शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

शहादा येथे शांतता कमिटीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 11:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील नवीन पोलीस स्टेशनच्या आवारात शनिवारी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. गणेशोत्वासह विविध सण-उत्सव ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील नवीन पोलीस स्टेशनच्या आवारात शनिवारी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. गणेशोत्वासह विविध सण-उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.बैठकीला आमदार उदेसिंग पाडवी, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, तहसीलदार मनोज खैरनार, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.राहुल वाघ, वीज कंपनीचे उपअभियंता डी.एन. पाटील, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील उपस्थित होते.पोलीस अधीक्षक पंडित म्हणाले की, सण-उत्सव साजरा करताना जनतेच्या व समाजाच्या भावना दुखावणार नाहीत अशा रितीने उत्सव साजरा करावा. गणेश मंडळांना प्रशासनाकडून तर प्रशासनाला गणेश मंडळांकडून सहकार्याची अपेक्षा असते. जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन 24 तास सज्ज असते.   प्रशासन जनतेच्या पाठिंब्याशिवाय काम करू शकत नाही असे सांगून गणेश मंडळांनी गुलालमुक्त विसर्जन मिरवणुका काढण्याचे आवाहनही त्यांनी केले. आमदार पाडवी म्हणाले की, सार्वजनिक सण-उत्सव यादरम्यान शांतता व कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी प्रशासनाची असली तरी  लोकप्रतिनिधी  व जनतेचीही ती मोठी जबाबदारी आहे. सण-उत्सव साजरा करताना जनतेच्या भावनांना ठेच पोहोचणार नाही याचे भान सर्वानी ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. अपर पोलीस अधीक्षक गवळी म्हणाले की, जनतेचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर असली तरी जनतेकडूनही प्रशासनाला सहकार्याची अपेक्षा असते. ज्या गणेश मंडळांनी डीजे श्री विसर्जन मिरवणुकीसाठी भाडे तत्त्वावर घेतले असतील तर तो करार मंडळांनी रद्द करावा. श्री विसर्जन मिरवणुकीत डीजे आढळून आल्यास चालक व वाहनावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी सण-उत्सवादरम्यान  शहरात स्वच्छता व पाणीपुरवठय़ासह पालिकेच्या अंतर्गत येणा:या सर्व सेवा जनतेला तातडीने पुरवण्याचे आश्वासन दिले. दीपक पाटील, डॉ.कांतीलाल टाटीया यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी सपकाळे यांनी केले.बैठकीला जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, जि.प. सदस्य अभिजित पाटील, माजी नगराध्यक्ष अशोक बागूल बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, प्रा.संजय जाधव, नगरसेवक संदीप पाटील, संजय साठे, ज्ञानेश्वर चौधरी, के.डी. पाटील, अब्बास नुरानी, इरफान पठाण, समीर जैन, ललित छाजेड, मनोज चोरडिया, अॅड.जसराज संचेती, सुपडू खेडकर, मनलेश जयस्वाल, अनिल भामरे, यशवंत चौधरी, प्रा.लियाकतअली सैयद, प्रा.डॉ.खालील शहा, गौरव जैन, पोलीस पाटील भगवान पाटील, पुरुषोत्तम पाटील यांच्यासह शांतता कमिटीचे सदस्य, गणेश मंडळांचे पदाधिकारी, तालुक्यातील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.सुनील साळुंखे यांनी तर आभार पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी मानले.

गुलालाचा कमी वापरकरण्याचे आवाहन415 दिवसांपूर्वी निमगूळ गावाजवळ झालेल्या बस अपघातात शहरातील आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांना  श्रद्धांजली वाहण्यासाठी गणेश मंडळांनी उत्सव साजरा करताना सामाजिक भान ठेवत श्री विसजर्न मिरवणुकीत  गुलालाचा कमी वापर करून  शिल्लक रकमेतून अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत करावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी बैठकीत केले.4गणेशोत्सवानिमित्त काढण्यात  येणा:या मिरवणुकीत डीजे आढळून आल्यास चालक व वाहनावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.