शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रीमहोदय तयारीनिशी आले असते तर बरे झाले असते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:29 IST

नंदुरबार -राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व क्रीडामंत्री सुनील केदार यांनी नुकतीच नंदुरबार जिल्ह्यातील अंबाबारी येथे शेतकरी आंदोलनातील शहीद महिला सीताबाई ...

नंदुरबार -राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व क्रीडामंत्री सुनील केदार यांनी नुकतीच नंदुरबार जिल्ह्यातील अंबाबारी येथे शेतकरी आंदोलनातील शहीद महिला सीताबाई तडवी यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी भेट दिली. सीताबाईंच्या कृतार्थ जीवनाचा सन्मान करण्यासाठी त्यांनी घेतलेली दखल निश्चितच समाधानकारक आहे. पण त्यांचा हा दौरा पूर्ण तयारीनिशी झाला असता तर तो अनेक अर्थाने फलदायी ठरला असता. दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात लोकसंघर्ष मोर्चातर्फे अंबाबारी, ता.अक्कलकुवा येथील सीताबाई तडवी यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला. त्याची दखल घेऊन त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी मंत्री सुनील केदार आले होते. अतिशय खडतर प्रवास वाहनाने करीत ते अंबाबारी येथे पोहोचले. तेथे गेल्यानंतर सीताबाईच्या कार्याचा त्यांनी खऱ्या अर्थाने सन्मान केला. ती निश्चितच जिल्हावासीयांसाठी कौतुकाची बाब होती. मात्र त्यांचा हा दौरा अचानक ठरला की काय अशीच स्थिती होती. कारण सीताबाईच्या कुटुंबीयांना त्यांना वैयक्तिक मदत करायची होती. तीदेखील त्यांनी कार्यकर्त्यांकडे बोलून नंतर पाठवणार असल्याचे सांगितले. त्यांचा जिल्ह्यात दौरा होत असताना आठवडाभरापासून जिल्ह्यातील नवापूर येथे कोंबड्यांचा मृत्यूच्या घटना घडत असल्याने पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. त्यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येलाच जिल्हा प्रशासनाने नवापूर व परिसरात बर्ड फ्लूबाबत उपाययोजना म्हणून प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित केले होते. त्यामुळे या बाबीची कल्पना त्यांना होती की नाही हा विषय वेगळा असला तरी जर त्यांनी त्यासंदर्भात प्रशासनाची बैठक घेऊन त्यांचे मनोबल वाढवले असते तर आणि पोल्ट्री व्यावसायिकांनाही शासनाकडून दिलासा दिला असता तर निश्चितच त्यांच्याही वेदना काहीशा हलक्या झाल्या असत्या.

मंत्रीमहोदयांकडे युवक कल्याण व क्रीडा हे खातेही आहे. जिल्ह्यातील तालुका क्रीडा संकुलांची अवस्था वाईट आहे. शासनाने यासाठी निधी दिला असला तरी अनेक ठिकाणी अजूनही काम सुरू झालेले नाही. जिल्हा क्रीडा संकुलाची अवस्थाही फारशी समाधानकारक नाही. तेथील जलतरण तलाव अजूनही सुरू होऊ शकलेला नाही. जिल्ह्यातीलच आदिवासी दुर्गम भागातील युवक अनिल वसावे याने नुकतेच प्रजासत्ताकदिनी अफ्रिकेतील सर्वात उंच किलीमांजारो हे शिखर सर करून तेथे तिरंगा ध्वज फडकविला. हा गिर्यारोहक नुकताच परतला आहे. या आदिवासी गिर्यारोहकाचा सन्मान करून त्याचेही मनोबल वाढवले असते तर निश्चितच त्याच्या भविष्याच्या कामगिरीला प्रोत्साहन मिळाले असते.

अर्थातच या साऱ्या बाबी यासाठी की नंदुरबार जिल्हा आधीच उपेेक्षित जिल्हा आहे. याच जिल्ह्यात मंत्र्यांचा दौरा तसे दुर्मिळ बाब. अशा स्थितीत एखाद्या मंत्र्याचा दौरा आला की जिल्ह्यातील जनतेच्या अपेक्षा उंचावतात. त्यामुळे पशुसंवर्धन व क्रीडामंत्री यांचा दौरा आता पुढे कधी होईल ते सांगता येत नाही. त्यामुळे त्यांचा हा दौरा जर नियोजनपूर्वक केला असता तर जिल्ह्यातील अनेक प्रश्नांना चालना मिळू शकली असती. सीताबाईच्या कार्याचा सन्मान त्यांच्या तोंडून होणे हे निश्चितच सातपुड्यातील जनतेसाठी अभिमानास्पद बाब आहे. सीताबाईंनी आपले आयुष्य गरिबांच्या न्याय हक्कासाठी चळवळ व आंदोलनासाठी घालवले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पशुसंवर्धनमंत्र्यांनी त्याची दखल घेतली हे निश्चितच गरीब, आदिवासी, शोषित जनतेसाठी लढणाऱ्या चळवळीतील कार्यकर्त्यांना बळ देणारे ठरले आहे.