शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

सातपुड्यात कुपोषण कमी, पण ते फक्त कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 04:51 IST

आकडेवारीचा खेळ किती दिवस चालणार?। वास्तव समोर येण्याची गरज

रमाकांत पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील कुपोषणाचा वस्तुनिष्ठ अहवाल समोर येतच नाही. प्रत्यक्षातील बालमृत्यू, कुपोषित बालके आणि कागदावरील आकडे याच्यात मोठी तफावत आढळते. वास्तव समोर नाही आले तर त्यावरील उपाय कसे सापडतील, असा सवाल तज्ज्ञांमधून उपस्थित केला जात आहे.सन २००० नंतर बालमृत्यूची आणि कुपोषणाची वस्तुस्थिती लपविली जात आहे. या काळात जेव्हा जेव्हा अहवालावर आक्षेप घेण्यात आला आणि फेरसर्वेक्षण झाले तेव्हा त्यात ही तफावत समोर आली आहे. यंदाचा ताजा अहवाल पाहा. एकूण सर्वेक्षित बालकांची संख्या १ लाख ७४ हजार तर वजन घेतलेल्या बालकांची संख्या १ लाख ६३ हजार आहे. मग १३ हजार बालके गेली कुठे? त्यांच्यासाठी आहार दिला जातो, पण वजन न घेतल्याने ते कुपोषित आहेत की सर्वसाधारण, की त्यातील काही बालकांचा मृत्यू झाला? असे अनेक प्रश्न समोर येतात. त्यामुळे कुपोषित बालके, बालमृत्यू यांच्या वास्तव नोंदी होऊन ते अहवालात येणे आवश्यक आहे. त्यासाठी वर्षातून किमान दोनदा समवर्ती मूल्यमापन करण्याची गरज आहे. कुपोषण आणि नंदुरबार जिल्हा हे नाव इतके घट्ट चिकटले आहे की वर्षानुवर्षे अनेक प्रयोग करूनही ते दूर होऊ शकलेले नाही. गेल्या चार दशकांत हजारो बालके दगावली. चार वेळा तत्कालीन मुख्यमंत्री आले. अनेक योजना जाहीर झाल्या, कोट्यवधींचा खर्च झाला; पण कुपोषण आहे तेथेच आहे.जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा, तळोदा आणि शहादा तालुक्यातील हजारो पाडे सातपुड्यातील अतिदुर्गम भागात विस्तारले आहेत. त्याठिकाणी रस्तेच पोहोचले नसल्याने इतर सुविधा मिळणे दूरच. दुसरीकडे ज्या पाड्यांपर्यंत, गावांपर्यंत रस्ते व सुविधा पोहोचल्या त्या गावांपर्यंतदेखील कर्मचारी व अधिकारी नियमित जात नाहीत. त्यामुळे दोन्ही ठिकाणची परिस्थिती ‘रामभरोसे’ आहे.सातपुड्यातील दुर्गम भागात रस्तेच नसल्याने तेथून रुग्णांना दवाखान्यात बांबूला झोळी बांधून नेले जाते. दुर्दैवाने ज्या भागात रस्ते झाले त्या भागात बहुतांश वेळा रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्या भागातही अशाच झोळीचा वापर करावा लागतो.नंदुरबार जिल्हा हा दरडोई उत्पन्न आणि साक्षरतेच्या बाबतीत राज्यात शेवटचा आहे. जिल्ह्यातील ७२ टक्के कुटुंबे दारिद्र्यरेषेखालील आहेत, तर आदिवासी महिलांमधील साक्षरता केवळ २८ टक्के आहे.जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण २६ टक्क्यांहून अधिक आहे. तसेच कमी वयात माता होणे व दोन अपत्यातील अंतर कमीचे प्रमाणही अधिक आहे. कुपोषणासाठी हे सर्वात घातक आहे. संस्कृती, परंपरेचा त्यावर पगडा असल्याने हे प्रमाण वाढले आहे.

च्सातपुड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे नमुनेदार. पूर्वी ‘पिशवी शाळा’ म्हणून त्या गाजल्या. शिक्षकांच्या पिशवीतच वर्ग सुरू राहायचे. अलीकडे बहुतांश शाळांवर शिक्षक न जाता पर्यायी शिक्षक नेमण्याचे प्रकारही वाढले. १९९५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी हे खडकी (ता.धडगाव) येथे कुपोषणाच्या पाहणीसाठी गेले होते. त्यावेळी कुंड्या या गावातील ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला.च्गावाचे प्रश्न विचारल्यावर माहिती सांगण्यासाठी तेथील शिक्षक समोर आला. त्यावेळी ग्रामस्थ अचंबित झाले आणि मुख्यमंत्र्यांसमोर गावातीलच एक तरुण आणून आमच्या गावाचे शिक्षक हे आहेत असे दाखवले. मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली असता शिक्षकाने त्या तरुणाला ५०० रुपये दरमहा देऊन पर्यायी शिक्षक नेमल्याचे समोर आले. २०-२२ वर्षांनंतरही हे चित्र कमी अधिक प्रमाणात कायम आहे.