शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर बसस्थानकावर रात्रीच्या दरम्यान महिला प्रवाशांना भीती वाटते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:35 IST

खानदेशातून गुजरात राज्यात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असून, सर्व बस नवापूर बसस्थानकावरून रवाना होत असतात. बस न मिळाल्याने प्रवाशांना ...

खानदेशातून गुजरात राज्यात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असून, सर्व बस नवापूर बसस्थानकावरून रवाना होत असतात. बस न मिळाल्याने प्रवाशांना नवापूर बसस्थानकावर रात्री-अपरात्री थांबावे लागते. अशावेळी बसस्थानक परिसरामधील लाईट व स्वच्छतागृह बंद असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. याबाबत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली.

मुंबईतील साकीनाका भागातील महिला अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. नवापूर बसस्थानकातील अंधकार सध्या महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारा आहे. त्यामुळे पोलिसांनी बसस्थानक परिसरात गस्त घालण्याची गरज आहे.

रात्रीच्या दरम्यान बसस्थानकात पोलीस बंदोबस्त असणे गरजेचे आहे.

बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच बसस्थानक परिसरात खड्ड्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. बसस्थानकातील असुविधा सध्या प्रवाशांची डोकेदुखी ठरली आहे. नवापूर बसस्थानकावरील प्रवाशांमधील असुरक्षिततेची भावना नवापूर आगार व्यवस्थापक व नवापूर पोलीस प्रशासन दूर करतील का असा सवाल उपस्थित होत आहे.

नवापूर बसस्थानकावर रात्री भीती वाटते

नंदुरबारहून परिवारासह वापी जाण्यासाठी निघाले व नवापूर बसस्थानकावर गुजरातकडे जाणाऱ्या बसची वाट पाहत होते. नवापूर बसस्थानकातील परिसरात प्रचंड अंधार आहे. रात्री या ठिकाणी खूप भीती वाटते. परिसरामध्ये लाईट लावावी तसेच बसस्थानक स्वच्छ ठेवावे.

कल्याणी शहा, महिला प्रवासी नंदुरबार

रात्री शौचालय बंद असल्याने प्रवाशांचे हाल

नवापूर बसस्थानकावरील सुलभ शौचालय संध्याकाळी सात वाजेला बंद होत असल्याने रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाॅशरुममध्ये जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. काहीवेळा प्रवासी बाहेरच टॉयलेट करत असल्याने परिसरामध्ये दुर्गंधी व रोगराई पसरत आहे. यासंदर्भात सुलभ शौचालय रात्रीच्या वेळीदेखील उघडे असावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

तीन आठवड्यापासून लाईट बंद, दुरुस्ती केली जाईल

नवापूर बसस्थानकावर तीन आठवड्यापासून लाईट बंद आहेत. बसस्थानकामधील चार लाईट, बाहेरील पाच फोकस व लाईट बंद असल्याने परिसरात अंधार निर्माण झाला आहे. यासंदर्भात वरिष्ठांना कळवले आहे. त्यांनी पत्रव्यवहार केला आहे. कारागीर आल्यावर दुरुस्ती केली जाईल.

दिलीप गावीत, कर्मचारी, नवापूर, आगार