शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
4
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
5
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
6
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
7
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
8
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
9
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
10
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
11
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
12
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
13
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
14
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
15
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
16
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
17
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
18
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
19
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
20
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

नंदुरबारातील पोलिसांकडून दोन दिवसात 200 बैठका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 12:13 IST

पोलीस दलाचा प्रयत्न : गावागावात दिली जाते आहे दवंडी

नंदुरबार : गत दोन दिवसात पोलीस दलाने 200 बैठका घेत नागरिकांची जनजागृती केली आह़े कोतवाल, पोलीस पाटील यांना सोबत घेत दवंडीद्वारे बोलावल्या जाणा:या बैठकीत पोलीस कर्मचारी मार्गदर्शन करत आहेत़   राईनपाडा ता़ साक्री येथील घटनेपूर्वी नंदुरबार जिल्ह्यात म्हसावद ता़ शहादा, शहादा शहर, गडद ता नवापूर यासह ठिकठिकाणी अनोळखी व्यक्तींना मुले पळवणारे समजून मारहाण करण्यात आली होती़ ह्या घटना रोखण्यासाठी पोलीस दलाकडून प्रयत्न सुरू असतानाच राईनपाडा ता़ साक्री येथील घटना घडल्यानंतर पोलीसांनी गांभिर्याने पावले उचलून कारवाई सुरू केली़ यानुसार दोन दिवसांपासून अनोख्या शैलीत कोतवालाकडून दंवडी दिली जात आह़े दवंडीनंतर चौकात गोळा होणारे नागरिक ‘पोलीस दादा’कडून दिली जाणारी माहिती गांभिर्याने ऐकून घेत आहेत़ नंदुरबार शहर, उपनगर, नंदुरबार तालुका, नवापूर, विसरवाडी, शहादा, म्हसावद, सारंगखेडा, धडगाव, मोलगी, अक्कलकुवा, तळोदा या 12 पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या आदेशानुसार बैठकांचे आयोजन करण्यात येत आह़े यात पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि सरपंच यांची समिती बनवून त्यांची मदत घेतली जात आह़े गावोगावी कोपरा सभांमध्ये जाऊन पोलीस ठाण्यातील ज्येष्ठ पोलीस कर्मचारी ग्रामस्थांना माहिती देत आहेत़ पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांसह पोलीस कर्मचा:यांचे पथक सातत्याने पोलीस ठाणे क्षेत्रात गस्त घालून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत़ पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी गेल्या आठवडाभरात अक्कलकुवा, तळोदा, धडगाव याठिकाणी सभा घेत पोलीस पाटलांना मार्गदर्शन केले आह़े शुक्रवारी त्यांनी शहादा तालुक्यातील पोलीस पाटील, सरपंच व ग्रामसेवक यांची संयुक्त बैठक घेत त्यांना अफवा रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली़ग्रामीण भागात अफवांचा प्रसार रोखण्यासाठी कोतवालांकडून दररोज सायंकाळी दवंडी दिली जात आह़े  पोलीस दलाकडून ग्रामीण आणि शहरी भागात अफवांना नागरिकांनी बळी पडू नये अशी जागृती करणारे बॅनर तयार केले आहेत़ हे बॅनर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत लावले जात आहेत़ 1 हजार बॅनर लावण्याचे नियोजन पोलीस दलाने केले आह़े बॅनरसोबत बस स्टँड, रेल्वेस्थानक, मंदिरे, सार्वजनिक ठिकाणी यासह जागोजागी 10 हजार भित्तापत्रके चिकटवण्याचा प्रयत्न करण्यात येत आह़े नंदुरबार आणि शहादा या सर्वात मोठय़ा शहरी हद्दीत अफवा रोखण्यासाठी त्या-त्या पोलीस ठाण्यांकडून रहिवासी वसाहतींमध्ये बैठका घेण्यात येत आहेत़ यात समाजातील प्रतिष्ठित नागरिकांना बोलावून त्यांच्याकडून जनजागृती करण्यावर भर देण्यात येत           आह़े पोलीस दलाकडून शहरी भागात बाहेरगावाहून भिक्षुकी किंवा व्यवसायानिमित्त आलेल्या नागरिकांची माहितीही संकलित करण्यात येणार आह़े