शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

त्याना मांगे फिरापेक्षा घर बठा... (फेरफटका) (ग्रामपंचायत निवडणूक) (काही ठिकाणी स्थानिक अहिराणी भाषेचा वापर केला आहे.)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:22 IST

नंदुरबार तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार आता केवळ चारच दिवसांचा राहिला आहे. यासाठी प्रभागनिहाय लढती देणारे उमेदवार पूर्ण जोर लावत ...

नंदुरबार तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार आता केवळ चारच दिवसांचा राहिला आहे. यासाठी प्रभागनिहाय लढती देणारे उमेदवार पूर्ण जोर लावत आहेत. यात सर्वाधिक विशेष बाब म्हणजे तालुक्यात भालेर व कोपर्ली या दोन मोठ्या ग्रामपंचायती लक्ष्यवेधी आहेत. यातील भालेर परिसरात फिरत असताना हाैशी उमेदवार आणि उत्साही कार्यकर्ते यांची चंगळ सुरू आहे. प्रभागात फेऱ्या काढून निवडी द्या, असे दात काढत मत मागणाऱ्यांना महिलावर्गाकडून टोमण्यांचा प्रसादही मिळत आहे. गावातीलच एकमेकांचे नातेवाईक असल्याने हे सर्व मजाकमध्ये घेत वेळ निभावून नेली जात आहे. एका प्रभागात चार-पाच जणांचा घोळका फिरत असताना त्याना मांगे फिरापेक्षा घर बठा, असा सल्ला एका म्हाताऱ्या आजोबांनी दिला. त्यावर प्रतिक्रिया देत एका उत्साही कार्यकर्त्याने घर बी रिकामं बठान शे.. मग याना मांगे फिरामा काय वाईट, असे उत्तर दिल्यानंतर एकच खसखस पिकली.

उत्साही उमेदवारांची होतेय फसगत

शहरी भागात कोणीच विचारत नसल्याने अनेकांनी गावाचा रस्ता धरून त्याठिकाणी राजकारणात नशीब आजमावण्याचा नवीन पायंडा पाडला आहे. यातून दर पाच वर्षांनी गावात अचानक नव्याने भाऊ, दादा भावी सरपंच म्हणून स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. गावात एखाद दुसरा भंडारा आणि शहरातील नेत्यांची ओळख असल्याचे सांगून गावात बडेजाव करण्यात हे उत्साही धन्यता मानत आहेत. यातील एक सध्या शहरातून एका पक्षाने निर्यात करून गावातील निवडणुकीत उभा केला आहे. उमेदवारही तगडा असल्याने खर्चाचा हात सध्यातरी ढिला झाला आहे. परंतु गावात फिरत असताना गावात नंदीबैल यावा तसा त्याला पाहायला झुंबड उडत आहे. यात घरोघरी नमस्कार करत पाया पडत असताना अनेकजण प्रश्न हमखास विचारतात. तो म्हणजे भाऊ तू कोना पोरगा शे... हा प्रश्न विचारल्यानंतर उमेदवार उत्तर देतो खरं. पण मग पुढचा गावकीतला प्रतिप्रश्न उमेदवारालाच खजील करणारा ठरतो. तो म्हणजे तठे काय काम नई व्हतं का, भाऊ आठे निवडणूक मा उभा राह्यना ते..

काय बी करा पन मतदानले या..

शहादा तालुक्यातील काही गावात प्रचाराची रंगत चांगलीच रंगली आहे. यात प्रामुख्याने गेल्या तीन-चार वर्षात विवाह करून माहेरी स्थिरावलेल्या माहेरवाशिणींना घरी परत येण्याचे साकडे उमेदवार घालत आहेत. बहीन तू बी ये आनी दाजीले बी संगे लयी ये, भाडाना पैसा ऑनलाइन धाडी देतस असं सांगून त्यांची मनधरणी होत आहे.