शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

गावामध्ये कुपोषण, शहरात अतिपोषण, कोरोनाकाळात दिसलीय तफावत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:37 IST

नंदुरबार : कोरोना काळात शहरी व ग्रामीण भागात मुलांमधील पोषणाच्या प्रमाणात तफावत आढळून आली. ग्रामीण भागात कुपोषण ...

नंदुरबार : कोरोना काळात शहरी व ग्रामीण भागात मुलांमधील पोषणाच्या प्रमाणात तफावत आढळून आली. ग्रामीण भागात कुपोषण वाढले तर शहरी भागातील मुलांमधील पोषण वाढून त्यांच्यातील स्थूलता वाढल्याचे दिसून आले. नुकत्याच झालेल्या एका पाहणीत ही बाब समोर आली.

लॅाकडाऊन व कोरोना काळात वेळेवर पोषण आहार न पोहचणे, पुरेसा आहार न भेटणे यामुळे ग्रामीण भागात विशेषत: सातपुड्यातील दुर्गम भागात कुपोषणाचे प्रमाण वाढले होते. आकडेवारीतूनही ते समोर आले होते. कुपोषण कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. शहरी भागात मुलांची स्थूलता कमी करण्यासाठी मात्र पालकांचे टेन्शन वाढल्याचे चित्र आहे.

कारणे काय?

n शहरी भागात कोरोना काळात मुले बाहेर निघाली नाहीत, मैदानी खेळ खेळले नाहीत, घरात बसून राहण्यामुळे स्थूलता वाढली.

n शाळांनी देखील ऑनलाइन वर्ग सुरू केले. त्यामुळे मुलं सलग काही तास मोबाइल, लॅपटॅापसमोर बसून राहिली त्यामुळेही स्थूलतेची समस्या पुढे आली आहे.

n फास्टफूडचे अतिसेवन सद्या वाढत चालले आहे. त्यामुळे मुलांमधील वजन वाढल्याने त्यांना आजारांची भीती आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात...

मुलांना मुक्तपणे खेळू द्या, सतत अभ्यास आणि टीव्हीसमोर बसून राहू देऊ नका. जेवढा त्यांचा शारीरिक व्यायाम होईल, शारीरिक हालचाल होईल तेवढे त्यांचे पोषण होऊन शरीर निरोगी राहील, असे तज्ज्ञांचे मत आहे.

सद्या मुलं मैदानी खेळ विसरले आहेत. आपल्या परिसरात, कॉलनीत मोकळे मैदान असेल तर अशा ठिकाणी मुलांना आवर्जून खेळण्यासाठी पाठवा. सकाळी किंवा सायंकाळी आपल्यासोबत फिरण्यास घेऊन जाऊ शकता. घरातल्या घरात प्राणायाम, योगासने करण्याची सवय त्यांना लावा. यामुळे शारीरिक हालचाली होतील आणि त्यांच्यातील स्थूलता कमी होईल, असे काही वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

कोरोना काळात योग्य पोषण आहार भेटला नाही, आरोग्य सुविधा वेळेवर पोहचल्या नाहीत. त्यामुळे कुपोषित बालकांची संख्या वाढली. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली. पोषण पुनर्वसन केंद्रात बालकाला ठेवले होते. आता त्यात सुधारणा होत आहे.

-एक पालक, अक्कलकुवा तालुका.

कोरोना काळात मुलाचे वजन वाढले, स्थूलता वाढली. वारंवार टीव्हीसमोर बसणे, अभ्यासासाठी लॅपटॅापसमोर बसणे यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. डॅाक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू आहेत. -एक पालक, नंदुरबार.

n स्थूल शरीर असलेल्या मुलांना काही व्याधी लागण्याची शक्यता असते. लहान वयात व्याधी लागल्या तर आयुष्यभर त्यापासून सुटकारा मिळणे कठीण असते.

n गेल्या काही वर्षात शहरी भागातील मुलांच्या स्थूलतेबाबतची समस्या वाढू लागली आहे. यासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.