शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

संयम, नियम व अनुशासन हीच कोरोनाशी लढण्याची त्रिसूत्री...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 12:23 IST

आज संपूर्ण जग कोरानाच्या प्रभावाखाली आहे. सर्वच बाजूने त्याच्याशी मुकाबला करण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. शासन, प्रशासन, स्वयंसेवी ...

आज संपूर्ण जग कोरानाच्या प्रभावाखाली आहे. सर्वच बाजूने त्याच्याशी मुकाबला करण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. शासन, प्रशासन, स्वयंसेवी संस्था, डॉक्टर्स, वैद्यकीय क्षेत्रातील घटक सर्वच आपआपल्या परीने मदत करीत आहेत. संसर्ग होऊ नये म्हणून विलगीकरणासाठी दिलेल्या सूचना पाळण्यासाठी नागरिकही मदत करीत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून माध्यमातील बातम्या आणि कोरोनाची घेतलेली भीती, २४ तास घरात बसून राहण्याची सक्ती यामुळे मानवी मनावर एक प्रकारची अस्वस्थता दिसून येत आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री वा जागतिक आरोग्य संघटना आाणि इतर जबाबदार घटकांच्या आवाहनास प्रतिसाद देऊनही काही प्रमाणात लोक नियम पाळताना दिसत नाहीत. त्यासाठी काही छोट्य गोष्टी धारण केल्यास मानवी मन निश्चित सशक्त होऊन लढण्याची मानसिकता तयार होईल.आरोग्य जपण्यासाठीचे सर्व नियम तंतोतंत पाळणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्यकर्तव्य आहे. त्याचबरोबर तीन गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष दिल्यास हा प्रश्न लवकर मार्गी लागेल आणि त्या म्हणजे संयम, नियम आणि अनुशासन होय. जवळपास सर्वच धर्मात, आध्यात्मिक संप्रदायात, संतसाहित्यात संयमास अतिशय महत्वाचे स्थान आहे. भारतीय माणूस समाजप्रिय, समाजात मिसळणारा आहे. त्यास उत्सव, सण, परंपरा, रुढी आदीमध्ये रमून जाण्याची आवड आहे. शिवाय स्वभावात सतत काम करण्याची सवय असणाऱ्यांसाठी २४ तास घरात बसणे अवघड होत आहे. त्यामुळे अशावेळस संयम दाखविणे अत्यंत महत्वाचे आहे. संयम हा गुण लगेच आत्मसात करता येत नाही. त्यासाठी प्रदीर्घ अभ्यास लागतो मात्र ते कठीण अजिबात नाही. प्रयत्न केल्यास संयमित जीवन जगता येते आणि ते अवलंबून आहे दुसºया सूत्रांवर अर्थात नियमावर. म्हणून कोरोनाच्या लढाईत जिंकण्यासाठीचे दुसरे सूत्र म्हणजे नियम होय. काही नियम शासन, प्रशासनाने आखून दिले आहेत त्याचे तर पालन करावे पण आपल्या मनोबलास वाढविण्यासाठी काही छोटे-छोटे नियम तयार करावेत. जसे सकाळ-संध्याकाळ योगासने, प्राणायाम, ध्यान-धारणा अथवा आपल्या इष्ट देवाची, प्रार्थना, प्रेअर, नमाज जे काही आपण करतो तो. संयम, नियम याच्या जोडीला तिसरे सूत्र म्हणजे अनुशासन हा गुण होय. अनुशासन अर्थात शिस्त. घराबाहेर न पडणे, मास्क लावणे, हात धुणे या गोष्टी शिस्तीच्याच घटक आहेत. शिस्त हा गुणांची धारणा केल्यास निश्चित आपण यापासून लढू शकू. तेव्हा संयम, नियम आणि अनुशासन या त्रिसूत्रीच्या आधारे आपण कोरोनाशी लढू शकू.-ब्रह्माकुमारी मिनाक्षी दीदी, उपक्षेत्रीय निर्देशिका, प्रजापिता ब्रह्माकुमारीईश्वरीय विश्वविद्यालय, उत्तर महाराष्ट्र प्रमुख, नंदुरबार.