शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
2
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
3
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
4
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
5
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
6
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
7
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
8
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?
9
भारतात लाँच होणार लठ्ठपणावरचं नवं औषध, कंपनीचा शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
10
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
11
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
12
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं
13
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
14
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
15
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
16
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
17
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
18
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
20
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला

लोंढरे गावाजवळील लघुप्रकल्पाला गळती लागल्याने भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील लोंढरे गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेले लघुप्रकल्प 100 टक्के भरल्याने पाणी ओसंडून ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील लोंढरे गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेले लघुप्रकल्प 100 टक्के भरल्याने पाणी ओसंडून वाहत आहे. मात्र या लघुप्रकल्पाला मोठय़ा प्रमाणात गळती लागली असून भगदाड पडले आहेत. हा प्रकल्प फुटला तर लगतच्या चार ते पाच गावांना धोका पोहोचू शकतो. त्यामुळे प्रकल्पाला लागलेली गळती बंद करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.शहादा तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील सर्वच धरणे व लघुप्रकल्प ओसंडून वाहत आहेत. लोंढरे गावाजवळील लघुप्रकल्पही पूर्ण भरला असून पाणी वाहत आहे. मात्र या प्रकल्पाच्या गळतीकडे ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केले आहे. या प्रकल्पाचे काम 1999 मध्ये पूर्ण झाले आहे. या प्रकल्पातील पाण्याचा उपयोग कुकावल, कोठली, लोंढरेसह परिसरातील शेतीला व पिण्याच्या पाण्यासाठी होतो. चार पाटचा:यांद्वारे पाणी सोडून ते सिंचनासाठी वापरले जाते. या प्रकल्पात 13 वर्षापूर्वी पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला होता. त्यानंतर गेल्या आठवडय़ात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रकल्प पूर्ण भरला आहे. 13 वर्षात प्रकल्पाच्या भिंतींना मोठमोठे खड्डे पडले असून मोठे वृक्षही आहेत. त्यामुळे प्रकल्पाची भिंत कमजोर झाली असून काही ठिकाणी भगदाड पडले आहेत. प्रकल्पाच्या सांडव्याची भिंत दुरुस्तीबाबत लोंढरे, कहाटूळ व जयनगर येथील ग्रामस्थांनी लघुपाटबंधारे विभागाकडे वारंवार लेखी व तोंडी तक्रारी केल्या आहेत. जिल्हाधिकारी, जलसंपदा मंत्री यांच्याकडेही चार-पाच वर्षापासून लेखी तक्रारी केल्या. मात्र पाटबंधारे विभागासह सर्वाचेच त्याकडे दुर्लक्ष झाल्याने या गावांमधील ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे. आता तरी संबंधित विभागाने या प्रकल्पाची तातडीने दुरुस्ती करून गळती थांबवावी, अशी मागणी होत आहे.

सद्यस्थितीत या प्रकल्पपाची पाण्याची पातळी सात ते साडेसात मीटर उंच असल्याने पाणी ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे. प्रकल्पार्पयत जाण्यासाठी असलेल्या रस्त्याचीही दयनीय अवस्था झाली आहे. पायी जाणेही मुश्कील होते.  प्रकल्पाच्या भिंतीला पडलेल्या भगदाड व खड्डय़ांमधून पाणी वाहत आहे. ही भिंत अचानक फुटली तर जयनगर, निंभोरा, धांद्रे, मातकूट, बोराळे, कुकावल व कोठली या   गावात पाणी शिरून तेथील लोकांचा संसार उद्ध्वस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.