शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
2
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
3
Jagdeep Dhankhar: धनखड यांच्यापूर्वी 'या' दोन व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा?
4
"माझ्या डोळ्यासमोरच मित्राचा जळून मृत्यू..."; विद्यार्थ्याने सांगितली काळजात चर्र करणारी घटना
5
"एकनाथ शिंदेंची ताकद ८ आमदारांची होती, इतर जे गेले ते..."; संजय राऊतांचा नवा दावा
6
₹८,१०० च्या वर जाऊ शकतो केबल बनवणाऱ्या कंपनीचा स्टॉक; बाजारातील चढ-उतारादरम्यान या ५ स्टॉक्सवर एक्सपर्ट बुलिश
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनापूर्वी गुड न्यूज! महागाई भत्त्यात ३ ते ४% वाढ होण्याची शक्यता, किती पगार वाढणार?
8
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
9
Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात
10
"मुलाला नाच्या बनवायचंय का?", कथ्थक शिकणाऱ्या अभिनेत्याच्या आईवडिलांना हिणवायचे नातेवाईक, सांगितला बालपणीचा प्रसंग
11
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
12
डॉ निलेश साबळेची 'स्टार प्रवाह'वर दमदार एन्ट्री, 'शिट्टी वाजली रे'च्या अंतिम सोहळ्याला हजेरी; प्रोमो पाहिलात का?
13
आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का
14
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
15
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
16
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
17
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
18
"ऑपरेशन झाल्यावर २९ गाठी आढळल्या.."; अभिनेते विजय पटवर्धन यांच्या पत्नीला झालेला कॅन्सर, सांगितला अनुभव
19
मुंबई बॉम्बस्फोट: ९ वर्षे जगण्यासाठी झुंजला पराग सावंत, कुटुंबियांना आजही दु:ख
20
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?

नगर भूमापन कार्यालयाला ताळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 12:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : येथील नगर भूमापन कार्यालयातील संबंधित अधिकारी रजेवर असल्यामुळे कार्यालयास ताळे लागले असून, त्यांच्याकडून मिळणारे ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : येथील नगर भूमापन कार्यालयातील संबंधित अधिकारी रजेवर असल्यामुळे कार्यालयास ताळे लागले असून, त्यांच्याकडून मिळणारे प्रॉपर्टी कार्ड व नकाशांसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहे. एवढेच नव्हे याअभावी दुय्यम निबंधक कार्यातील काही कामेही प्रभावित झाल्याचे नागरिक सांगतात. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन तातडीने पर्यायी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे. तळोदा येथील नगर भूमापन कार्यातील संबंधित अधिकारी रजेवर गेले आहेत. त्यामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून कार्यालयासदेखील ताळे लावण्यात आले आहे. परिणामी नागरिकांची तेथील कामे सुद्धा ठप्प झाले आहेत. विशेषत: नागरिकांना येथून त्यांचे मालमत्तेचे प्रॉपर्टी कार्ड, नकाशे यासारखे महत्त्वाची दस्तऐवज मिळत नाही. त्यांच्या शिवाय दुय्यम निबंधक कार्यालयातील रजिस्ट्रेशन अभावी गहाण खत, खरेदीखत, हक्क सोड होत नाही. त्याकरिता शहरातील व ग्रामीण भागातील नागरिक दररोज कार्यालयाकडे सारखे हेलपाटे मारत आहेत. यात त्यांचा वेळ, पैसा वाया जात आहे. तरीही कामे होत नसल्याने निराश होऊन परतावे लागत असल्याची व्यथा काहींनी बोलून दाखवली आहे. वास्तविक हे महत्त्वाचे दस्तावेज असल्यामुळे  दुय्यम निबंधक कार्यालयातील रजिस्ट्रेशनची कामेही प्रभावित झाल्याचे नागरिक म्हणतात. याप्रकरणी भूमिअभिलेख कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यास विचारले असता. त्या कर्मचारीने रजेचा अर्ज दिला आहे. अजून रजा मंजूर करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर त्यांची ग्रामपंचायत निवडणूक कमी महसूल प्रशासनाने नियुक्ती केली आहे, असे असले तरी लवकरच  पर्यायी कर्मचारी देण्यात  येणार असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांचे होत असलेले हाल  लक्षात घेऊन तत्काळ पर्यायी कर्मचारी नियुक्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा या विरोधात नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

भूमिलेख कार्यालयही प्रभारीवर                   येथील भूमिलेख कार्यालयातील तत्कालीन भूमिलेख अधीक्षकांची इतरत्र बदली झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून हे कार्यालय प्रभारीवर चालू आहे. कारण नंदुरबार कार्यालयातील अधिकारींकडे अतिरिक्त चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे साहजिकच ते दोघं कार्यालयास पुरेसा न्याय देऊ शकत नाही. परिणामी कामेदेखील वेळेवर पूर्ण होत नसल्याच्या नागरिकांचा आरोप आहे. आधीच महत्त्वाच्या दस्तऐवजवर त्यांची स्वाक्षरी शिवाय पुढे सरकत नाही. शेतकरी वर्गास बँकेच्या कर्जाकरिता बोजा चढविण्याकरिताही फीर फीर करावी लागत आहे. निदान शासनाने नागरिकांच्या मालमत्तेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या सदर नवीन, नियमित अधिकारीच नियुक्ती करावी, अशी अपेक्षा आहे.

भूमिलेख कार्यालयही प्रभारीवर येथील भूमिलेख कार्यालयातील तत्कालीन भूमिलेख अधीक्षकांची इतरत्र बदली झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून हे कार्यालय प्रभारीवर चालू आहे. कारण