मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सिनेमा क्षेत्र जेव्हढे आकर्षणाचे तेव्हढेच चॅलेंजींग देखील आहे. झटपट यश आणि प्रसिद्धीकडे आताच्या युवकांचा भर आहे. परंतु यामागे धावतांना यश आले नाही तर नैराश्यातून जीवन उध्वस्त देखील होते. त्यामुळे सतत शिकणे आणि कठोर मेहनत याला पर्याय नसल्याचे शहादा येथील रहिवासी असलेले युवा दिग्दर्शक आणि पटकथा लेखक भूषण अरुण चौधरी यांचे मत आहे. शहाद्यासारख्या शहरात राहतांना या क्षेत्राकडे कसे वळलात? पूर्वीपासूनच नाटक, सिनेमा यांची आवड होती. शालेय शिक्षण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेतांना आकर्षण अधीकच वाढले. त्यासाठी थेट पुणे गाठले. तेथे मास कम्युनिकेशन करत असतांना अनेक लहान मोठी नाटके, डाक्युमेंटरी यात काम केले. पुणे पोलिसांच्या ऑफिशियल डाक्युमेंटरी करीत असतांना फार काही शिकायला मिळाले. दिग्दर्शक अनुराग कश्यप, चित्रपट कथा लेखक अंजूम राजाबली हे आपले आयकॉन असून त्यांचा आपल्यावर मोठा पगडा आहे. शुभदिप राह हे करियरचे पहिले गुरू.चित्रपट आणि टी.व्ही.सिरयलमध्ये काम कसे मिळाले? पुण्यात शिक्षण पुर्ण केल्यानंतर मुंबई गाठले. तेथे काही ओळखींच्या व्यक्तींसोबत फिरलो. दिग्दर्शनाची आवड असल्याने सुरुवातीला लघुपट आणि लहान मोठय़ा सिरियल मिळविल्या. नंतर झी टिव्हीची हू.तू., एम.टीव्हीची कॅम्पस प्लस यासाठी काम केले. आगामी काळात कुठला प्रोजेक्ट? बिरसा मुंडा यांच्यावर आधारीत हिंदी चित्रपटावर काम करीत आहे. याशिवाय काही अॅड फिल्म्स देखील करीत आहे.
मराठी बिगबॉस सिझन दोन.. मराठी बिग बॉस सिझन टू ने मला बरेच काही शिकवले. स्टोरी रायटर म्हणून मी तेथे असिस्टंट म्हणून काम केले. शिवाय दिग्दर्शनाचेही बरेच धडे तेथे मिळाले. झी टीव्ही मध्ये काम करतांना अनेक चांगले अनुभव मिळाले. चांगल्या दिग्दर्शकांसोबत काम करता आले. लवकरच स्वत: चित्रपट निर्मितीचा प्रय} राहणार आहे. त्यासाठी ‘आस’ चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माते मनोज विशे यांचे मोठे सहकार्य आणि मार्गदर्शन राहणार आहे.