शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

लोंढरे गावाजवळील लघुप्रकल्पाला गळती लागल्याने भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील लोंढरे गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेले लघुप्रकल्प 100 टक्के भरल्याने पाणी ओसंडून ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील लोंढरे गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेले लघुप्रकल्प 100 टक्के भरल्याने पाणी ओसंडून वाहत आहे. मात्र या लघुप्रकल्पाला मोठय़ा प्रमाणात गळती लागली असून भगदाड पडले आहेत. हा प्रकल्प फुटला तर लगतच्या चार ते पाच गावांना धोका पोहोचू शकतो. त्यामुळे प्रकल्पाला लागलेली गळती बंद करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.शहादा तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील सर्वच धरणे व लघुप्रकल्प ओसंडून वाहत आहेत. लोंढरे गावाजवळील लघुप्रकल्पही पूर्ण भरला असून पाणी वाहत आहे. मात्र या प्रकल्पाच्या गळतीकडे ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केले आहे. या प्रकल्पाचे काम 1999 मध्ये पूर्ण झाले आहे. या प्रकल्पातील पाण्याचा उपयोग कुकावल, कोठली, लोंढरेसह परिसरातील शेतीला व पिण्याच्या पाण्यासाठी होतो. चार पाटचा:यांद्वारे पाणी सोडून ते सिंचनासाठी वापरले जाते. या प्रकल्पात 13 वर्षापूर्वी पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला होता. त्यानंतर गेल्या आठवडय़ात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रकल्प पूर्ण भरला आहे. 13 वर्षात प्रकल्पाच्या भिंतींना मोठमोठे खड्डे पडले असून मोठे वृक्षही आहेत. त्यामुळे प्रकल्पाची भिंत कमजोर झाली असून काही ठिकाणी भगदाड पडले आहेत. प्रकल्पाच्या सांडव्याची भिंत दुरुस्तीबाबत लोंढरे, कहाटूळ व जयनगर येथील ग्रामस्थांनी लघुपाटबंधारे विभागाकडे वारंवार लेखी व तोंडी तक्रारी केल्या आहेत. जिल्हाधिकारी, जलसंपदा मंत्री यांच्याकडेही चार-पाच वर्षापासून लेखी तक्रारी केल्या. मात्र पाटबंधारे विभागासह सर्वाचेच त्याकडे दुर्लक्ष झाल्याने या गावांमधील ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे. आता तरी संबंधित विभागाने या प्रकल्पाची तातडीने दुरुस्ती करून गळती थांबवावी, अशी मागणी होत आहे.

सद्यस्थितीत या प्रकल्पपाची पाण्याची पातळी सात ते साडेसात मीटर उंच असल्याने पाणी ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे. प्रकल्पार्पयत जाण्यासाठी असलेल्या रस्त्याचीही दयनीय अवस्था झाली आहे. पायी जाणेही मुश्कील होते.  प्रकल्पाच्या भिंतीला पडलेल्या भगदाड व खड्डय़ांमधून पाणी वाहत आहे. ही भिंत अचानक फुटली तर जयनगर, निंभोरा, धांद्रे, मातकूट, बोराळे, कुकावल व कोठली या   गावात पाणी शिरून तेथील लोकांचा संसार उद्ध्वस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.