शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

झटपट सोयाबीन; पाऊस कधीही झाला तरी शेतकरी होऊ शकतात मालामाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:38 IST

नंदुरबार : हवामानाधारित शेती करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या पाच वर्षांत सोयाबीनच्या रूपाने आशेचा किरण सापडला आहे. यातून दरवर्षी सोयाबीनचा ...

नंदुरबार : हवामानाधारित शेती करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या पाच वर्षांत सोयाबीनच्या रूपाने आशेचा किरण सापडला आहे. यातून दरवर्षी सोयाबीनचा पेरा वाढत असून प्रत्येक वर्षात पाच हजारांनी सोयाबीन पेरणीक्षेत्र वाढले आहे.

जिल्ह्यात पावसाची दरवर्षी कमी-अधिक प्रमाणातील हजेरी शेतकऱ्यांना तापदायक ठरत आहे. यंदा पावसाने वेळेवर हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांना दुबार आणि तिबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले होते. धान्य आणि कडधान्य पीक उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादनघटीचा सामना करावा लागत आहे. हीच स्थिती दर दोन वर्षांनी उद्भवत असल्याने शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत आहेत. यातून झटपट, मध्यम आणि लवकर येणारे सोयाबीन पेरा केला जात आहे. यातून शेतकऱ्यांना शेतीतील खर्च कमी होऊन संगोपनाचा खर्चही कमी येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

लवकर येणारे सोयाबीन काढणीनंतर बाजारात सोयाबीनची आवक कमी असते. त्यामुळे भाव चांगला मिळतो. शेत मोकळे झाल्याने शेतकरी इतर पिकांचे नियोजन करू शकतात. सोयाबीन काढल्यानंतरही जमिनीत ओलावा टिकून राहत असल्याने अनेकांना बाजरीचे नियोजन केले जाते.

शेतकऱ्यांनी तीन प्रकारचे सोयाबीन घ्यावे. त्यामध्ये लवकर, मध्यम आणि उशिरा असे नियोजन करावे. त्यामुळे पाऊस केव्हाही आला तरी शेतकऱ्यांना सोयाबीन चांगले उत्पन्न देऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. ९५६० आणि २०३४ हे वाण ८५ दिवसांत, तर ९३०५ हे वाण ८७ दिवसांत येतात. वेगवेगळ्या प्रकारचे वाण उपलब्ध आहेत.

शेती हा व्यवसाय खूप महागला आहे. पाऊस हा भरवशाचा राहिला नाही. यामुळे मग सोयाबीनसारख्या पिकांकडे कल वाढला आहे; परंतु साेयाबीनलाही पाण्याची गरज आहे. शेंगा भरतील एवढा पाऊस झाल्यास त्याचे उत्पादन बाजारात उतरवून लागवडीचा खर्च वसूल होऊ शकतो.

- विजय रामजी चाैधरी, शेतकरी.

सोयाबीनलाही खर्च येतो. उत्पादन झटपट येत असले तरी त्यासाठी काळजी घ्यावी लागते. माझ्या शेतात पेरणी केलेल्या सोयाबीनची स्थिती चांगली आहे. तीन वेळा फवारणी करण्यात आली आहे. येत्या काळात पाऊस चांगला झाल्यास पिकांच्या वाढीस लाभ होणार आहे.

- रमण देविदास चाैधरी, शेतकरी.

शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत इतर पिकांचा आधार घेत आहेत. सोयाबीन हे अधिक उत्पादन मिळवून देणारे पीक आहे. यामुळे दरवर्षी त्याचा पेरा हा वाढत आहे. शेतकरी बांधवांनी योग्य वाणाची पेरणी केली पाहिजे. योग्य ते बियाणे तपासून खरेदी करावेत.

- प्रदीप लाटे,

कृषी विकास अधिकारी, नंदुरबार.