शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

मोड पुनर्वसन वसाहतीचा संसार पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 12:55 IST

वसंत मराठे ।  लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुराचे पाणी वसाहतीतील घरांमध्ये शिरुन ...

वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुराचे पाणी वसाहतीतील घरांमध्ये शिरुन मोड येथील प्रकल्प बाधीतांचा संपूर्ण संसारच वाहून गेला. घरांमधील पाणी ओसरल्यानंतर आता पुन्हा नव्याने संसार उभा करण्याचा मोठा प्रश्न या बाधीतांपुढे पडला आहे. शासनाने निदान पुरेसे रेशन व तातडीने आर्थिक मदत देण्याची अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली.सरदार सरोवर प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या अक्कलकुवा तालुक्यातील सिंदुरी, बामणी, डनेल या गावांमधील 38 कुटुंबांचे पुनर्वसन तळोदा तालुक्यातील मोड गावाजवळील वसाहतीत गेल्या जून महिन्यात करण्यात आले आहे. गुरुवारी व शुक्रवारी संपूर्ण तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वसाहतीपासून अवघ्या 500 फूट अंतरावर असलेल्या निझरा नदीच्या पुराचे पाणी संपूर्ण वसाहतीत शिरले. घरांमध्ये अक्षरश: तीन ते चार फुटार्पयत पाणी शिरल्याने साठवलेले गहू, ज्वारी, मका, सोयाबीन, तांदूळ यासह भांडी, कपडे व इतर साहित्य वाहून गेले. प्रशासनाने या कुटुंबांचे मोड येथील शाळेत स्थलांतर करुन तेथे भोजनाची व्यवस्था केली होती. शनिवारी सकाळी पावसाने उघडीप दिल्यानंतर पुराच्या पाण्याबरोबरच घरांमधील पाणीही ओसरले होते. त्यामुळे हे विस्थापित कुटुंबही पुन्हा आपल्या घरांकडे परतले. मात्र त्यांचा संपूर्ण संसारच वाहून गेला होता. घरांमध्ये केवळ गुडघाभर मातीचा गाळ साचला होता. मोड येथील सरपंच जयसिंग माळी यांनी त्यांना दाळ, तांदूळ, तेल व किराणा माल उपलब्ध करून दिल्यानंतर या बाधितांनी सामूहिक भोजन तयार करून एकत्र जेवण केले. त्यानंतर हे सर्व कुटुंब आपापल्या घरात साचलेला गाळ काढण्यात मग्न झाली होती. पुराच्या पाण्याने आपला संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाल्याचे दु:ख त्यांच्या चेह:यावर स्पष्ट दिसून आले. आता पुन्हा नवीन संसार कसा उभा करावा, अशी व्यथाही त्यांनी बोलून दाखवली. निदान शासनाने पुरेसे रेशन व तात्काळ आर्थिक मदत देण्याची अपेक्षा रमेश वसावे या बाधिताने बोलून दाखवली. नर्मदा विकास विभागाचे काही कर्मचारी मदतीसाठी उपस्थित असून जेसीबी मशीनच्या सहाय्याने पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू होते. आधीच वसाहतींमध्ये पाणीपुरवठा व वीज याव्यतिरिक्त कुठलीच सुविधा नाही. कच्चे रस्ते आहेत, गटारी नसल्याने पाण्याचा निचरा होत नाही. शासनाने घरांच्या प्लींथसाठी रक्कम मंजूर केली असली तरी जून महिन्यात त्यांचे स्थलांतर करण्यात आले होते. त्यामुळे घराचा पाया कसा बांधला जाईल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या नदीचा प्रवाहच काही शेतक:यांनी बंद केल्यामुळे पुराचे पाणी वसाहतीत शिरल्याचे या कुटुंबांनी सांगितले.  त्याचबरोबर शासनाने घरकूल योजनेतून पक्की घरे बांधून द्यावी, अशी मागणीही केली आहे. विशेष म्हणजे पावसामुळे तीन-चार दिवसांपासून वीजपुरवठाच खंडित झाल्यामुळे कौलारू छपरावरुन येणारे पावसाचे पाणी ते पिण्यासाठी वापरत असल्याचे सांगितले. जिल्हा परिषद शाळा, दवाखाना आदी सुविधाही तेथे नसल्याचे दिसून आले.