शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

झटपट सोयाबीन; पाऊस कधीही झाला तरी शेतकरी होऊ शकतात मालामाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:38 IST

नंदुरबार : हवामानाधारित शेती करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या पाच वर्षांत सोयाबीनच्या रूपाने आशेचा किरण सापडला आहे. यातून दरवर्षी सोयाबीनचा ...

नंदुरबार : हवामानाधारित शेती करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या पाच वर्षांत सोयाबीनच्या रूपाने आशेचा किरण सापडला आहे. यातून दरवर्षी सोयाबीनचा पेरा वाढत असून प्रत्येक वर्षात पाच हजारांनी सोयाबीन पेरणीक्षेत्र वाढले आहे.

जिल्ह्यात पावसाची दरवर्षी कमी-अधिक प्रमाणातील हजेरी शेतकऱ्यांना तापदायक ठरत आहे. यंदा पावसाने वेळेवर हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांना दुबार आणि तिबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले होते. धान्य आणि कडधान्य पीक उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादनघटीचा सामना करावा लागत आहे. हीच स्थिती दर दोन वर्षांनी उद्भवत असल्याने शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत आहेत. यातून झटपट, मध्यम आणि लवकर येणारे सोयाबीन पेरा केला जात आहे. यातून शेतकऱ्यांना शेतीतील खर्च कमी होऊन संगोपनाचा खर्चही कमी येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

लवकर येणारे सोयाबीन काढणीनंतर बाजारात सोयाबीनची आवक कमी असते. त्यामुळे भाव चांगला मिळतो. शेत मोकळे झाल्याने शेतकरी इतर पिकांचे नियोजन करू शकतात. सोयाबीन काढल्यानंतरही जमिनीत ओलावा टिकून राहत असल्याने अनेकांना बाजरीचे नियोजन केले जाते.

शेतकऱ्यांनी तीन प्रकारचे सोयाबीन घ्यावे. त्यामध्ये लवकर, मध्यम आणि उशिरा असे नियोजन करावे. त्यामुळे पाऊस केव्हाही आला तरी शेतकऱ्यांना सोयाबीन चांगले उत्पन्न देऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. ९५६० आणि २०३४ हे वाण ८५ दिवसांत, तर ९३०५ हे वाण ८७ दिवसांत येतात. वेगवेगळ्या प्रकारचे वाण उपलब्ध आहेत.

शेती हा व्यवसाय खूप महागला आहे. पाऊस हा भरवशाचा राहिला नाही. यामुळे मग सोयाबीनसारख्या पिकांकडे कल वाढला आहे; परंतु साेयाबीनलाही पाण्याची गरज आहे. शेंगा भरतील एवढा पाऊस झाल्यास त्याचे उत्पादन बाजारात उतरवून लागवडीचा खर्च वसूल होऊ शकतो.

- विजय रामजी चाैधरी, शेतकरी.

सोयाबीनलाही खर्च येतो. उत्पादन झटपट येत असले तरी त्यासाठी काळजी घ्यावी लागते. माझ्या शेतात पेरणी केलेल्या सोयाबीनची स्थिती चांगली आहे. तीन वेळा फवारणी करण्यात आली आहे. येत्या काळात पाऊस चांगला झाल्यास पिकांच्या वाढीस लाभ होणार आहे.

- रमण देविदास चाैधरी, शेतकरी.

शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत इतर पिकांचा आधार घेत आहेत. सोयाबीन हे अधिक उत्पादन मिळवून देणारे पीक आहे. यामुळे दरवर्षी त्याचा पेरा हा वाढत आहे. शेतकरी बांधवांनी योग्य वाणाची पेरणी केली पाहिजे. योग्य ते बियाणे तपासून खरेदी करावेत.

- प्रदीप लाटे,

कृषी विकास अधिकारी, नंदुरबार.