शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
3
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
4
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
5
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
6
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
7
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
8
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
9
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
10
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
11
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
12
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
13
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
14
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
15
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
16
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
17
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
18
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
19
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
20
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!

मंत्रीमहोदय तयारीनिशी आले असते तर बरे झाले असते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:29 IST

नंदुरबार -राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व क्रीडामंत्री सुनील केदार यांनी नुकतीच नंदुरबार जिल्ह्यातील अंबाबारी येथे शेतकरी आंदोलनातील शहीद महिला सीताबाई ...

नंदुरबार -राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व क्रीडामंत्री सुनील केदार यांनी नुकतीच नंदुरबार जिल्ह्यातील अंबाबारी येथे शेतकरी आंदोलनातील शहीद महिला सीताबाई तडवी यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी भेट दिली. सीताबाईंच्या कृतार्थ जीवनाचा सन्मान करण्यासाठी त्यांनी घेतलेली दखल निश्चितच समाधानकारक आहे. पण त्यांचा हा दौरा पूर्ण तयारीनिशी झाला असता तर तो अनेक अर्थाने फलदायी ठरला असता. दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात लोकसंघर्ष मोर्चातर्फे अंबाबारी, ता.अक्कलकुवा येथील सीताबाई तडवी यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला. त्याची दखल घेऊन त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी मंत्री सुनील केदार आले होते. अतिशय खडतर प्रवास वाहनाने करीत ते अंबाबारी येथे पोहोचले. तेथे गेल्यानंतर सीताबाईच्या कार्याचा त्यांनी खऱ्या अर्थाने सन्मान केला. ती निश्चितच जिल्हावासीयांसाठी कौतुकाची बाब होती. मात्र त्यांचा हा दौरा अचानक ठरला की काय अशीच स्थिती होती. कारण सीताबाईच्या कुटुंबीयांना त्यांना वैयक्तिक मदत करायची होती. तीदेखील त्यांनी कार्यकर्त्यांकडे बोलून नंतर पाठवणार असल्याचे सांगितले. त्यांचा जिल्ह्यात दौरा होत असताना आठवडाभरापासून जिल्ह्यातील नवापूर येथे कोंबड्यांचा मृत्यूच्या घटना घडत असल्याने पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. त्यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येलाच जिल्हा प्रशासनाने नवापूर व परिसरात बर्ड फ्लूबाबत उपाययोजना म्हणून प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित केले होते. त्यामुळे या बाबीची कल्पना त्यांना होती की नाही हा विषय वेगळा असला तरी जर त्यांनी त्यासंदर्भात प्रशासनाची बैठक घेऊन त्यांचे मनोबल वाढवले असते तर आणि पोल्ट्री व्यावसायिकांनाही शासनाकडून दिलासा दिला असता तर निश्चितच त्यांच्याही वेदना काहीशा हलक्या झाल्या असत्या.

मंत्रीमहोदयांकडे युवक कल्याण व क्रीडा हे खातेही आहे. जिल्ह्यातील तालुका क्रीडा संकुलांची अवस्था वाईट आहे. शासनाने यासाठी निधी दिला असला तरी अनेक ठिकाणी अजूनही काम सुरू झालेले नाही. जिल्हा क्रीडा संकुलाची अवस्थाही फारशी समाधानकारक नाही. तेथील जलतरण तलाव अजूनही सुरू होऊ शकलेला नाही. जिल्ह्यातीलच आदिवासी दुर्गम भागातील युवक अनिल वसावे याने नुकतेच प्रजासत्ताकदिनी अफ्रिकेतील सर्वात उंच किलीमांजारो हे शिखर सर करून तेथे तिरंगा ध्वज फडकविला. हा गिर्यारोहक नुकताच परतला आहे. या आदिवासी गिर्यारोहकाचा सन्मान करून त्याचेही मनोबल वाढवले असते तर निश्चितच त्याच्या भविष्याच्या कामगिरीला प्रोत्साहन मिळाले असते.

अर्थातच या साऱ्या बाबी यासाठी की नंदुरबार जिल्हा आधीच उपेेक्षित जिल्हा आहे. याच जिल्ह्यात मंत्र्यांचा दौरा तसे दुर्मिळ बाब. अशा स्थितीत एखाद्या मंत्र्याचा दौरा आला की जिल्ह्यातील जनतेच्या अपेक्षा उंचावतात. त्यामुळे पशुसंवर्धन व क्रीडामंत्री यांचा दौरा आता पुढे कधी होईल ते सांगता येत नाही. त्यामुळे त्यांचा हा दौरा जर नियोजनपूर्वक केला असता तर जिल्ह्यातील अनेक प्रश्नांना चालना मिळू शकली असती. सीताबाईच्या कार्याचा सन्मान त्यांच्या तोंडून होणे हे निश्चितच सातपुड्यातील जनतेसाठी अभिमानास्पद बाब आहे. सीताबाईंनी आपले आयुष्य गरिबांच्या न्याय हक्कासाठी चळवळ व आंदोलनासाठी घालवले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पशुसंवर्धनमंत्र्यांनी त्याची दखल घेतली हे निश्चितच गरीब, आदिवासी, शोषित जनतेसाठी लढणाऱ्या चळवळीतील कार्यकर्त्यांना बळ देणारे ठरले आहे.