शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

नगर भूमापन कार्यालयाला ताळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 12:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : येथील नगर भूमापन कार्यालयातील संबंधित अधिकारी रजेवर असल्यामुळे कार्यालयास ताळे लागले असून, त्यांच्याकडून मिळणारे ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : येथील नगर भूमापन कार्यालयातील संबंधित अधिकारी रजेवर असल्यामुळे कार्यालयास ताळे लागले असून, त्यांच्याकडून मिळणारे प्रॉपर्टी कार्ड व नकाशांसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहे. एवढेच नव्हे याअभावी दुय्यम निबंधक कार्यातील काही कामेही प्रभावित झाल्याचे नागरिक सांगतात. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन तातडीने पर्यायी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे. तळोदा येथील नगर भूमापन कार्यातील संबंधित अधिकारी रजेवर गेले आहेत. त्यामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून कार्यालयासदेखील ताळे लावण्यात आले आहे. परिणामी नागरिकांची तेथील कामे सुद्धा ठप्प झाले आहेत. विशेषत: नागरिकांना येथून त्यांचे मालमत्तेचे प्रॉपर्टी कार्ड, नकाशे यासारखे महत्त्वाची दस्तऐवज मिळत नाही. त्यांच्या शिवाय दुय्यम निबंधक कार्यालयातील रजिस्ट्रेशन अभावी गहाण खत, खरेदीखत, हक्क सोड होत नाही. त्याकरिता शहरातील व ग्रामीण भागातील नागरिक दररोज कार्यालयाकडे सारखे हेलपाटे मारत आहेत. यात त्यांचा वेळ, पैसा वाया जात आहे. तरीही कामे होत नसल्याने निराश होऊन परतावे लागत असल्याची व्यथा काहींनी बोलून दाखवली आहे. वास्तविक हे महत्त्वाचे दस्तावेज असल्यामुळे  दुय्यम निबंधक कार्यालयातील रजिस्ट्रेशनची कामेही प्रभावित झाल्याचे नागरिक म्हणतात. याप्रकरणी भूमिअभिलेख कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यास विचारले असता. त्या कर्मचारीने रजेचा अर्ज दिला आहे. अजून रजा मंजूर करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर त्यांची ग्रामपंचायत निवडणूक कमी महसूल प्रशासनाने नियुक्ती केली आहे, असे असले तरी लवकरच  पर्यायी कर्मचारी देण्यात  येणार असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांचे होत असलेले हाल  लक्षात घेऊन तत्काळ पर्यायी कर्मचारी नियुक्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा या विरोधात नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

भूमिलेख कार्यालयही प्रभारीवर                   येथील भूमिलेख कार्यालयातील तत्कालीन भूमिलेख अधीक्षकांची इतरत्र बदली झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून हे कार्यालय प्रभारीवर चालू आहे. कारण नंदुरबार कार्यालयातील अधिकारींकडे अतिरिक्त चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे साहजिकच ते दोघं कार्यालयास पुरेसा न्याय देऊ शकत नाही. परिणामी कामेदेखील वेळेवर पूर्ण होत नसल्याच्या नागरिकांचा आरोप आहे. आधीच महत्त्वाच्या दस्तऐवजवर त्यांची स्वाक्षरी शिवाय पुढे सरकत नाही. शेतकरी वर्गास बँकेच्या कर्जाकरिता बोजा चढविण्याकरिताही फीर फीर करावी लागत आहे. निदान शासनाने नागरिकांच्या मालमत्तेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या सदर नवीन, नियमित अधिकारीच नियुक्ती करावी, अशी अपेक्षा आहे.

भूमिलेख कार्यालयही प्रभारीवर येथील भूमिलेख कार्यालयातील तत्कालीन भूमिलेख अधीक्षकांची इतरत्र बदली झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून हे कार्यालय प्रभारीवर चालू आहे. कारण