शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

खापरखेडा धरणाची आमदारांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:34 IST

यावेळी आमदार डॉ. गावित म्हणाले की, शासनाच्या विविध योजनांतर्गत धरणातील गाळ काढण्याचा शासन प्रयत्न करीत असले तरी शेतकऱ्यांनीही आपल्या ...

यावेळी आमदार डॉ. गावित म्हणाले की, शासनाच्या विविध योजनांतर्गत धरणातील गाळ काढण्याचा शासन प्रयत्न करीत असले तरी शेतकऱ्यांनीही आपल्या स्तरावर गाळ काढून शेतीत टाकण्याचे नियोजन करावे. पाटबंधारे विभागाची लवकरच बैठक घेऊन त्यात खापरखेडासह जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या दुरुस्तीसाठी अंदाज पत्रक तयार करून परिसरातील हजारो हेक्‍टर शेती ओलिताखाली येऊन शेती पाणीदार करून हा परिसर सुजलाम् सुफलाम् करण्याचा आपला मानस आहे. शेतकरी सुखी, तर जग सुखी यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे, असे सांगितले.

शिवकृपा पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष लालचंद माळी यांनी धरणाची दुरुस्ती व गाळ काढण्याबाबत माहिती दिली. १९७० मध्ये धरणाचे बांधकाम झाले असून, या धरणामुळे हजारो एकर शेती बागायत होत होती. परंतु, सद्य:स्थितीत धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्यामुळे अत्यल्प पाणीसाठा असल्याने पुरेसे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून पाटबंधारे विभागाकडून या धरणाची दुरुस्ती करण्यात येऊन शासकीय यंत्रणेकडून गाळ काढण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने माळी यांनी केली. त्यावेळी पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता सचिन शिंदे व शाखा अभियंता भदाणे यांनी खापरखेडा धरणाबाबत माहिती दिली.

कायमस्वरूपी पाणीपुरवठा व

संरक्षण भिंतीची मागणी

खापरखेडा हे १०० टक्के आदिवासी लोकवस्तीचे गाव असून, या गावाला कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्हावा यासाठी नियोजन व्हावे. तसेच खापरखेडा धरणातून सँडवलद्वारे येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे मोठे भगदाड पडल्याने त्याला संरक्षण भिंत बांधणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याबाबत तत्काळ ग्रामसभेचा ठराव करून प्रस्ताव तयार करून पाठवा, अशा सूचना डॉ. गावित यांनी ग्रामस्थांसह ग्रामसेवकास दिल्या.

डॉ. कांतीलाल टाटीया, महात्मा ज्योतिबा फुले युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर माळी, उपसरपंच दिगंबर माळी. ग्रा. पं. सदस्य देवराम माळी, दीपक माळी, राकेश माळी, फेसचे माजी सरपंच मणिलाल पाटील, हिंगणीचे माजी सरपंच सुनील पाटील, खापरखेडाचे सरपंच देवा भिल, उपसरपंच जिजाबराव भिल, ग्रामसेवक प्रदीप पाटील, आदींसह जयनगर, वडाळी, कोंढावळ परिसरातील शेतकरी उपस्थित होते. गोरख वाल्हे यांनी सूत्रसंचालन केले, तर राकेश माळी यांनी आभार मानले.

केटीवेअर बंधाऱ्यांची पाहणी

कोंढावळ व खापरखेडा परिसरातील लघुसिंचन विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग स्थानिक स्तर या विविध विभागांमार्फत लाखो रुपये खर्च करून रंगूमती नदीवर केटीवेअर बंधारे गेल्या वर्षीच बांधण्यात आले आहेत. मात्र, ही कामे संबंधित ठेकेदाराकडून अंदाजपत्रकानुसार न झाल्याने बंधाऱ्यांना भगदाड पडून गळती लागल्याने साचलेले पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेल्याची माहिती उपस्थित शेतकऱ्यांनी देत तक्रारींचा पाढा वाचला. यावेळी आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी संतप्त होत निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.