शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

खापरखेडा धरणाला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 11:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : तालुक्यातील खापरखेडा लघु प्रकल्प धरणातील विहीर व गेट दुरुस्ती करून गाळ काढण्यात     ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : तालुक्यातील खापरखेडा लघु प्रकल्प धरणातील विहीर व गेट दुरुस्ती करून गाळ काढण्यात      यावा, यासाठी शिवकृपा पाणीवाटप संस्थेने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, खा. डाॅ. हीना गावित व आ. डॉ. विजयकुमार गावित यांना निवेदन सादर केले.शहादा तालुक्यातील महत्त्वाचा लघु प्रकल्प असलेल्या खापरखेडा धरणातील गाळ काढून विहीर व गेट दुरुस्ती करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन शिवकृपा पाणीवाटप संस्था व ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. या निवेदनात परिसरातील शेतकऱ्यांना जीवनदायी ठरणाऱ्या खापरखेडा येथील लघु प्रकल्पाची निर्मिती १९७० ते १९७२ च्या काळात झाली. या प्रकल्पातून परिसरातील सुमारे ६०० हेक्टर क्षेत्र बागायतीखाली येत असल्याने प्रायोगिक तत्त्वावर या प्रकल्पातून कोंढावळ, जयनगर, वडाळी या गावातील शेतकऱ्यांना लाभ झाला. मात्र, अनेक वर्षांपासून धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून त्याचा परिणाम पाणी साठवणुकीवर झाला. यामुळे ६०० हेक्टर क्षेत्रापैकी फक्त १५० ते २०० हेक्टर क्षेत्राला लाभ होत आहे. यामुळे इतर शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्यात पाण्याची पातळीही खालावली जाते. गेल्या तीन वर्षांपासून मुख्य कूपनलिका गाळामुळे बंद आहे. म्हणून शेतकऱ्यांना रबी हंगामासाठी पाणीपुरवठा होत नसल्याचे या निवेदनात म्हटले आहे. शिवकृपा पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष लालचंद माळी, शेतकरी राकेश हिरामण देवरे, लक्ष्मण माळी, निंबा काशिनाथ वैराळे, निखिल लालचंद माळी, सुरेश बुधा माळी, हिरामण विठ्ठल माळी आदींनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.खा. डॉ. हीना गावित आज धरणाची पाहणी करणारकोंढावळ, जयनगर, वडाळी परिसरातील शेतकऱ्यांना नवसंजीवनी ठरणाऱ्या कोंढावळ येथील धरणाच्या दुरुस्तीच्या मागणीचे निवेदन खा.डॉ.हीना गावित यांना दिले होते. त्यांनी तात्काळ दखल घेऊन प्रत्यक्ष धरणाची पाहणी करण्यासाठी व ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी रविवारी खा.डॉ.हीना गावित व आ. डॉ.विजयकुमार गावित भेट देणार असल्याची माहिती शिवकृपा पाणी वाटप संस्थेतर्फे देण्यात आली.

भूकंपाच्या धक्क्यामुळे धरण झाले खाली२ जानेवारी रोजी कोंढावळसह परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसल्याने धरणाला गळती लागली आहे. त्यामुळे १५ दिवसांतच धरणात पाण्याचा जो साठा होता तो नदीत पूर्णपणे वाहून गेला. त्यामुळे संपूर्ण धरण कोरडे पडले आहे. परिणामी यावर्षी शेतकऱ्यांचा रबी हंगाम पूर्णतः वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन हवालदिल झाला आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे शेतकरी आनंदित होते. मात्र, धरणाला गळती लागल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.