शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
3
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
4
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
5
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
7
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
8
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
9
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
10
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
11
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
12
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
13
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
14
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
15
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
16
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
17
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
18
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
19
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
20
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी

मोड पुनर्वसन वसाहतीचा संसार पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 12:55 IST

वसंत मराठे ।  लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुराचे पाणी वसाहतीतील घरांमध्ये शिरुन ...

वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुराचे पाणी वसाहतीतील घरांमध्ये शिरुन मोड येथील प्रकल्प बाधीतांचा संपूर्ण संसारच वाहून गेला. घरांमधील पाणी ओसरल्यानंतर आता पुन्हा नव्याने संसार उभा करण्याचा मोठा प्रश्न या बाधीतांपुढे पडला आहे. शासनाने निदान पुरेसे रेशन व तातडीने आर्थिक मदत देण्याची अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली.सरदार सरोवर प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या अक्कलकुवा तालुक्यातील सिंदुरी, बामणी, डनेल या गावांमधील 38 कुटुंबांचे पुनर्वसन तळोदा तालुक्यातील मोड गावाजवळील वसाहतीत गेल्या जून महिन्यात करण्यात आले आहे. गुरुवारी व शुक्रवारी संपूर्ण तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वसाहतीपासून अवघ्या 500 फूट अंतरावर असलेल्या निझरा नदीच्या पुराचे पाणी संपूर्ण वसाहतीत शिरले. घरांमध्ये अक्षरश: तीन ते चार फुटार्पयत पाणी शिरल्याने साठवलेले गहू, ज्वारी, मका, सोयाबीन, तांदूळ यासह भांडी, कपडे व इतर साहित्य वाहून गेले. प्रशासनाने या कुटुंबांचे मोड येथील शाळेत स्थलांतर करुन तेथे भोजनाची व्यवस्था केली होती. शनिवारी सकाळी पावसाने उघडीप दिल्यानंतर पुराच्या पाण्याबरोबरच घरांमधील पाणीही ओसरले होते. त्यामुळे हे विस्थापित कुटुंबही पुन्हा आपल्या घरांकडे परतले. मात्र त्यांचा संपूर्ण संसारच वाहून गेला होता. घरांमध्ये केवळ गुडघाभर मातीचा गाळ साचला होता. मोड येथील सरपंच जयसिंग माळी यांनी त्यांना दाळ, तांदूळ, तेल व किराणा माल उपलब्ध करून दिल्यानंतर या बाधितांनी सामूहिक भोजन तयार करून एकत्र जेवण केले. त्यानंतर हे सर्व कुटुंब आपापल्या घरात साचलेला गाळ काढण्यात मग्न झाली होती. पुराच्या पाण्याने आपला संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाल्याचे दु:ख त्यांच्या चेह:यावर स्पष्ट दिसून आले. आता पुन्हा नवीन संसार कसा उभा करावा, अशी व्यथाही त्यांनी बोलून दाखवली. निदान शासनाने पुरेसे रेशन व तात्काळ आर्थिक मदत देण्याची अपेक्षा रमेश वसावे या बाधिताने बोलून दाखवली. नर्मदा विकास विभागाचे काही कर्मचारी मदतीसाठी उपस्थित असून जेसीबी मशीनच्या सहाय्याने पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू होते. आधीच वसाहतींमध्ये पाणीपुरवठा व वीज याव्यतिरिक्त कुठलीच सुविधा नाही. कच्चे रस्ते आहेत, गटारी नसल्याने पाण्याचा निचरा होत नाही. शासनाने घरांच्या प्लींथसाठी रक्कम मंजूर केली असली तरी जून महिन्यात त्यांचे स्थलांतर करण्यात आले होते. त्यामुळे घराचा पाया कसा बांधला जाईल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या नदीचा प्रवाहच काही शेतक:यांनी बंद केल्यामुळे पुराचे पाणी वसाहतीत शिरल्याचे या कुटुंबांनी सांगितले.  त्याचबरोबर शासनाने घरकूल योजनेतून पक्की घरे बांधून द्यावी, अशी मागणीही केली आहे. विशेष म्हणजे पावसामुळे तीन-चार दिवसांपासून वीजपुरवठाच खंडित झाल्यामुळे कौलारू छपरावरुन येणारे पावसाचे पाणी ते पिण्यासाठी वापरत असल्याचे सांगितले. जिल्हा परिषद शाळा, दवाखाना आदी सुविधाही तेथे नसल्याचे दिसून आले.