शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?
2
सैनिकांचे मृतदेह, युद्धकैद्यांची अदलाबदल,...; रशिया-युक्रेन यांच्या शांतता बैठकीत काय ठरलं?
3
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
4
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
5
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
6
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
7
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
8
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
9
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
10
Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
11
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
12
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
13
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
15
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला
16
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"
17
रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
18
सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
19
शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला; सोनम अद्याप बेपत्ताच...
20
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव

माघारीच्या अखेरच्या दिवशी मनधरणी आणि विनवणीची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : माघारीच्या शेवटच्या दिवशी सर्वच सहाही तालुक्यांमध्ये अपक्ष, बंडखोर आणि अधिकृत उमेदवारांची मते खाणाऱ्या उमेदवारांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : माघारीच्या शेवटच्या दिवशी सर्वच सहाही तालुक्यांमध्ये अपक्ष, बंडखोर आणि अधिकृत उमेदवारांची मते खाणाऱ्या उमेदवारांच्या माघारीसाठी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर कसरत पहावयास मिळाली. नंदुरबारात एका गटाच्या महिला उमेदवार पाच मिनिटे उशीरा आल्याने त्यांना कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. दरम्यान, माघारीनंतर आता खºया अर्थाने लढतींचे चित्र स्पष्ट झाले असून रणधुमाळी सुरू झाली आहे.जिल्ह्यातील ५६ गट व ११२ गणांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अर्जांची सोमवार, ३० रोजी अर्ज माघारीची शेवटची मुदत होती. छाननीनंतर पाच दिवस माघारीसाठी मिळाले होते. परंतु या काळात कुणीही माघार घेतली नाही. शेवटच्या अर्थात सोमवारच्या दिवशी माघारीसाठी सहाही ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात राजकीय नेते, पक्ष कार्यकर्ते व संबधीत उमेदवारांची गर्दी झाली होती. सकाळी १० वाजेपासून दुपारी तीन वाजेपर्यंतच्या मुदतीत अनेक जणांनी माघार घेतली.मनधरणी आणि विनवणी...माघारीसाठी अनेकांची मनधरणी करण्यात आली. त्यासाठी विविध क्लृप्त्या लढविण्यात आल्या. राजकीय दबाव टाकण्यात आला. नातेगोत्याचा आसरा घेण्यात आला. कामे करून देण्याचे आश्वासन देण्यात आले.ग्रामपंचायत निवडणुकीत, सोसायटी निवडणुकीत सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्याला भूलून अनेकांनी माघार घेतली तर काहींनी कुठल्याही दबाव, आश्वासने यांना बळी न पडता आपली उमेदवारी कायम ठेवली. परिणामी काही गट व गणात डोकेदुखी कायम राहिली तर काही ठिकाणी संबधीत उमेदवारांना आपला उद्देश साध्य करता आला.तहसील आवारांमध्ये गर्दीमाघारीसाठी सर्वच पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात सकाळी १० वाजेपासूनच गर्दी झाली होती. ज्यांना माघार घ्यावयाची होती त्यांनी सरळ कार्यालयात येवून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज माघारीचे पत्र दिले. परंतु ज्या अपक्ष किंवा बंडखोरांना अर्ज मागे घ्यावयाचा नव्हता त्यांची मनधरणी करण्यासाठी आवारात संबधितांची चांगलीच कसरत होतांना दिसून आली. काहींना चहाच्या टपरीवर घेवून जात, काहींना झाडाखाली बसवत मनधरणी करण्यात आली.अनेकजण नॉटरिचेबलज्यांना उमेदवारी माघार घेण्यासाठी दबाव होता त्यांनी सकाळपासूनच आपला मोबाईल बंद करून ठेवला होता. त्यामुळे संबधितांना त्यांच्या घरी, शेतात व त्यांच्या मित्र परिवाराकडे जावून त्यांचा शोध घ्यावा लागला. तरीही उपयोग न झाल्याने संबधितांचा हिरमोड झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळाले.

रनाळे गटातील अपक्ष महिला उमेदवार यांना आपल्या पक्षाच्या उमेदवारासाठी माघार घ्यावयाची होती. परंतु त्या दुपारी ३ वाजून पाच मिनिटांनी तहसील कार्यालयात दाखल झाल्या. तोपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. संबधीत महिला उमेदवार आणि शिवसेनेचे पदाधिकारी सुरेश शिंत्रे, किशोर पाटील यांनी आत जावू देण्याची विनंती केली. परंतु तेथील बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी त्यांना प्रवेश नाकारला. अखेर महिला उमेदवाराला परतावे लागले. त्यामुळे या गटात त्या अपक्ष म्हणून आता रिंगणात राहणार आहेत.