याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, स्थानिक अन्वेषण विभागाचे विजय सिंह राजपूत व शिक्षणाधिकारी यांच्यावतीने चंद्रकांत पाटील यांनी या मागणीचे निवेदन स्वीकारले. निवेदन देण्यासाठी हिंदू जनजागृती समितीचे राहुल मराठे, सतीश बागुल, गौरव धामणे, आकाश गावित, भूषण बागुल व गणेश राजपूत हे उपस्थित होते. १४ फेब्रुवारी या दिवशी पोलिसांची विशेष पथके नियुक्त करून शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात अपप्रकार करणाऱ्या समाजकंटकांना कह्यात घेणे, वेगाने वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करणे, अशा उपाययोजना आखाव्यात. 'व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने होणाऱ्या अपप्रकारांचे प्रमाण पाहता, महाविद्यालयातील प्राचार्यांची बैठक घेऊन निर्देश द्यावेत. तसेच या संदर्भातील लेखी निर्देश सर्व मुख्याध्यापकांना देण्यात यावेत, असे या निवेदनात म्हटले आहे.
अपप्रकारांना आळा घालण्यासाठी काही समाजसेवी संघटना मागील काही वर्षापासून ‘मातृ-पितृ पूजनदिना’च्या माध्यमातून युवा पिढीसमोर एक आदर्श पर्याय निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सध्या देशात स्वतःच्या अपत्यांकडून देखभाल होत नसलेल्या वृद्धांची संख्या वेगाने वाढत आहे. पाश्चात्यांच्या प्रभावामुळे या नव्याने निर्माण झालेल्या सामाजिक समस्येविषयी सरकारही चिंतीत असून, त्याविषयी सामाजिक दृष्टिकोनातून प्रबोधन करत आहेत. "मातृ-पितृ पूजनदिन' या उपक्रमातून आपल्या माता-पित्यांना सौजन्य आणि सन्मान देण्याची भावना वाढीस लागते. त्यामुळे 'मातृ-पितृ पूजन दिना'चे आयोजन करणे, हे एकप्रकारे शासकीय धोरणांना प्रोत्साहन देण्यासारखेच असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.