शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
3
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
4
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
5
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
6
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
7
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
8
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
9
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
10
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
11
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
12
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
13
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
15
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
16
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
17
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
18
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
19
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
20
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

सिनेमा आणि मालिकांमध्ये झळकतेय शहाद्याचे नाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 12:07 IST

मनोज शेलार ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सिनेमा क्षेत्र जेव्हढे आकर्षणाचे तेव्हढेच चॅलेंजींग देखील आहे. झटपट यश आणि ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सिनेमा क्षेत्र जेव्हढे आकर्षणाचे तेव्हढेच चॅलेंजींग देखील आहे. झटपट यश आणि प्रसिद्धीकडे आताच्या युवकांचा भर आहे. परंतु यामागे धावतांना यश आले नाही तर नैराश्यातून जीवन उध्वस्त देखील होते. त्यामुळे सतत शिकणे आणि कठोर मेहनत याला पर्याय नसल्याचे शहादा येथील रहिवासी असलेले युवा दिग्दर्शक आणि पटकथा लेखक भूषण अरुण चौधरी यांचे मत आहे.   शहाद्यासारख्या शहरात राहतांना या क्षेत्राकडे कसे वळलात?   पूर्वीपासूनच नाटक, सिनेमा यांची आवड होती. शालेय शिक्षण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेतांना आकर्षण अधीकच वाढले. त्यासाठी थेट पुणे गाठले. तेथे मास कम्युनिकेशन करत असतांना अनेक लहान मोठी नाटके, डाक्युमेंटरी यात काम केले. पुणे पोलिसांच्या ऑफिशियल डाक्युमेंटरी करीत असतांना फार काही शिकायला मिळाले. दिग्दर्शक अनुराग कश्यप, चित्रपट कथा लेखक अंजूम राजाबली हे आपले आयकॉन असून त्यांचा आपल्यावर मोठा पगडा आहे. शुभदिप राह हे करियरचे पहिले गुरू.चित्रपट आणि टी.व्ही.सिरयलमध्ये काम कसे मिळाले?   पुण्यात शिक्षण पुर्ण केल्यानंतर मुंबई गाठले. तेथे काही ओळखींच्या व्यक्तींसोबत फिरलो. दिग्दर्शनाची आवड असल्याने सुरुवातीला लघुपट आणि लहान मोठय़ा सिरियल मिळविल्या. नंतर झी टिव्हीची हू.तू., एम.टीव्हीची कॅम्पस प्लस यासाठी काम केले.   आगामी काळात कुठला प्रोजेक्ट?   बिरसा मुंडा यांच्यावर आधारीत हिंदी चित्रपटावर काम करीत आहे. याशिवाय काही अॅड फिल्म्स देखील करीत आहे. 

मराठी बिगबॉस सिझन दोन..   मराठी बिग बॉस सिझन टू ने मला बरेच काही शिकवले. स्टोरी रायटर म्हणून मी तेथे असिस्टंट म्हणून काम केले. शिवाय दिग्दर्शनाचेही बरेच धडे तेथे मिळाले.  झी टीव्ही मध्ये काम करतांना अनेक चांगले अनुभव मिळाले. चांगल्या दिग्दर्शकांसोबत काम करता आले. लवकरच स्वत: चित्रपट निर्मितीचा प्रय} राहणार आहे. त्यासाठी ‘आस’ चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माते मनोज विशे यांचे मोठे सहकार्य आणि मार्गदर्शन राहणार आहे.