शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीचा वाढीव मोबदला व जमीन मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : भूमिहिन झालेल्या शेतक:यांना जमिनीच्या वाढीव मोबदला अथवा सबलीकरण योजनेतून जमीन येत्या 15 ऑगस्टर्पयत देण्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : भूमिहिन झालेल्या शेतक:यांना जमिनीच्या वाढीव मोबदला अथवा सबलीकरण योजनेतून जमीन येत्या 15 ऑगस्टर्पयत देण्याचे ठोस आश्वास जिल्हा प्रशासनाने दिल्यानंतर तालुक्यातील रापापूर येथील धरणाचे रखडलेल्या कामास पुन्हा सुरूवात करण्यात येणार आहे. दरम्यान धरणाचे काम गेल्या दोन दिवसापासून सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.तळोदा तालुक्यातील रापापूर येथील लघुसिंचन प्रकल्पास 2003 मध्ये मान्यता मिळाली होती. साधारण 550 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळखला जात असतो. तथापि सुधारीत मान्यतेअभावी हा सिंचन प्रकल्प गेल्या 11 वर्षापासून रखडला होता. या प्रकल्पातून सरदार सरोवर प्रकल्पातील बाधितांनाही सिंचनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी या अटीमुळे पुन्हा धरणास 2014 मध्ये नवीन सुधारीत मान्यता देण्यात आली. त्यानंतर लघु पाटबंधारे विभागाने कामही सुरू केले. केवळ 15 ते 20 टक्के काम झाल्यानंतर पुन्हा धरणात बाधित झालेल्या रापापूर येथील शेतकरी व घरमालकांनी आपल्यास जमिनीचा वाढीव मोबदला, नवीन जमीन व घर, प्लॉट देण्याची मागणी केली होती. त्यामुळे धरणाचे कामही पाच वर्षापासून रखडले होते. मात्र काम सुरू करण्यासाठी मध्यंतरी तत्कालीन जिल्हा प्रशासन व शेतकरी यांच्यात आमदार उदेसिंग पाडवी यांनी बैठकही घडवून आणली. त्या प्रशासनाने पाठपुरावाही केला होता. परंतु त्यावर तोडगा निघू शकला नाही. विद्यमान जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घातले. त्यांनी सर्व अधिका:यांच्या ताफ्यासह बुधवारी प्रत्यक्ष रापापूर येथे भेट देवून बाधित शेतकरी व घर, प्लॉटधारकांची बैठक घेतली. बैठकीत संबंधित बाधित  शेतक:यांनी आम्हाला धरणाच्या बुडीत क्षेत्रात आलेली व शासनाने संपादीत केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला द्यावा. शिवाय घरासाठी नवीन जागा देवून शासनाच्या योजनेतून घरकुल              बांधून द्यावे, अशी मागणी केली. अन्यथा धरणाचे काम पुन्हा सुरू करू देणार नाही, असे स्पष्ट प्रशासनास सांगितले. यावर जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी मोबदला देता येणार नाही. तथापि जे शेतकरी भूमिहिन झाले आहेत त्यांना शासनाच्या सबलीकरण योजनेतून जमिनी देता येईल. शिवाय घर, प्लॉटसाठी जागाही देता येईल. येत्या 15 ऑगस्ट 2019 र्पयत यावर ठोस कार्यवाही करण्याचे आश्वासन गावक:यांना दिले. त्यासंबंधीत प्रस्ताव तयार करण्याची सूचनादेखील तळोदा आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिका:यांना दिले. त्याच बरोबर घरकुलाचे प्रस्ताव तयार करण्याची सूचनाही पंचायत समितीच्या अधिका:यांना दिले. साहजिकच शेतक:यांच्या प्रश्नाबाबत प्रशासन आणि शेतक:यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याने गेल्या 16 वर्षापासून रखडलेल्या रापापूर धरणाचा प्रश्न मार्गी लागणार असून, गेल्या दोन दिवसापासून काम सुरू करण्यात आले आहे. रापापूर येथील  धरणामुळे तळोदा परिसरातील पाण्याच्या पातळीतही मोठय़ा प्रमाणात वाढ होणार असल्याचे  शेतकरी सांगतात. या बैठकीस प्रकल्पाधिकारी जितेंद्र डुडी, तहसीलदार पंकज लोखंडे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी विजय भांगरे, गटविकास अधिकारी           सावित्री खर्डे, लघु पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता देवेंद्र जोशी, सहायक कार्यकारी अभियंता संदीप भालेराव, सरपंच भिकलाल  वळवी, माजी उपसभापती यशवंत ठाकरे यांच्यासह अधिकारी व ग्रामस्थ, शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी मंजुळे यांनी सुरूवातीला तळोदा तालुक्यातील रेवानगर व त:हावद पुनर्वसन वसाहतींना भेट देवून  वसाहतींची पाहणी केली. त:हावद येथील वसाहतधारकांनी गावातील पाणीटंचाई, दवाखाना व अंतर्गत रस्त्यांची समस्या मांडली. यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. त्यानंतर रेवानगर येथे भेट दिली. ग्रामपंचायतीत त्यांनी गावक:यांशी संवाद साधला असता अंगणवाडी, नवीन वीज कनेक्शन, सिंचन सुविधा, शाळा वर्ग खोल्या याबाबत व्यथा मांडली.