शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
4
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
5
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
6
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
7
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
8
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
9
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
10
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
11
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
12
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
13
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
14
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
15
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
16
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
17
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

संयम, नियम व अनुशासन हीच कोरोनाशी लढण्याची त्रिसूत्री...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 12:23 IST

आज संपूर्ण जग कोरानाच्या प्रभावाखाली आहे. सर्वच बाजूने त्याच्याशी मुकाबला करण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. शासन, प्रशासन, स्वयंसेवी ...

आज संपूर्ण जग कोरानाच्या प्रभावाखाली आहे. सर्वच बाजूने त्याच्याशी मुकाबला करण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. शासन, प्रशासन, स्वयंसेवी संस्था, डॉक्टर्स, वैद्यकीय क्षेत्रातील घटक सर्वच आपआपल्या परीने मदत करीत आहेत. संसर्ग होऊ नये म्हणून विलगीकरणासाठी दिलेल्या सूचना पाळण्यासाठी नागरिकही मदत करीत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून माध्यमातील बातम्या आणि कोरोनाची घेतलेली भीती, २४ तास घरात बसून राहण्याची सक्ती यामुळे मानवी मनावर एक प्रकारची अस्वस्थता दिसून येत आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री वा जागतिक आरोग्य संघटना आाणि इतर जबाबदार घटकांच्या आवाहनास प्रतिसाद देऊनही काही प्रमाणात लोक नियम पाळताना दिसत नाहीत. त्यासाठी काही छोट्य गोष्टी धारण केल्यास मानवी मन निश्चित सशक्त होऊन लढण्याची मानसिकता तयार होईल.आरोग्य जपण्यासाठीचे सर्व नियम तंतोतंत पाळणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्यकर्तव्य आहे. त्याचबरोबर तीन गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष दिल्यास हा प्रश्न लवकर मार्गी लागेल आणि त्या म्हणजे संयम, नियम आणि अनुशासन होय. जवळपास सर्वच धर्मात, आध्यात्मिक संप्रदायात, संतसाहित्यात संयमास अतिशय महत्वाचे स्थान आहे. भारतीय माणूस समाजप्रिय, समाजात मिसळणारा आहे. त्यास उत्सव, सण, परंपरा, रुढी आदीमध्ये रमून जाण्याची आवड आहे. शिवाय स्वभावात सतत काम करण्याची सवय असणाऱ्यांसाठी २४ तास घरात बसणे अवघड होत आहे. त्यामुळे अशावेळस संयम दाखविणे अत्यंत महत्वाचे आहे. संयम हा गुण लगेच आत्मसात करता येत नाही. त्यासाठी प्रदीर्घ अभ्यास लागतो मात्र ते कठीण अजिबात नाही. प्रयत्न केल्यास संयमित जीवन जगता येते आणि ते अवलंबून आहे दुसºया सूत्रांवर अर्थात नियमावर. म्हणून कोरोनाच्या लढाईत जिंकण्यासाठीचे दुसरे सूत्र म्हणजे नियम होय. काही नियम शासन, प्रशासनाने आखून दिले आहेत त्याचे तर पालन करावे पण आपल्या मनोबलास वाढविण्यासाठी काही छोटे-छोटे नियम तयार करावेत. जसे सकाळ-संध्याकाळ योगासने, प्राणायाम, ध्यान-धारणा अथवा आपल्या इष्ट देवाची, प्रार्थना, प्रेअर, नमाज जे काही आपण करतो तो. संयम, नियम याच्या जोडीला तिसरे सूत्र म्हणजे अनुशासन हा गुण होय. अनुशासन अर्थात शिस्त. घराबाहेर न पडणे, मास्क लावणे, हात धुणे या गोष्टी शिस्तीच्याच घटक आहेत. शिस्त हा गुणांची धारणा केल्यास निश्चित आपण यापासून लढू शकू. तेव्हा संयम, नियम आणि अनुशासन या त्रिसूत्रीच्या आधारे आपण कोरोनाशी लढू शकू.-ब्रह्माकुमारी मिनाक्षी दीदी, उपक्षेत्रीय निर्देशिका, प्रजापिता ब्रह्माकुमारीईश्वरीय विश्वविद्यालय, उत्तर महाराष्ट्र प्रमुख, नंदुरबार.