शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष यंदाच्या वर्षी तरी भरून निघावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 12:33 IST

मनोज शेलार लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष मोठा आहे. तो दूर करण्यासाठी अनेक योजनांची घोषणा ...

मनोज शेलारलोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष मोठा आहे. तो दूर करण्यासाठी अनेक योजनांची घोषणा करण्यात आली. काही प्रत्यक्षात सुरू झाल्या तर काही कागदावरच आहेत. काही योजनांची कामे अपुर्ण असून ती निधी उपलब्ध करून देत पुर्ण झाली पाहिजे. नर्मदा व उकईचे पाणी उचलण्यासाठीची योजना दिवास्वप्न ठरणार आहेत. प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजचे पाणी दरवर्षी पावसाळ्यात सोडून द्यावे लागते. जर मंजूर योजना व सुरू असलेल्या योजना प्रत्यक्षात आकारास आल्या तर जिल्हा सुजलाम-सुफलाम होईल यात शंका नाही. यंदाच्या वर्षात त्याला गती मिळावी अशी जिल्हावासीयांची अपेक्षा आहे. रापापूर प्रकल्पबाधितांच्या विरोधामुळे बंद असलेले काम प्रकल्पबाधितांशी संवाद साधून मे २०१९ पासून सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे ५५५ हे. क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. येत्या दीड वर्षात हा प्रकल्प पुर्ण करण्यात येणार आहे. अक्कलकुवा तालुक्यातील १८ वषार्पासून बंद पडलेले रामपूर प्रकल्पाचे काम भूसंपादनाचा प्रश्न सोडवून जानेवारी २०१९ पासून सुरू करण्यात आले आहे. दीड वर्षात प्रकल्प पुर्ण झाल्यावर ३५४ दलघमी पाणीसाठा निर्माण होणार आहे. देहली मध्यम प्रकल्पाचे काम ३५ वषार्पासून रखडलेले होते. गेल्या तीन वर्षात प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवून बांधकाम पुर्णत्वास आले आहे. चालु वर्षी घळभरणी पुर्ण झाल्यावर १९ दलघमी पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाच्या ११ किमी कालव्याचे काम ९० टक्के झाले आहे. नवापूर तालुक्यातील कोरडी मध्यम प्रकल्पात ११.४९ दलघमी पाणीसाठा निर्माण झाला असून गेल्या तीन वर्षात डावा व उजवा कालव्याचे काम वितरीकांसह पुर्ण करण्यात आले आहे. त्याद्वारे २ हजार हे. क्षेत्र सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. नागन प्रकल्पाच्या कालव्यांच्या कामालाही गती देण्यात आली असून यावर्षीच्या रब्बी हंगामात ३५० हे. क्षेत्र सिंचन क्षमता साध्य करण्यात आली आहे. कालव्यावरील रेल्वे क्रॉसिंगचे कामदेखील पुर्ण झाले आहे. भूरीवेल धरणाचे घळभरणी करून ३.६४ दलघमी पाणीसाठा निर्माण करण्यात आला आहे. बंदिस्त पाईपलाईनद्वारे ७६१ हेक्टर क्षेत्र सिंचनाचे नियोजन करण्यात येत असल्याचा दावा पाटबंधारे विभागाने केला आहे. 

निधी अभावी ठप्प झालेला तापी-बुराई प्रकल्प प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम २०१५ मध्ये सुरू करण्यात आले. पहिल्या टप्प्याच्या ८ किलोमीटर पाईप लाईनचे ९० टक्के व दुस-या टप्प्यातील ६ किमी पाईपलाईनचे ७० टक्के काम पुर्ण करण्यात आले आहे. जॅकवेलचे जमीन तलांकापर्यंत २० मीटरचे काम पुर्ण करण्यात आले आहे. सद्या हा प्रकल्प निधीअभावी ठप्प झाला आहे. निधी उपलब्धतेची अशीच गती राहिली तर पुढील ३० वर्षात देखील ती पुर्ण होणार नाही. 

जिल्ह्यातील पहिलीच कालव्याऐवजी बंदीस्त पाईपलाईन...जिल्ह्यात प्रथमच शिवण मध्यम प्रकल्पांतर्गत पारंपरिक कालव्याऐवजी बंदिस्त पाईपलाईन प्रणालीचे काम पुर्ण करण्यात येऊन ८२९ हे. क्षेत्र सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली आहे. बिलाडी ल.पा. योजनेसाठी भूसंपादनाची प्रक्रीया वेगाने सुरू आहे.  तळोदा तालुक्यातील धनपूर ल.पा. योजनेअंतर्गत धरणाची २०१७ मध्ये घळभरणी करून ३.१८ दलघमी पाणीसाठा निर्माण करण्यात आला. त्यामुळे परिसरातील विहिरींची पाणी पातळी वाढली असून शेतक-यांना उपलब्ध सिंचनाचा लाभ होत आहे. या धरणातून बंदिस्त पाईपलाईनद्वारे ४९० हेक्टर क्षेत्र सिंचन करण्याचे नियोजन आहे.  

सिंचन क्षमात वाढविण्याच्या दृष्टीने नियोजन... नंदुरबार जिल्ह्यातील १४ व धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातील ८ अशा गेल्या ३० वषार्पासून बंद पडलेल्या २२ सहकारी उपसा सिंचन योजनांच्या दुरुस्ती कामास शासनाने विशेष बाब म्हणून ४१ कोटींच्या रकमेस प्रशासकीय मान्यता     दिली. त्यापैकी ६ उपसा सिंचन योजनांच्या दुरुस्तीची कामे   करण्यात येऊन  चाचणी घेण्यात आली आहे.  इतरही १०२ योजना कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही होणे अपेक्षीत आहे.  या योजनांमुळे १४ हजार हे. क्षेत्र सिंचन क्षमता निर्माण करण्याचे नियोजन आहे. येत्या वर्षात या कामाला गती येईल असे अपेक्षीत आहे.