शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
4
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
5
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
6
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
8
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
9
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
10
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
11
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
12
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
13
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
14
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
15
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
16
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
17
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
18
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
19
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
20
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोंढरे गावाजवळील लघुप्रकल्पाला गळती लागल्याने भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील लोंढरे गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेले लघुप्रकल्प 100 टक्के भरल्याने पाणी ओसंडून ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील लोंढरे गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेले लघुप्रकल्प 100 टक्के भरल्याने पाणी ओसंडून वाहत आहे. मात्र या लघुप्रकल्पाला मोठय़ा प्रमाणात गळती लागली असून भगदाड पडले आहेत. हा प्रकल्प फुटला तर लगतच्या चार ते पाच गावांना धोका पोहोचू शकतो. त्यामुळे प्रकल्पाला लागलेली गळती बंद करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.शहादा तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील सर्वच धरणे व लघुप्रकल्प ओसंडून वाहत आहेत. लोंढरे गावाजवळील लघुप्रकल्पही पूर्ण भरला असून पाणी वाहत आहे. मात्र या प्रकल्पाच्या गळतीकडे ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केले आहे. या प्रकल्पाचे काम 1999 मध्ये पूर्ण झाले आहे. या प्रकल्पातील पाण्याचा उपयोग कुकावल, कोठली, लोंढरेसह परिसरातील शेतीला व पिण्याच्या पाण्यासाठी होतो. चार पाटचा:यांद्वारे पाणी सोडून ते सिंचनासाठी वापरले जाते. या प्रकल्पात 13 वर्षापूर्वी पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला होता. त्यानंतर गेल्या आठवडय़ात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रकल्प पूर्ण भरला आहे. 13 वर्षात प्रकल्पाच्या भिंतींना मोठमोठे खड्डे पडले असून मोठे वृक्षही आहेत. त्यामुळे प्रकल्पाची भिंत कमजोर झाली असून काही ठिकाणी भगदाड पडले आहेत. प्रकल्पाच्या सांडव्याची भिंत दुरुस्तीबाबत लोंढरे, कहाटूळ व जयनगर येथील ग्रामस्थांनी लघुपाटबंधारे विभागाकडे वारंवार लेखी व तोंडी तक्रारी केल्या आहेत. जिल्हाधिकारी, जलसंपदा मंत्री यांच्याकडेही चार-पाच वर्षापासून लेखी तक्रारी केल्या. मात्र पाटबंधारे विभागासह सर्वाचेच त्याकडे दुर्लक्ष झाल्याने या गावांमधील ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे. आता तरी संबंधित विभागाने या प्रकल्पाची तातडीने दुरुस्ती करून गळती थांबवावी, अशी मागणी होत आहे.

सद्यस्थितीत या प्रकल्पपाची पाण्याची पातळी सात ते साडेसात मीटर उंच असल्याने पाणी ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे. प्रकल्पार्पयत जाण्यासाठी असलेल्या रस्त्याचीही दयनीय अवस्था झाली आहे. पायी जाणेही मुश्कील होते.  प्रकल्पाच्या भिंतीला पडलेल्या भगदाड व खड्डय़ांमधून पाणी वाहत आहे. ही भिंत अचानक फुटली तर जयनगर, निंभोरा, धांद्रे, मातकूट, बोराळे, कुकावल व कोठली या   गावात पाणी शिरून तेथील लोकांचा संसार उद्ध्वस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.