शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

मुलींच्या वसतीगृहाला संरक्षक भिंतीची प्रतिक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिंचपाडा : नवापुर तालुक्यातील चिंचपाडा येथे आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने मंजूरी ...

लोकमत न्यूज नेटवर्कचिंचपाडा : नवापुर तालुक्यातील चिंचपाडा येथे आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने मंजूरी देत मुलींच्या वसतीगृहासाठी इमारतीचे बांधकाम पूर्ण केले आहे़ हे बांधकाम पूर्ण होवून दोन वर्षाचा कालावधी लोटूनही संरक्षक भिंतर बांधण्याची मात्र प्रतिक्षा आहे़ यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे़चिंचपाडा गावातील रेल्वेस्टेशन भागात प्रभाग क्रमांक चार मध्ये प्रकल्प कार्यालयाने आदिवासी मुलींसाठी वसतीगृहाची निर्मिती केली होती़ २००७ पासून सुरु झालेले हे वसतीगृह भाडोत्री इमारतीत सुरु करण्यात आले होते़ याठिकाणी सुरक्षा व्यवस्था नसल्याने मुलींच्या पालकांनी चिंता व्यक्त केली होती़ सुविधा नसल्याने मुलींचे शिक्षणही धोक्यात होते़ याठिकाणी चांगल्या दर्जाची इमारत बांधण्यात यावी यासाठी ग्रामस्थांनी पाठपुरावा केला होता़ ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर आदिवासी विकास विभागाने २०१६ मध्ये वसतीगृहासाठी ४ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर करत बांधकाम सुरु केले होते़ चिंचपाडा गावात बांधकाम करण्यात आलेल्या या इमारतींचे बांधकाम २०१८ मध्ये पूर्ण झाले होते़ सुसज्ज अशी इमारत आकारास आल्यानंतर पालकांसह चिंचपाड्यातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले होते़ यानंतरही मात्र विद्यार्थिनींना प्रत्यक्ष अ‍ॅडमिशन देण्यास २०१९ हे वर्ष उजाडावे लागले होते़ सुरु झालेल्या या वसतीगृहात गेल्या वर्षी निवासी म्हणून आलेल्या विद्यार्थिनींना सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षक भिंत उभाण्याची मागणी करण्यात आली होती़ यावर प्रत्यक्षात भिंत न बांधकाम आदिवासी विकास विभागाने थेट पत्र्याचे कंपांऊंड तयार केले आहे़ यातून वर्षभरापासून मोकाट गुरे आणि सुटीच्या काळात मद्यपी इमारत आवारात शिरत आहेत़ मद्यपींच्या धिंगाण्यामुळे या आवाराचे पावित्र्य धोक्यात आले आहे़कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यास विलंब असला तरी कधीकाळी येथे विद्यार्थिनी येणारच आहेत़ यामुळे तातडीने संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरु करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे़७५ मुलींची क्षमता असलेल्या या वसतीगृहाच्या निर्मितीसाठी भरीव निधी मंजूर करण्यात आला असताना संरक्षक भिंतीचे बांधकाम गेल्या तीन वर्षांपासून रखडल्याचे सांगण्यात येत आहे़ भिंतीअभावी विद्यार्थिनींनी अनेक अडचणी येत असल्याचे त्यांच्याकडून गेल्या वर्षात सांगण्यात आले होते़ यावर तत्कालीन प्रकल्पाधिकारी यांनी भेट देऊन माहिती घेतली होती़ त्यानंतरही मात्र संरक्षक भिंतीचे काम रखडले असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़४गावापासून लांब अंतरावर असलेल्या या वसतीगृहात सुरक्षेचा प्रश्न असल्याने भिंत बांधण्याची मागणी आहे़४शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या वसतीगृहाकडे जाण्यासाठी रस्ता निर्मिती करण्याचे आदेश होते़ परंतू प्रत्यक्षात तसे कामच सुरु झालेले नाही़४रखडलेल्या भिंतीबाबत आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क केला असता तो होवू शकलेला नाही़ याठिकाणी नियुक्तीस असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले आहे़४कोरोनाचा संसर्ग थांबल्यावर सुरु होणाºया शैक्षणिक वर्षात या वसतीगृहात मुलींच्या क्षमतेत वाढ करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ तत्पूर्वी वसतीगृहाच्या संरक्षक भिंतीचा प्रश्न निकाली काढण्याची गरज आहे़