शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

करणपाडा जिल्हा परिषद शाळा इमारतीला तडे गेल्याने धोकेदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील करणपाडा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील वर्ग खोल्यांच्या भिंतीला मोठ-मोठे तडे गेल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील करणपाडा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील वर्ग खोल्यांच्या भिंतीला मोठ-मोठे तडे गेल्याने ह्या वर्ग खोल्या धोकेदायक झाल्या असून, सध्या पावसाळा सुरू असल्याने याठिकाणी पावसाचे पाणी गळत असल्याने विद्यार्थी ओले होऊ नये म्हणून वर्गात प्लास्टिकचा पाल बांधून विद्याथ्र्याना शिक्षण देण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे. याबाबत गेल्या चार ते पाच वर्षापासून जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्यकार्यकारी अधिका:यांना निवेदन देवूनदेखील कार्यवाही होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान संबधित प्रशासन याठिकाणी मोठी दुर्घटना घडल्यावर लक्ष देईल की? काय अशा प्रश्नदेखील उपस्थित केला जात आहे.अक्कलकुवा तालुक्यातील करणपाडा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग भरत असून, याठिकाणी दोन वर्ग खोल्या आहे. यातील एका वर्गखोलीच्या भिंतीला मोठ-मोठे तडे गेल्याने छतावरील काही भागदेखील सरकला असल्याचे दिसून येत आहे. सद्य:स्थितीत पाऊस सुरू असल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरून भिंती कोणत्याक्षणी कोसळून अपघात घडू शकतो अशी परिस्थिती आहे. या वर्ग खोलीला लागून असलेल्या दुस:या वर्ग खोलीत या दोन्ही खोलीतील विद्यार्थी इयत्ता पहिली ते चौथी र्पयतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहे. दरम्यान वर्ग खोलीत पावसाचे पाणी गळत असल्याने विद्यार्थी ओले होवू नये म्हणून वर्गखोलीत प्लास्टिकचे पाल बांधून विद्याथ्र्याना शिक्षण दिले जात आहे.  या पहिली ते चौथीच्या विद्याथ्र्याच्या वर्ग खोलीला लागूनच जवळील वर्ग खोलीच्या भिंतीला मोठ-मोठे तडे गेल्याने धोकेदायक स्थितीनिर्माण झाली असल्याचे करणपाडा येथील  जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास ईश्वर तडवी, उपाध्यक्ष अरविंद दशरथ पाडवी, सदस्य दिनेश वाडग्या पाडवी, गणेश जयसिंग पाडवी, गौविद्रीबाई शंकर वळवी, तुलसीबाई चोमा पाडवी, लताबाई उदेसिग तडवी, सुनिताबाई फुलसिग वळवी, ललिताबाई राजकुमार वळवी, लताबाई अशोक तडवी यांनी सांगितले.

करणपाडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला तडे गेले असून, ही इमारत कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने हा धोका अधीच वाढला आहे. शाळेचे छप्परदेखील गळके असल्याने पावसाच्या पाण्यापासून संरक्षणासाठी प्लास्टीकचे कागद टाकून तात्पुरती उपाययोजना करण्यात आली आहे. या इमारतीच्या दुरूस्तीबाबत व संभाव्य धोक्याबाबत प्रशासनाकडे तक्रार करूनही दुर्लक्ष होत आहे.