शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

सातपुड्यात कुपोषण कमी, पण ते फक्त कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 04:51 IST

आकडेवारीचा खेळ किती दिवस चालणार?। वास्तव समोर येण्याची गरज

रमाकांत पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील कुपोषणाचा वस्तुनिष्ठ अहवाल समोर येतच नाही. प्रत्यक्षातील बालमृत्यू, कुपोषित बालके आणि कागदावरील आकडे याच्यात मोठी तफावत आढळते. वास्तव समोर नाही आले तर त्यावरील उपाय कसे सापडतील, असा सवाल तज्ज्ञांमधून उपस्थित केला जात आहे.सन २००० नंतर बालमृत्यूची आणि कुपोषणाची वस्तुस्थिती लपविली जात आहे. या काळात जेव्हा जेव्हा अहवालावर आक्षेप घेण्यात आला आणि फेरसर्वेक्षण झाले तेव्हा त्यात ही तफावत समोर आली आहे. यंदाचा ताजा अहवाल पाहा. एकूण सर्वेक्षित बालकांची संख्या १ लाख ७४ हजार तर वजन घेतलेल्या बालकांची संख्या १ लाख ६३ हजार आहे. मग १३ हजार बालके गेली कुठे? त्यांच्यासाठी आहार दिला जातो, पण वजन न घेतल्याने ते कुपोषित आहेत की सर्वसाधारण, की त्यातील काही बालकांचा मृत्यू झाला? असे अनेक प्रश्न समोर येतात. त्यामुळे कुपोषित बालके, बालमृत्यू यांच्या वास्तव नोंदी होऊन ते अहवालात येणे आवश्यक आहे. त्यासाठी वर्षातून किमान दोनदा समवर्ती मूल्यमापन करण्याची गरज आहे. कुपोषण आणि नंदुरबार जिल्हा हे नाव इतके घट्ट चिकटले आहे की वर्षानुवर्षे अनेक प्रयोग करूनही ते दूर होऊ शकलेले नाही. गेल्या चार दशकांत हजारो बालके दगावली. चार वेळा तत्कालीन मुख्यमंत्री आले. अनेक योजना जाहीर झाल्या, कोट्यवधींचा खर्च झाला; पण कुपोषण आहे तेथेच आहे.जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा, तळोदा आणि शहादा तालुक्यातील हजारो पाडे सातपुड्यातील अतिदुर्गम भागात विस्तारले आहेत. त्याठिकाणी रस्तेच पोहोचले नसल्याने इतर सुविधा मिळणे दूरच. दुसरीकडे ज्या पाड्यांपर्यंत, गावांपर्यंत रस्ते व सुविधा पोहोचल्या त्या गावांपर्यंतदेखील कर्मचारी व अधिकारी नियमित जात नाहीत. त्यामुळे दोन्ही ठिकाणची परिस्थिती ‘रामभरोसे’ आहे.सातपुड्यातील दुर्गम भागात रस्तेच नसल्याने तेथून रुग्णांना दवाखान्यात बांबूला झोळी बांधून नेले जाते. दुर्दैवाने ज्या भागात रस्ते झाले त्या भागात बहुतांश वेळा रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्या भागातही अशाच झोळीचा वापर करावा लागतो.नंदुरबार जिल्हा हा दरडोई उत्पन्न आणि साक्षरतेच्या बाबतीत राज्यात शेवटचा आहे. जिल्ह्यातील ७२ टक्के कुटुंबे दारिद्र्यरेषेखालील आहेत, तर आदिवासी महिलांमधील साक्षरता केवळ २८ टक्के आहे.जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण २६ टक्क्यांहून अधिक आहे. तसेच कमी वयात माता होणे व दोन अपत्यातील अंतर कमीचे प्रमाणही अधिक आहे. कुपोषणासाठी हे सर्वात घातक आहे. संस्कृती, परंपरेचा त्यावर पगडा असल्याने हे प्रमाण वाढले आहे.

च्सातपुड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे नमुनेदार. पूर्वी ‘पिशवी शाळा’ म्हणून त्या गाजल्या. शिक्षकांच्या पिशवीतच वर्ग सुरू राहायचे. अलीकडे बहुतांश शाळांवर शिक्षक न जाता पर्यायी शिक्षक नेमण्याचे प्रकारही वाढले. १९९५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी हे खडकी (ता.धडगाव) येथे कुपोषणाच्या पाहणीसाठी गेले होते. त्यावेळी कुंड्या या गावातील ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला.च्गावाचे प्रश्न विचारल्यावर माहिती सांगण्यासाठी तेथील शिक्षक समोर आला. त्यावेळी ग्रामस्थ अचंबित झाले आणि मुख्यमंत्र्यांसमोर गावातीलच एक तरुण आणून आमच्या गावाचे शिक्षक हे आहेत असे दाखवले. मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली असता शिक्षकाने त्या तरुणाला ५०० रुपये दरमहा देऊन पर्यायी शिक्षक नेमल्याचे समोर आले. २०-२२ वर्षांनंतरही हे चित्र कमी अधिक प्रमाणात कायम आहे.