शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसनाशिवाय जलसिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 13:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सरदार सरोवराच्या पाण्याचा हत्यार म्हणून वापर करतात़ गुजरात, महाराष्ट्र आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सरदार सरोवराच्या पाण्याचा हत्यार म्हणून वापर करतात़ गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील हजारो आदिवासी बांधवांचे पुनर्वसन न करता जलसिंचन  करण्याच्या धोरणाला नर्मदा बचाव आंदोलन विरोध करत असून यासंदर्भातील चारही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक तातडीने घेण्यात येणार असल्याने दिलासा मिळाला असल्याचे नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांनी सांगितल़े  शहादा शहरातील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या़ प्रसंगी माहिती देताना त्यांनी सांगितले की, महाकाय अशा सरदार सरोवर प्रकल्पामुळे महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातील 30 हजार पेक्षा अधिक बाधित कुटुंबे जलसंचयाच्या या धोरणामुळे जगण्याचा हक्क हिरावून बसले आहेत़ केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जलसंचयाच्या अधिकारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या  वाढदिवसाचे औचित्य साधत सलग दहा तास केलेल्या खर्चिक कार्यक्रमाच्या माध्यमातून हा जलसिंचन हा जलसंचय सुरू केला़ यामुळे मध्यप्रदेशात सर्वात मोठी हानी झाली आह़े आजघडीस सरदार सरोवर बाधितांचे पुनर्वसन झालेले नाहीत केवळ 830 नागरिकांना लाभ मिळाला आह़े उर्वरित एक हजारापेक्षा अधिक लोक यामध्ये पुनर्वसन प्रक्रियेपासून वंचित आहेत़  मध्य प्रदेश सरकारचा विरोध न जुमानता केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ मोठे जनआंदोलन पुन्हा सुरू होणार आह़े नंदुरबारचे  जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी बुडीत क्षेत्राचा दौरा करून योग्य नियोजन करत शासनाकडे पाठपुरावा केले  आह़े महाराष्ट्रातील 33 गावे बाधित क्षेत्रात असल्याने हजारो आदिवासी बाधंवांना पुनर्वसनाचा प्रश्न भेडसावत आह़े मणिबेली, चिमलखेडी, धनखेडी या गावांमध्ये जिल्हाधिका:यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली़  येथील काही लोकांना गुजरात राज्यात देण्यात आलेल्या  जमिनीचा दर्जा अत्यंत खालावलेला असून अजूनही त्यांना जमीन व घराचा सातबारा किंवा ताबा मिळाला नसल्याची माहिती मेधा पाटकर यांनी दिली़