शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

खापरखेडा धरणाची आमदारांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:34 IST

यावेळी आमदार डॉ. गावित म्हणाले की, शासनाच्या विविध योजनांतर्गत धरणातील गाळ काढण्याचा शासन प्रयत्न करीत असले तरी शेतकऱ्यांनीही आपल्या ...

यावेळी आमदार डॉ. गावित म्हणाले की, शासनाच्या विविध योजनांतर्गत धरणातील गाळ काढण्याचा शासन प्रयत्न करीत असले तरी शेतकऱ्यांनीही आपल्या स्तरावर गाळ काढून शेतीत टाकण्याचे नियोजन करावे. पाटबंधारे विभागाची लवकरच बैठक घेऊन त्यात खापरखेडासह जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या दुरुस्तीसाठी अंदाज पत्रक तयार करून परिसरातील हजारो हेक्‍टर शेती ओलिताखाली येऊन शेती पाणीदार करून हा परिसर सुजलाम् सुफलाम् करण्याचा आपला मानस आहे. शेतकरी सुखी, तर जग सुखी यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे, असे सांगितले.

शिवकृपा पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष लालचंद माळी यांनी धरणाची दुरुस्ती व गाळ काढण्याबाबत माहिती दिली. १९७० मध्ये धरणाचे बांधकाम झाले असून, या धरणामुळे हजारो एकर शेती बागायत होत होती. परंतु, सद्य:स्थितीत धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्यामुळे अत्यल्प पाणीसाठा असल्याने पुरेसे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून पाटबंधारे विभागाकडून या धरणाची दुरुस्ती करण्यात येऊन शासकीय यंत्रणेकडून गाळ काढण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने माळी यांनी केली. त्यावेळी पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता सचिन शिंदे व शाखा अभियंता भदाणे यांनी खापरखेडा धरणाबाबत माहिती दिली.

कायमस्वरूपी पाणीपुरवठा व

संरक्षण भिंतीची मागणी

खापरखेडा हे १०० टक्के आदिवासी लोकवस्तीचे गाव असून, या गावाला कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्हावा यासाठी नियोजन व्हावे. तसेच खापरखेडा धरणातून सँडवलद्वारे येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे मोठे भगदाड पडल्याने त्याला संरक्षण भिंत बांधणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याबाबत तत्काळ ग्रामसभेचा ठराव करून प्रस्ताव तयार करून पाठवा, अशा सूचना डॉ. गावित यांनी ग्रामस्थांसह ग्रामसेवकास दिल्या.

डॉ. कांतीलाल टाटीया, महात्मा ज्योतिबा फुले युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर माळी, उपसरपंच दिगंबर माळी. ग्रा. पं. सदस्य देवराम माळी, दीपक माळी, राकेश माळी, फेसचे माजी सरपंच मणिलाल पाटील, हिंगणीचे माजी सरपंच सुनील पाटील, खापरखेडाचे सरपंच देवा भिल, उपसरपंच जिजाबराव भिल, ग्रामसेवक प्रदीप पाटील, आदींसह जयनगर, वडाळी, कोंढावळ परिसरातील शेतकरी उपस्थित होते. गोरख वाल्हे यांनी सूत्रसंचालन केले, तर राकेश माळी यांनी आभार मानले.

केटीवेअर बंधाऱ्यांची पाहणी

कोंढावळ व खापरखेडा परिसरातील लघुसिंचन विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग स्थानिक स्तर या विविध विभागांमार्फत लाखो रुपये खर्च करून रंगूमती नदीवर केटीवेअर बंधारे गेल्या वर्षीच बांधण्यात आले आहेत. मात्र, ही कामे संबंधित ठेकेदाराकडून अंदाजपत्रकानुसार न झाल्याने बंधाऱ्यांना भगदाड पडून गळती लागल्याने साचलेले पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेल्याची माहिती उपस्थित शेतकऱ्यांनी देत तक्रारींचा पाढा वाचला. यावेळी आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी संतप्त होत निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.