शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

खापरखेडा धरणाची आमदारांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:34 IST

यावेळी आमदार डॉ. गावित म्हणाले की, शासनाच्या विविध योजनांतर्गत धरणातील गाळ काढण्याचा शासन प्रयत्न करीत असले तरी शेतकऱ्यांनीही आपल्या ...

यावेळी आमदार डॉ. गावित म्हणाले की, शासनाच्या विविध योजनांतर्गत धरणातील गाळ काढण्याचा शासन प्रयत्न करीत असले तरी शेतकऱ्यांनीही आपल्या स्तरावर गाळ काढून शेतीत टाकण्याचे नियोजन करावे. पाटबंधारे विभागाची लवकरच बैठक घेऊन त्यात खापरखेडासह जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या दुरुस्तीसाठी अंदाज पत्रक तयार करून परिसरातील हजारो हेक्‍टर शेती ओलिताखाली येऊन शेती पाणीदार करून हा परिसर सुजलाम् सुफलाम् करण्याचा आपला मानस आहे. शेतकरी सुखी, तर जग सुखी यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे, असे सांगितले.

शिवकृपा पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष लालचंद माळी यांनी धरणाची दुरुस्ती व गाळ काढण्याबाबत माहिती दिली. १९७० मध्ये धरणाचे बांधकाम झाले असून, या धरणामुळे हजारो एकर शेती बागायत होत होती. परंतु, सद्य:स्थितीत धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्यामुळे अत्यल्प पाणीसाठा असल्याने पुरेसे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून पाटबंधारे विभागाकडून या धरणाची दुरुस्ती करण्यात येऊन शासकीय यंत्रणेकडून गाळ काढण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने माळी यांनी केली. त्यावेळी पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता सचिन शिंदे व शाखा अभियंता भदाणे यांनी खापरखेडा धरणाबाबत माहिती दिली.

कायमस्वरूपी पाणीपुरवठा व

संरक्षण भिंतीची मागणी

खापरखेडा हे १०० टक्के आदिवासी लोकवस्तीचे गाव असून, या गावाला कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्हावा यासाठी नियोजन व्हावे. तसेच खापरखेडा धरणातून सँडवलद्वारे येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे मोठे भगदाड पडल्याने त्याला संरक्षण भिंत बांधणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याबाबत तत्काळ ग्रामसभेचा ठराव करून प्रस्ताव तयार करून पाठवा, अशा सूचना डॉ. गावित यांनी ग्रामस्थांसह ग्रामसेवकास दिल्या.

डॉ. कांतीलाल टाटीया, महात्मा ज्योतिबा फुले युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर माळी, उपसरपंच दिगंबर माळी. ग्रा. पं. सदस्य देवराम माळी, दीपक माळी, राकेश माळी, फेसचे माजी सरपंच मणिलाल पाटील, हिंगणीचे माजी सरपंच सुनील पाटील, खापरखेडाचे सरपंच देवा भिल, उपसरपंच जिजाबराव भिल, ग्रामसेवक प्रदीप पाटील, आदींसह जयनगर, वडाळी, कोंढावळ परिसरातील शेतकरी उपस्थित होते. गोरख वाल्हे यांनी सूत्रसंचालन केले, तर राकेश माळी यांनी आभार मानले.

केटीवेअर बंधाऱ्यांची पाहणी

कोंढावळ व खापरखेडा परिसरातील लघुसिंचन विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग स्थानिक स्तर या विविध विभागांमार्फत लाखो रुपये खर्च करून रंगूमती नदीवर केटीवेअर बंधारे गेल्या वर्षीच बांधण्यात आले आहेत. मात्र, ही कामे संबंधित ठेकेदाराकडून अंदाजपत्रकानुसार न झाल्याने बंधाऱ्यांना भगदाड पडून गळती लागल्याने साचलेले पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेल्याची माहिती उपस्थित शेतकऱ्यांनी देत तक्रारींचा पाढा वाचला. यावेळी आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी संतप्त होत निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.