शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
3
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
4
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
5
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
6
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
7
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
8
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
9
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
10
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
11
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
12
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
13
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
14
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
15
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
16
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
17
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
18
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
19
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
20
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!

संयम, नियम व अनुशासन हीच कोरोनाशी लढण्याची त्रिसूत्री...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 12:23 IST

आज संपूर्ण जग कोरानाच्या प्रभावाखाली आहे. सर्वच बाजूने त्याच्याशी मुकाबला करण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. शासन, प्रशासन, स्वयंसेवी ...

आज संपूर्ण जग कोरानाच्या प्रभावाखाली आहे. सर्वच बाजूने त्याच्याशी मुकाबला करण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. शासन, प्रशासन, स्वयंसेवी संस्था, डॉक्टर्स, वैद्यकीय क्षेत्रातील घटक सर्वच आपआपल्या परीने मदत करीत आहेत. संसर्ग होऊ नये म्हणून विलगीकरणासाठी दिलेल्या सूचना पाळण्यासाठी नागरिकही मदत करीत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून माध्यमातील बातम्या आणि कोरोनाची घेतलेली भीती, २४ तास घरात बसून राहण्याची सक्ती यामुळे मानवी मनावर एक प्रकारची अस्वस्थता दिसून येत आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री वा जागतिक आरोग्य संघटना आाणि इतर जबाबदार घटकांच्या आवाहनास प्रतिसाद देऊनही काही प्रमाणात लोक नियम पाळताना दिसत नाहीत. त्यासाठी काही छोट्य गोष्टी धारण केल्यास मानवी मन निश्चित सशक्त होऊन लढण्याची मानसिकता तयार होईल.आरोग्य जपण्यासाठीचे सर्व नियम तंतोतंत पाळणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्यकर्तव्य आहे. त्याचबरोबर तीन गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष दिल्यास हा प्रश्न लवकर मार्गी लागेल आणि त्या म्हणजे संयम, नियम आणि अनुशासन होय. जवळपास सर्वच धर्मात, आध्यात्मिक संप्रदायात, संतसाहित्यात संयमास अतिशय महत्वाचे स्थान आहे. भारतीय माणूस समाजप्रिय, समाजात मिसळणारा आहे. त्यास उत्सव, सण, परंपरा, रुढी आदीमध्ये रमून जाण्याची आवड आहे. शिवाय स्वभावात सतत काम करण्याची सवय असणाऱ्यांसाठी २४ तास घरात बसणे अवघड होत आहे. त्यामुळे अशावेळस संयम दाखविणे अत्यंत महत्वाचे आहे. संयम हा गुण लगेच आत्मसात करता येत नाही. त्यासाठी प्रदीर्घ अभ्यास लागतो मात्र ते कठीण अजिबात नाही. प्रयत्न केल्यास संयमित जीवन जगता येते आणि ते अवलंबून आहे दुसºया सूत्रांवर अर्थात नियमावर. म्हणून कोरोनाच्या लढाईत जिंकण्यासाठीचे दुसरे सूत्र म्हणजे नियम होय. काही नियम शासन, प्रशासनाने आखून दिले आहेत त्याचे तर पालन करावे पण आपल्या मनोबलास वाढविण्यासाठी काही छोटे-छोटे नियम तयार करावेत. जसे सकाळ-संध्याकाळ योगासने, प्राणायाम, ध्यान-धारणा अथवा आपल्या इष्ट देवाची, प्रार्थना, प्रेअर, नमाज जे काही आपण करतो तो. संयम, नियम याच्या जोडीला तिसरे सूत्र म्हणजे अनुशासन हा गुण होय. अनुशासन अर्थात शिस्त. घराबाहेर न पडणे, मास्क लावणे, हात धुणे या गोष्टी शिस्तीच्याच घटक आहेत. शिस्त हा गुणांची धारणा केल्यास निश्चित आपण यापासून लढू शकू. तेव्हा संयम, नियम आणि अनुशासन या त्रिसूत्रीच्या आधारे आपण कोरोनाशी लढू शकू.-ब्रह्माकुमारी मिनाक्षी दीदी, उपक्षेत्रीय निर्देशिका, प्रजापिता ब्रह्माकुमारीईश्वरीय विश्वविद्यालय, उत्तर महाराष्ट्र प्रमुख, नंदुरबार.