शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात टरबूजावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 12:13 IST

तळोदा परिसर : शेतकऱ्यांचे होतेय आर्थिक नुकसान, उपाय योजना व्हावी

्नरांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणीसह परिसरात टरबूज या वेलवर्गीय पिकावर करपा व डावणी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे़ पिकांची वाढ खुंटली असल्याने साहजिकच शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे़ कृषी विभागाकडून संबंधित परिसराची पाहणी करण्यात आली असून विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांकडून बुरशीनाशकांची फवारणी केली जात आहे़परिसरात कुपनलिकांची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे़ त्यामुळे परिसरातील शेतकºयांकडून ठिबकवर विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे़ टरबूज पिकाला जेमतेम पाणी देणे सुरु आहे़ सध्या परिसरात चांगलेच तापत असल्याने या वेलवर्गीय पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे़करपा रोगात पानांवरील लव अधिक असल्याने वेल जमिनीवर पसरत जात आहेत़ दमट हवामानामुळे वेलांची पाने गळत आहेत़ तर डावणीच्या प्रादुर्भावात वेल पिवळे पडत असल्याचे दिसून येत आहे़ शेंड्याची पाने बारीक होत असून फळधारणाही कमजोर होत आहे़ त्यामुळे शेतकºयांकडून चिंता व्यक्त केली जात आहे़ बहुतेक शेतकºयांकडून बुरशीनाशकांची फवारणी करण्यात येत आहे़दरम्यान, शेतकºयांकडून टरबूज लागवडीसाठी महागडे बियाणे, ठिबक, माल्चिंग पेपरसह मजुरी यावर आधीच मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करण्यात आला आहे़ रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने टरबूजाची वाढ खुंटली आहे़ तसेच त्याच्या दर्जाही खालावला असल्याचे टरबूज उत्पादक शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे़ त्यामुळे साहजिकच बाजारात अशा टरबूजाला मागणीही नसल्याने याचा सरळ परिणाम शेतकºयांच्या उत्पन्नावर होणार असल्याचे स्पष्ट होत आहे़दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून हवामानातही फारमोठे वेगवान बदल झालेले दिसून आले़ आता सध्या परिसरात तीव्र उन्ह पडत असल्याने साहकिच पिकांना पाण्याची मागणी वाढली आहे़ त्यातच दुष्काळी स्थितीमुळे दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालावत आहे़ त्यामुळे टरबूज पिकाला पुरेशा प्रमाणात पाणी देणे शक्य होत नाही़ त्यामुळे करपासारखे संधीसाधू आजारांचा पिकांवर प्रादुर्भाव होत असल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात आले आहे़परिसरातील टरबूज उत्पादक शेतकरी भारतसिंग गिरासे यांनी सांगितले की, माल्चिंग पेपरच्या सहाय्याने ठिबक सिंचनावर टरबूज पिकाची लागवड केली होती़ तसेच सुक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी व ठिबकमधून विद्राव्य खतांचा वापर केल्याने हे वेलवर्गीय पिक चांगले बहरले होते़ परंतु दमट हवामानामुळे व पाणीटंचाईमुळे पिकांवर करपा सारखे रोग होत आहेत़ त्याच प्रमाणे विविध रोगांमुळे पिकांचा दर्जा खालावत असून बाजारात अशा फळाला मागणी नसल्याने समस्या निर्माण होते़