शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

रिमझिम पावसाने पिकांना हलकासा आधार; मात्र नदी-तलाव कोरडेठाकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:34 IST

बामखेडा : गेल्या दीड महिन्यापासून उघडीप दिलेल्या पावसाने आता कुठे रिमझिम पावसाला सुरुवात केली आहे. या पडलेल्या रिमझिम पावसामुळे ...

बामखेडा : गेल्या दीड महिन्यापासून उघडीप दिलेल्या पावसाने आता कुठे रिमझिम पावसाला सुरुवात केली आहे. या पडलेल्या रिमझिम पावसामुळे करपून चाललेल्या पिकांना काही अंशी हलकासा आधार मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहादा तालुक्यात पावसाचा खंड पडल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशीच परिस्थिती राहीली तर दिवसें-दिवस पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. तालुक्यातील सुसरी धरण, दरा प्रकल्प तसेच लहान-मोठे तलाव, केटीवेयर बंधारे, जलस्वराज्य प्रकल्प आदी अद्यापही कोरडेठाकच आहेत. त्यामुळे पावसाळा संपत आला तरीही मोठ्या पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

शहादा तालुक्यामध्ये कापूस, तुर, सोयाबीन, उडीद, पपई, केळी, मिरची यासह शेतकऱ्यांनी आदी प्रमुख पिके घेतली आहे. पीक मोठ्या जोमात आलेले आसाताना मागील आठवड्यात पावसाने काही अंशी हजेरी लावली. चांगला पाऊस बरसेल अशी आशा असताना परत हुलकावणी दिल्याने ऐन बहरात आलेल्या सोयाबीन, मूग, उडीद या पिकांचा पुरता धुराळा उडाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आता कुठे दोन दिवसांपूर्वी तुरळक प्रमाणात रिमझिम पाऊस झाल्याने थोड्या प्रमाणात पिकांना जीवनदान मिळाले आहे. हवामान विभागाने यावर्षी गतवर्षीप्रमाणेच पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पावसाला सुरुवात झाली होती. वेळेवर व चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात पिकाची लागवड केली. पीक उगवणीवर आल्यानंतर पावसाने हुलकावणी दिली. त्यानंतर दुबार पेरणीचे संकट ओढवले, तरीही बळीराजाला अपेक्षा होती की, पाऊस पडेल. त्यामुळे शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात खत पेरून फवारणी केली. परंतु मध्यंतरी दीड महिन्यापासून तालुक्यातून पाऊस गायब झाल्याने हातातोंडाशी आलेला घास या निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावू लागला आहे. गेल्या आठवड्यात गत दोन-तीन दिवसामध्ये कुठे रिमझिम तर कुठे हलक्या स्वरूपाच्या सरी बरसल्या होत्या. यामुळे मूग, उडीद सोडता इतर पिकांना हलकासा आधार झाला आहे. त्यातच या आठवड्यात कडक ऊन पडल्याने जमिनीतील ओलावा हा कमी होत आहे. तर नदी, नाले, तलाव हे अद्यापही कोरडेठाकच आहेत. त्यामुळे शेतकरी हे अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा करत आहे.

गेल्या आठवड्यात दोन ते तीन दिवस पाऊस झाल्याने कापूस व इतर पिकांना थोडाफार आधार झाला आहे. मूग, उडीद हे गेल्यात जमा आहे. त्यातच ऊन हे कडक पडू लागल्याने ओलावा हा कमी होत आहे. जोरदार पावसाअभावी नदी-तलाव भरले नाहीत. परिणामी विहिरी व कूपनलिका आता तळ गाठू लागल्या आहेत. जोरदार पाऊस नाही झाला तर हाताशी आलेल्या पिकांचेही अतोनात नुकसान होऊन भविष्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होईल. - सुहास चौधरी, शेतकरी, बामखेडा