शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
4
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
5
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
6
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
7
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
8
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
9
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
10
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
11
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
12
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
13
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
15
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
16
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
17
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
18
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
19
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
20
Microsoft Layoffs : एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

रिमझिम पावसाने पिकांना हलकासा आधार; मात्र नदी-तलाव कोरडेठाकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:34 IST

बामखेडा : गेल्या दीड महिन्यापासून उघडीप दिलेल्या पावसाने आता कुठे रिमझिम पावसाला सुरुवात केली आहे. या पडलेल्या रिमझिम पावसामुळे ...

बामखेडा : गेल्या दीड महिन्यापासून उघडीप दिलेल्या पावसाने आता कुठे रिमझिम पावसाला सुरुवात केली आहे. या पडलेल्या रिमझिम पावसामुळे करपून चाललेल्या पिकांना काही अंशी हलकासा आधार मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहादा तालुक्यात पावसाचा खंड पडल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशीच परिस्थिती राहीली तर दिवसें-दिवस पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. तालुक्यातील सुसरी धरण, दरा प्रकल्प तसेच लहान-मोठे तलाव, केटीवेयर बंधारे, जलस्वराज्य प्रकल्प आदी अद्यापही कोरडेठाकच आहेत. त्यामुळे पावसाळा संपत आला तरीही मोठ्या पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

शहादा तालुक्यामध्ये कापूस, तुर, सोयाबीन, उडीद, पपई, केळी, मिरची यासह शेतकऱ्यांनी आदी प्रमुख पिके घेतली आहे. पीक मोठ्या जोमात आलेले आसाताना मागील आठवड्यात पावसाने काही अंशी हजेरी लावली. चांगला पाऊस बरसेल अशी आशा असताना परत हुलकावणी दिल्याने ऐन बहरात आलेल्या सोयाबीन, मूग, उडीद या पिकांचा पुरता धुराळा उडाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आता कुठे दोन दिवसांपूर्वी तुरळक प्रमाणात रिमझिम पाऊस झाल्याने थोड्या प्रमाणात पिकांना जीवनदान मिळाले आहे. हवामान विभागाने यावर्षी गतवर्षीप्रमाणेच पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पावसाला सुरुवात झाली होती. वेळेवर व चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात पिकाची लागवड केली. पीक उगवणीवर आल्यानंतर पावसाने हुलकावणी दिली. त्यानंतर दुबार पेरणीचे संकट ओढवले, तरीही बळीराजाला अपेक्षा होती की, पाऊस पडेल. त्यामुळे शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात खत पेरून फवारणी केली. परंतु मध्यंतरी दीड महिन्यापासून तालुक्यातून पाऊस गायब झाल्याने हातातोंडाशी आलेला घास या निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावू लागला आहे. गेल्या आठवड्यात गत दोन-तीन दिवसामध्ये कुठे रिमझिम तर कुठे हलक्या स्वरूपाच्या सरी बरसल्या होत्या. यामुळे मूग, उडीद सोडता इतर पिकांना हलकासा आधार झाला आहे. त्यातच या आठवड्यात कडक ऊन पडल्याने जमिनीतील ओलावा हा कमी होत आहे. तर नदी, नाले, तलाव हे अद्यापही कोरडेठाकच आहेत. त्यामुळे शेतकरी हे अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा करत आहे.

गेल्या आठवड्यात दोन ते तीन दिवस पाऊस झाल्याने कापूस व इतर पिकांना थोडाफार आधार झाला आहे. मूग, उडीद हे गेल्यात जमा आहे. त्यातच ऊन हे कडक पडू लागल्याने ओलावा हा कमी होत आहे. जोरदार पावसाअभावी नदी-तलाव भरले नाहीत. परिणामी विहिरी व कूपनलिका आता तळ गाठू लागल्या आहेत. जोरदार पाऊस नाही झाला तर हाताशी आलेल्या पिकांचेही अतोनात नुकसान होऊन भविष्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होईल. - सुहास चौधरी, शेतकरी, बामखेडा