शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
2
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
3
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
4
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
5
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
6
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
8
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
9
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
10
'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजींच्या भूमिकेत कोण दिसणार? सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, "आम्हाला..."
11
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
12
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
13
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
14
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
15
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
16
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
17
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
18
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
19
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
20
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा

माघारीच्या अखेरच्या दिवशी मनधरणी आणि विनवणीची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : माघारीच्या शेवटच्या दिवशी सर्वच सहाही तालुक्यांमध्ये अपक्ष, बंडखोर आणि अधिकृत उमेदवारांची मते खाणाऱ्या उमेदवारांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : माघारीच्या शेवटच्या दिवशी सर्वच सहाही तालुक्यांमध्ये अपक्ष, बंडखोर आणि अधिकृत उमेदवारांची मते खाणाऱ्या उमेदवारांच्या माघारीसाठी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर कसरत पहावयास मिळाली. नंदुरबारात एका गटाच्या महिला उमेदवार पाच मिनिटे उशीरा आल्याने त्यांना कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. दरम्यान, माघारीनंतर आता खºया अर्थाने लढतींचे चित्र स्पष्ट झाले असून रणधुमाळी सुरू झाली आहे.जिल्ह्यातील ५६ गट व ११२ गणांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अर्जांची सोमवार, ३० रोजी अर्ज माघारीची शेवटची मुदत होती. छाननीनंतर पाच दिवस माघारीसाठी मिळाले होते. परंतु या काळात कुणीही माघार घेतली नाही. शेवटच्या अर्थात सोमवारच्या दिवशी माघारीसाठी सहाही ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात राजकीय नेते, पक्ष कार्यकर्ते व संबधीत उमेदवारांची गर्दी झाली होती. सकाळी १० वाजेपासून दुपारी तीन वाजेपर्यंतच्या मुदतीत अनेक जणांनी माघार घेतली.मनधरणी आणि विनवणी...माघारीसाठी अनेकांची मनधरणी करण्यात आली. त्यासाठी विविध क्लृप्त्या लढविण्यात आल्या. राजकीय दबाव टाकण्यात आला. नातेगोत्याचा आसरा घेण्यात आला. कामे करून देण्याचे आश्वासन देण्यात आले.ग्रामपंचायत निवडणुकीत, सोसायटी निवडणुकीत सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्याला भूलून अनेकांनी माघार घेतली तर काहींनी कुठल्याही दबाव, आश्वासने यांना बळी न पडता आपली उमेदवारी कायम ठेवली. परिणामी काही गट व गणात डोकेदुखी कायम राहिली तर काही ठिकाणी संबधीत उमेदवारांना आपला उद्देश साध्य करता आला.तहसील आवारांमध्ये गर्दीमाघारीसाठी सर्वच पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात सकाळी १० वाजेपासूनच गर्दी झाली होती. ज्यांना माघार घ्यावयाची होती त्यांनी सरळ कार्यालयात येवून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज माघारीचे पत्र दिले. परंतु ज्या अपक्ष किंवा बंडखोरांना अर्ज मागे घ्यावयाचा नव्हता त्यांची मनधरणी करण्यासाठी आवारात संबधितांची चांगलीच कसरत होतांना दिसून आली. काहींना चहाच्या टपरीवर घेवून जात, काहींना झाडाखाली बसवत मनधरणी करण्यात आली.अनेकजण नॉटरिचेबलज्यांना उमेदवारी माघार घेण्यासाठी दबाव होता त्यांनी सकाळपासूनच आपला मोबाईल बंद करून ठेवला होता. त्यामुळे संबधितांना त्यांच्या घरी, शेतात व त्यांच्या मित्र परिवाराकडे जावून त्यांचा शोध घ्यावा लागला. तरीही उपयोग न झाल्याने संबधितांचा हिरमोड झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळाले.

रनाळे गटातील अपक्ष महिला उमेदवार यांना आपल्या पक्षाच्या उमेदवारासाठी माघार घ्यावयाची होती. परंतु त्या दुपारी ३ वाजून पाच मिनिटांनी तहसील कार्यालयात दाखल झाल्या. तोपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. संबधीत महिला उमेदवार आणि शिवसेनेचे पदाधिकारी सुरेश शिंत्रे, किशोर पाटील यांनी आत जावू देण्याची विनंती केली. परंतु तेथील बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी त्यांना प्रवेश नाकारला. अखेर महिला उमेदवाराला परतावे लागले. त्यामुळे या गटात त्या अपक्ष म्हणून आता रिंगणात राहणार आहेत.