शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
2
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
3
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
4
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
5
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
6
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
7
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
8
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
9
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
10
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
11
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
12
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
13
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; स्वत:च रचलेला हत्येचा भयंकर कट अन्...
14
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
15
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?
16
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
17
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
18
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
19
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
20
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे

मुलींच्या वसतीगृहाला संरक्षक भिंतीची प्रतिक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिंचपाडा : नवापुर तालुक्यातील चिंचपाडा येथे आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने मंजूरी ...

लोकमत न्यूज नेटवर्कचिंचपाडा : नवापुर तालुक्यातील चिंचपाडा येथे आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने मंजूरी देत मुलींच्या वसतीगृहासाठी इमारतीचे बांधकाम पूर्ण केले आहे़ हे बांधकाम पूर्ण होवून दोन वर्षाचा कालावधी लोटूनही संरक्षक भिंतर बांधण्याची मात्र प्रतिक्षा आहे़ यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे़चिंचपाडा गावातील रेल्वेस्टेशन भागात प्रभाग क्रमांक चार मध्ये प्रकल्प कार्यालयाने आदिवासी मुलींसाठी वसतीगृहाची निर्मिती केली होती़ २००७ पासून सुरु झालेले हे वसतीगृह भाडोत्री इमारतीत सुरु करण्यात आले होते़ याठिकाणी सुरक्षा व्यवस्था नसल्याने मुलींच्या पालकांनी चिंता व्यक्त केली होती़ सुविधा नसल्याने मुलींचे शिक्षणही धोक्यात होते़ याठिकाणी चांगल्या दर्जाची इमारत बांधण्यात यावी यासाठी ग्रामस्थांनी पाठपुरावा केला होता़ ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर आदिवासी विकास विभागाने २०१६ मध्ये वसतीगृहासाठी ४ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर करत बांधकाम सुरु केले होते़ चिंचपाडा गावात बांधकाम करण्यात आलेल्या या इमारतींचे बांधकाम २०१८ मध्ये पूर्ण झाले होते़ सुसज्ज अशी इमारत आकारास आल्यानंतर पालकांसह चिंचपाड्यातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले होते़ यानंतरही मात्र विद्यार्थिनींना प्रत्यक्ष अ‍ॅडमिशन देण्यास २०१९ हे वर्ष उजाडावे लागले होते़ सुरु झालेल्या या वसतीगृहात गेल्या वर्षी निवासी म्हणून आलेल्या विद्यार्थिनींना सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षक भिंत उभाण्याची मागणी करण्यात आली होती़ यावर प्रत्यक्षात भिंत न बांधकाम आदिवासी विकास विभागाने थेट पत्र्याचे कंपांऊंड तयार केले आहे़ यातून वर्षभरापासून मोकाट गुरे आणि सुटीच्या काळात मद्यपी इमारत आवारात शिरत आहेत़ मद्यपींच्या धिंगाण्यामुळे या आवाराचे पावित्र्य धोक्यात आले आहे़कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यास विलंब असला तरी कधीकाळी येथे विद्यार्थिनी येणारच आहेत़ यामुळे तातडीने संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरु करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे़७५ मुलींची क्षमता असलेल्या या वसतीगृहाच्या निर्मितीसाठी भरीव निधी मंजूर करण्यात आला असताना संरक्षक भिंतीचे बांधकाम गेल्या तीन वर्षांपासून रखडल्याचे सांगण्यात येत आहे़ भिंतीअभावी विद्यार्थिनींनी अनेक अडचणी येत असल्याचे त्यांच्याकडून गेल्या वर्षात सांगण्यात आले होते़ यावर तत्कालीन प्रकल्पाधिकारी यांनी भेट देऊन माहिती घेतली होती़ त्यानंतरही मात्र संरक्षक भिंतीचे काम रखडले असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़४गावापासून लांब अंतरावर असलेल्या या वसतीगृहात सुरक्षेचा प्रश्न असल्याने भिंत बांधण्याची मागणी आहे़४शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या वसतीगृहाकडे जाण्यासाठी रस्ता निर्मिती करण्याचे आदेश होते़ परंतू प्रत्यक्षात तसे कामच सुरु झालेले नाही़४रखडलेल्या भिंतीबाबत आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क केला असता तो होवू शकलेला नाही़ याठिकाणी नियुक्तीस असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले आहे़४कोरोनाचा संसर्ग थांबल्यावर सुरु होणाºया शैक्षणिक वर्षात या वसतीगृहात मुलींच्या क्षमतेत वाढ करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ तत्पूर्वी वसतीगृहाच्या संरक्षक भिंतीचा प्रश्न निकाली काढण्याची गरज आहे़