शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

तळोदा तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:22 IST

गेल्या गुरुवारी रात्री तळोदा तालुक्यातील नर्मदानगर, सरदारनगर, वाल्हेरी या परिसरात वादळी वाऱ्यासह दमदार अवकाळी पाऊस झाला होता. दुसऱ्या दिवशीही ...

गेल्या गुरुवारी रात्री तळोदा तालुक्यातील नर्मदानगर, सरदारनगर, वाल्हेरी या परिसरात वादळी वाऱ्यासह दमदार अवकाळी पाऊस झाला होता. दुसऱ्या दिवशीही संपूर्ण तालुक्यात सलग दोन दिवस पाऊस पडला. यात रब्बी ज्वारी, हरभरा, गहू या पिकांना फटका बसला होता. त्यातही नर्मदानगर, सरदारनगर, वाल्हेरी व रेटपदा येथील रब्बी ज्वारी अर्थात दादर पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. हे पीक अक्षरशः भुईसपाट झाले होते. बहुतेक शेतकऱ्यांचे पीक परिपक्व झाल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षाबरोबरच यंदाही अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाकडे नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत तक्रारी केल्यानंतर महसूल व तालुका कृषी कार्यालयाने युद्धपातळीवर प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे सुरू केले आहेत. साधारण २०० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांचे नुकसान झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करून तातडीने पुढील कार्यवाहीसाठी अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठवणार असल्याचे सांगण्यात आले. तालुक्यात जवळपास २५० शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. सर्वांत जास्त नुकसान तालुक्यातील नर्मदानगर या सरदार सरोवर प्रकल्पातील विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांचे झाले आहे. मोठ्या मेहनतीने त्यांनी कष्ट करून दादर पीक वाढवले होते. ते परिपक्वदेखील झाले होते. परंतु अस्मानी संकटाने तेही हिरावून नेले. साहजिकच आम्ही शेतकरी अक्षरशः कर्जबाजारी झाल्याची व्यथा त्यांनी बोलून दाखवली आहे. आधीच अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्ण वाया गेला होता. थोडीफार रब्बीवर आशा होती तीही धुळीस मिळाली आहे. निदान शासनाने तरी या आर्थिक फटक्यातून सावरण्यासाठी आर्थिक मदत करावी, अशी त्यांची मागणी आहे.

तळोदा तालुक्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या रब्बी हंगामातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांपासून सुरू करण्यात आले आहेत. पुढील दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करून प्रशासनास अहवाल सादर करण्यात येईल.

- नरेंद्र महाले, तालुका कृषी अधिकारी, तळोदा.

वादळी पावसामुळे माझ्या दादर पिकाचे पूर्ण नुकसान झाले आहे. झालेला खर्चदेखील निघणार नाही. घेतलेले कर्ज कसे फिटणार या चिंतेत आहे. तलाठी व कृषी कर्मचारी शेतावर आले होते. ते केवळ पाहणी करून गेले. अजून पंचनामा बाकी आहे.

-चांद्या पाडवी, शेतकरी, नर्मदानगर, ता. तळोदा.