शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

झटपट सोयाबीन; पाऊस कधीही झाला तरी शेतकरी होऊ शकतात मालामाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:38 IST

नंदुरबार : हवामानाधारित शेती करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या पाच वर्षांत सोयाबीनच्या रूपाने आशेचा किरण सापडला आहे. यातून दरवर्षी सोयाबीनचा ...

नंदुरबार : हवामानाधारित शेती करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या पाच वर्षांत सोयाबीनच्या रूपाने आशेचा किरण सापडला आहे. यातून दरवर्षी सोयाबीनचा पेरा वाढत असून प्रत्येक वर्षात पाच हजारांनी सोयाबीन पेरणीक्षेत्र वाढले आहे.

जिल्ह्यात पावसाची दरवर्षी कमी-अधिक प्रमाणातील हजेरी शेतकऱ्यांना तापदायक ठरत आहे. यंदा पावसाने वेळेवर हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांना दुबार आणि तिबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले होते. धान्य आणि कडधान्य पीक उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादनघटीचा सामना करावा लागत आहे. हीच स्थिती दर दोन वर्षांनी उद्भवत असल्याने शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत आहेत. यातून झटपट, मध्यम आणि लवकर येणारे सोयाबीन पेरा केला जात आहे. यातून शेतकऱ्यांना शेतीतील खर्च कमी होऊन संगोपनाचा खर्चही कमी येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

लवकर येणारे सोयाबीन काढणीनंतर बाजारात सोयाबीनची आवक कमी असते. त्यामुळे भाव चांगला मिळतो. शेत मोकळे झाल्याने शेतकरी इतर पिकांचे नियोजन करू शकतात. सोयाबीन काढल्यानंतरही जमिनीत ओलावा टिकून राहत असल्याने अनेकांना बाजरीचे नियोजन केले जाते.

शेतकऱ्यांनी तीन प्रकारचे सोयाबीन घ्यावे. त्यामध्ये लवकर, मध्यम आणि उशिरा असे नियोजन करावे. त्यामुळे पाऊस केव्हाही आला तरी शेतकऱ्यांना सोयाबीन चांगले उत्पन्न देऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. ९५६० आणि २०३४ हे वाण ८५ दिवसांत, तर ९३०५ हे वाण ८७ दिवसांत येतात. वेगवेगळ्या प्रकारचे वाण उपलब्ध आहेत.

शेती हा व्यवसाय खूप महागला आहे. पाऊस हा भरवशाचा राहिला नाही. यामुळे मग सोयाबीनसारख्या पिकांकडे कल वाढला आहे; परंतु साेयाबीनलाही पाण्याची गरज आहे. शेंगा भरतील एवढा पाऊस झाल्यास त्याचे उत्पादन बाजारात उतरवून लागवडीचा खर्च वसूल होऊ शकतो.

- विजय रामजी चाैधरी, शेतकरी.

सोयाबीनलाही खर्च येतो. उत्पादन झटपट येत असले तरी त्यासाठी काळजी घ्यावी लागते. माझ्या शेतात पेरणी केलेल्या सोयाबीनची स्थिती चांगली आहे. तीन वेळा फवारणी करण्यात आली आहे. येत्या काळात पाऊस चांगला झाल्यास पिकांच्या वाढीस लाभ होणार आहे.

- रमण देविदास चाैधरी, शेतकरी.

शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत इतर पिकांचा आधार घेत आहेत. सोयाबीन हे अधिक उत्पादन मिळवून देणारे पीक आहे. यामुळे दरवर्षी त्याचा पेरा हा वाढत आहे. शेतकरी बांधवांनी योग्य वाणाची पेरणी केली पाहिजे. योग्य ते बियाणे तपासून खरेदी करावेत.

- प्रदीप लाटे,

कृषी विकास अधिकारी, नंदुरबार.