शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

के.सी. पाडवी यांचे आंदोलन स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 11:04 IST

कायद्याची लढाई लढणार : वनगावांबाबत सरकार गंभीर नाही

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील 73 वनगावांसंदर्भात आमदार अॅड.के.सी. पाडवी यांनी गेल्या पाच दिवसांपासून सुरू केलेले लाक्षणिक उपोषण शुक्रवारी स्थगित केले आहे. यासंदर्भात कायद्याची लढाई लढण्यासाठी व वनगावातील सुमारे एक लाख लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन केंद्र सरकारच्या पातळीवर अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी या वेळी दिला.धडगाव तालुक्यातील 73 वनगावे अद्याप महसुली झाले नाहीत. यासंदर्भात आमदार अॅड.के.सी. पाडवी यांनी यापूर्वी 1992 मध्ये दिल्लीत आंदोलन केले होते. त्यासंदर्भात शासनाने गॅङोट काढले पण पुन्हा त्याला स्थगिती मिळाली. त्यामुळे अद्याप वनगावे महसुली झाले नाहीत. दरम्यानच्या काळात नवीन कायदे, न्यायालयातील दावे यामुळे हा प्रश्न गुंतागुंतीचा ठरला. या पाश्र्वभूमीवर आमदार अॅड.के.सी. पाडवी यांनी या विषयावर लक्ष केंद्रीत करीत धडगाव तहसील कार्यालयावर महामोर्चा काढून लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली होती. गेल्या पाच दिवसांपासून हे उपोषण सुरू होते. या उपोषण काळात प्रांताधिका:यांनी भेट देऊन त्याबाबतचे आश्वासनही दिले होते. मात्र उपोषण सुरूच होते. शुक्रवारी पत्रकारांना साक्षी ठेवत आपली भूमिका जाहीर करून त्यांनी आंदोलन स्थगित केले. या वेळी त्यांनी सांगितले की, धडगाव तालुक्यातील निम्मे गावे ब्रिटिश शासनाने 1926 मध्येच महसुली केले होते. त्यानंतर स्वतंत्र भारतात 1977 ला कायदा झाल्यानंतर देशातील 448 वनगावे महसुली झाले. मात्र धडगाव तालुक्यातील 73 गावे तशीच राहिली. त्यासंदर्भात आंदोलन केल्यानंतर शासनाने गॅङोट काढले. पण त्यातही सात अटी-शर्ती टाकल्या. त्या आदेशाला पुढे स्थगितीही दिली. याविषयी आपली भूमिका स्पष्ट आहे की, 1977 च्या कायद्यानंतर येथील गावे महसुली करण्यासाठी सव्रेक्षण झाले. त्यातील जरली या पहिल्या गावाचे सव्रेक्षण 5 फेब्रुवारी 1979 ला झाले. दोन वर्षात सव्रेक्षण झाल्यानंतर सर्व गावांचे नकाशे, सातबारा उतारा, भूमीअभिलेख कार्यालयाने तयार करून धडगाव तहसील कार्यालयाला दिले आहे. ते कागदपत्रे जशीच्या तशी स्वीकारून त्याची अंमलबजावणी करावी व ते लोकांना द्यावे, अशी आपली मागणी आहे. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याने आपण हे आंदोलन केले. हा विषय खरे तर केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. परंतु त्याचे कागदपत्र धडगाव तहसीलला असल्याने लोकांच्या जनजागृतीसाठी व प्रशासनाला जागे करण्यासाठी स्थानिक पातळीवर हे आंदोलन आपण केले. यापुढे केंद्र शासनाच्या दरबारी कायद्याची लढाई लढून लोकांना न्याय मिळवून देऊ. त्यासाठी पुढील काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला.  या वेळी वनगावातील रहिवासी तसेच आमदार अॅड.पाडवी समर्थक कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.