शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

मुलींच्या वसतीगृहाला संरक्षक भिंतीची प्रतिक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिंचपाडा : नवापुर तालुक्यातील चिंचपाडा येथे आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने मंजूरी ...

लोकमत न्यूज नेटवर्कचिंचपाडा : नवापुर तालुक्यातील चिंचपाडा येथे आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने मंजूरी देत मुलींच्या वसतीगृहासाठी इमारतीचे बांधकाम पूर्ण केले आहे़ हे बांधकाम पूर्ण होवून दोन वर्षाचा कालावधी लोटूनही संरक्षक भिंतर बांधण्याची मात्र प्रतिक्षा आहे़ यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे़चिंचपाडा गावातील रेल्वेस्टेशन भागात प्रभाग क्रमांक चार मध्ये प्रकल्प कार्यालयाने आदिवासी मुलींसाठी वसतीगृहाची निर्मिती केली होती़ २००७ पासून सुरु झालेले हे वसतीगृह भाडोत्री इमारतीत सुरु करण्यात आले होते़ याठिकाणी सुरक्षा व्यवस्था नसल्याने मुलींच्या पालकांनी चिंता व्यक्त केली होती़ सुविधा नसल्याने मुलींचे शिक्षणही धोक्यात होते़ याठिकाणी चांगल्या दर्जाची इमारत बांधण्यात यावी यासाठी ग्रामस्थांनी पाठपुरावा केला होता़ ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर आदिवासी विकास विभागाने २०१६ मध्ये वसतीगृहासाठी ४ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर करत बांधकाम सुरु केले होते़ चिंचपाडा गावात बांधकाम करण्यात आलेल्या या इमारतींचे बांधकाम २०१८ मध्ये पूर्ण झाले होते़ सुसज्ज अशी इमारत आकारास आल्यानंतर पालकांसह चिंचपाड्यातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले होते़ यानंतरही मात्र विद्यार्थिनींना प्रत्यक्ष अ‍ॅडमिशन देण्यास २०१९ हे वर्ष उजाडावे लागले होते़ सुरु झालेल्या या वसतीगृहात गेल्या वर्षी निवासी म्हणून आलेल्या विद्यार्थिनींना सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षक भिंत उभाण्याची मागणी करण्यात आली होती़ यावर प्रत्यक्षात भिंत न बांधकाम आदिवासी विकास विभागाने थेट पत्र्याचे कंपांऊंड तयार केले आहे़ यातून वर्षभरापासून मोकाट गुरे आणि सुटीच्या काळात मद्यपी इमारत आवारात शिरत आहेत़ मद्यपींच्या धिंगाण्यामुळे या आवाराचे पावित्र्य धोक्यात आले आहे़कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यास विलंब असला तरी कधीकाळी येथे विद्यार्थिनी येणारच आहेत़ यामुळे तातडीने संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरु करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे़७५ मुलींची क्षमता असलेल्या या वसतीगृहाच्या निर्मितीसाठी भरीव निधी मंजूर करण्यात आला असताना संरक्षक भिंतीचे बांधकाम गेल्या तीन वर्षांपासून रखडल्याचे सांगण्यात येत आहे़ भिंतीअभावी विद्यार्थिनींनी अनेक अडचणी येत असल्याचे त्यांच्याकडून गेल्या वर्षात सांगण्यात आले होते़ यावर तत्कालीन प्रकल्पाधिकारी यांनी भेट देऊन माहिती घेतली होती़ त्यानंतरही मात्र संरक्षक भिंतीचे काम रखडले असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़४गावापासून लांब अंतरावर असलेल्या या वसतीगृहात सुरक्षेचा प्रश्न असल्याने भिंत बांधण्याची मागणी आहे़४शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या वसतीगृहाकडे जाण्यासाठी रस्ता निर्मिती करण्याचे आदेश होते़ परंतू प्रत्यक्षात तसे कामच सुरु झालेले नाही़४रखडलेल्या भिंतीबाबत आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क केला असता तो होवू शकलेला नाही़ याठिकाणी नियुक्तीस असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले आहे़४कोरोनाचा संसर्ग थांबल्यावर सुरु होणाºया शैक्षणिक वर्षात या वसतीगृहात मुलींच्या क्षमतेत वाढ करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ तत्पूर्वी वसतीगृहाच्या संरक्षक भिंतीचा प्रश्न निकाली काढण्याची गरज आहे़