्यात आले.कोरोना विषाणू संसर्गामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यात व्यापाऱ्यांकडून झालेल्या  फसवणुकीची भर पडल्याने शेकरी अधिकच अडचणीत येत आहेत. काही लोक व्यापारी असल्याचा बनाव करून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून पपई, केळी, कापूस, मिरचीची खरेदी करून पैसे चुकते न करताच पसार होण्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. नंदुरबार जिल्ह्यात केळी, पपई, कापूस, मिरचीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. केळी, पपई, कापूस घेण्यासाठी व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचतात व शेतमाल खरेदी करतात. शेतकऱ्यांनाही आपला माल मार्केटपर्यंत घेऊन जाताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामध्ये वाहनाचे भाडे, मजूर शोधणे व त्यांची मजुरी अशा गोष्टींना सामोरे जावे लागते. म्हणून शेतकरी आपला शेतमाल व्यापाऱ्यांना मनमोकळेपणाने देतात. काही व्यापारी सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांशी जवळीक साधून त्यांचे पैसे वेळेवरही देतात. परंतु काही दिवसानंतर जास्त माल घेऊन थोडेफार पैसे देऊन उर्वरित पैसे नंतर देऊ, असे सांगतात. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना जास्त दिवस झाल्यावरही पैसे मिळत नाही. अशाप्रकारे व्यापारी  शेतकऱ्यांची फसवणूक करतात. नंतर शेतकरी पैसे मागायला गेले की, ‘पेमेंट मिला नही, बँक बंद है, मेरे पे विश्वास नही क्या, पार्टी से पेमेंट नही आया, आते ही देता हू’ अशी उत्तरे देऊन शेतकऱ्यांना फिरवत असतात. शेतकऱ्यांचे जास्त प्रमाणात पैसे घेणे झाले की काही व्यापारी पळूनही जातात व दुसरीकडे वास्तव्य करून परत तेथे हेच धंदे त्यांचे चालू होतात. अशा परिस्थितीमुळे शेतकरी अगोदरच कर्जबाजारी असतो आणि त्यातून व्यापार्‍यांनी दिलेला धोका व त्यांच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला कमी भाव  देऊन व्यापारी आपले खिसे भरत असल्याने शेतकरी खचून जातो. हे प्रकार थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून या व्यापाऱ्यांना परवाना दिल्यास त्यांच्यावर नियंत्रण राहील. याबाबत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून या मागणीचे निवेदन दिले. या वेळी डॉ.कांतीलाल टाटीया, महात्मा ज्योतिबा फुले युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर माळी, शेतकरी सुदाम पाटील, राजेंद्र माळी, चतुर पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.

व्यापाऱ्यांची प्रशासनाकडे नोंद होणे आवश्यकजिल्ह्यात कोणीही परप्रांतीय व्यापारी शेतमाल खरेदी करायला येत असेल तर सगळ्या व्यापाऱ्यांना परवाना आवश्यक अथवा काही संलग्नित महत्त्वाचे कागदपत्र किंवा व्यापाऱ्यांच्या परिचयाची नोंद असलेली महत्वपूर्ण माहिती जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करुन  या व्यापाऱ्यांना प्रशासनाच्या नियंत्रणात या  जिल्ह्यात व्यापार करू द्यावा. जेणेकरून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होणार नाही. तसेच व्यापाऱ्यांना परवाना आवश्यक केल्याने व्यापाऱ्यांची संख्याही कमी होईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला भावही अधिक मिळेल. ज्या व्यापाऱ्यांकडे परवाना नसेल अशा व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांनीही माल देऊ नये.