शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

मोड पुनर्वसन वसाहतीचा संसार पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 12:55 IST

वसंत मराठे ।  लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुराचे पाणी वसाहतीतील घरांमध्ये शिरुन ...

वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुराचे पाणी वसाहतीतील घरांमध्ये शिरुन मोड येथील प्रकल्प बाधीतांचा संपूर्ण संसारच वाहून गेला. घरांमधील पाणी ओसरल्यानंतर आता पुन्हा नव्याने संसार उभा करण्याचा मोठा प्रश्न या बाधीतांपुढे पडला आहे. शासनाने निदान पुरेसे रेशन व तातडीने आर्थिक मदत देण्याची अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली.सरदार सरोवर प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या अक्कलकुवा तालुक्यातील सिंदुरी, बामणी, डनेल या गावांमधील 38 कुटुंबांचे पुनर्वसन तळोदा तालुक्यातील मोड गावाजवळील वसाहतीत गेल्या जून महिन्यात करण्यात आले आहे. गुरुवारी व शुक्रवारी संपूर्ण तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वसाहतीपासून अवघ्या 500 फूट अंतरावर असलेल्या निझरा नदीच्या पुराचे पाणी संपूर्ण वसाहतीत शिरले. घरांमध्ये अक्षरश: तीन ते चार फुटार्पयत पाणी शिरल्याने साठवलेले गहू, ज्वारी, मका, सोयाबीन, तांदूळ यासह भांडी, कपडे व इतर साहित्य वाहून गेले. प्रशासनाने या कुटुंबांचे मोड येथील शाळेत स्थलांतर करुन तेथे भोजनाची व्यवस्था केली होती. शनिवारी सकाळी पावसाने उघडीप दिल्यानंतर पुराच्या पाण्याबरोबरच घरांमधील पाणीही ओसरले होते. त्यामुळे हे विस्थापित कुटुंबही पुन्हा आपल्या घरांकडे परतले. मात्र त्यांचा संपूर्ण संसारच वाहून गेला होता. घरांमध्ये केवळ गुडघाभर मातीचा गाळ साचला होता. मोड येथील सरपंच जयसिंग माळी यांनी त्यांना दाळ, तांदूळ, तेल व किराणा माल उपलब्ध करून दिल्यानंतर या बाधितांनी सामूहिक भोजन तयार करून एकत्र जेवण केले. त्यानंतर हे सर्व कुटुंब आपापल्या घरात साचलेला गाळ काढण्यात मग्न झाली होती. पुराच्या पाण्याने आपला संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाल्याचे दु:ख त्यांच्या चेह:यावर स्पष्ट दिसून आले. आता पुन्हा नवीन संसार कसा उभा करावा, अशी व्यथाही त्यांनी बोलून दाखवली. निदान शासनाने पुरेसे रेशन व तात्काळ आर्थिक मदत देण्याची अपेक्षा रमेश वसावे या बाधिताने बोलून दाखवली. नर्मदा विकास विभागाचे काही कर्मचारी मदतीसाठी उपस्थित असून जेसीबी मशीनच्या सहाय्याने पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू होते. आधीच वसाहतींमध्ये पाणीपुरवठा व वीज याव्यतिरिक्त कुठलीच सुविधा नाही. कच्चे रस्ते आहेत, गटारी नसल्याने पाण्याचा निचरा होत नाही. शासनाने घरांच्या प्लींथसाठी रक्कम मंजूर केली असली तरी जून महिन्यात त्यांचे स्थलांतर करण्यात आले होते. त्यामुळे घराचा पाया कसा बांधला जाईल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या नदीचा प्रवाहच काही शेतक:यांनी बंद केल्यामुळे पुराचे पाणी वसाहतीत शिरल्याचे या कुटुंबांनी सांगितले.  त्याचबरोबर शासनाने घरकूल योजनेतून पक्की घरे बांधून द्यावी, अशी मागणीही केली आहे. विशेष म्हणजे पावसामुळे तीन-चार दिवसांपासून वीजपुरवठाच खंडित झाल्यामुळे कौलारू छपरावरुन येणारे पावसाचे पाणी ते पिण्यासाठी वापरत असल्याचे सांगितले. जिल्हा परिषद शाळा, दवाखाना आदी सुविधाही तेथे नसल्याचे दिसून आले.