शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
2
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
3
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
4
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
5
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
6
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
7
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
8
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
9
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
10
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
11
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
12
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
13
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
14
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
15
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
16
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
17
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
18
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
19
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
20
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई

जमिनीचा वाढीव मोबदला व जमीन मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : भूमिहिन झालेल्या शेतक:यांना जमिनीच्या वाढीव मोबदला अथवा सबलीकरण योजनेतून जमीन येत्या 15 ऑगस्टर्पयत देण्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : भूमिहिन झालेल्या शेतक:यांना जमिनीच्या वाढीव मोबदला अथवा सबलीकरण योजनेतून जमीन येत्या 15 ऑगस्टर्पयत देण्याचे ठोस आश्वास जिल्हा प्रशासनाने दिल्यानंतर तालुक्यातील रापापूर येथील धरणाचे रखडलेल्या कामास पुन्हा सुरूवात करण्यात येणार आहे. दरम्यान धरणाचे काम गेल्या दोन दिवसापासून सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.तळोदा तालुक्यातील रापापूर येथील लघुसिंचन प्रकल्पास 2003 मध्ये मान्यता मिळाली होती. साधारण 550 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळखला जात असतो. तथापि सुधारीत मान्यतेअभावी हा सिंचन प्रकल्प गेल्या 11 वर्षापासून रखडला होता. या प्रकल्पातून सरदार सरोवर प्रकल्पातील बाधितांनाही सिंचनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी या अटीमुळे पुन्हा धरणास 2014 मध्ये नवीन सुधारीत मान्यता देण्यात आली. त्यानंतर लघु पाटबंधारे विभागाने कामही सुरू केले. केवळ 15 ते 20 टक्के काम झाल्यानंतर पुन्हा धरणात बाधित झालेल्या रापापूर येथील शेतकरी व घरमालकांनी आपल्यास जमिनीचा वाढीव मोबदला, नवीन जमीन व घर, प्लॉट देण्याची मागणी केली होती. त्यामुळे धरणाचे कामही पाच वर्षापासून रखडले होते. मात्र काम सुरू करण्यासाठी मध्यंतरी तत्कालीन जिल्हा प्रशासन व शेतकरी यांच्यात आमदार उदेसिंग पाडवी यांनी बैठकही घडवून आणली. त्या प्रशासनाने पाठपुरावाही केला होता. परंतु त्यावर तोडगा निघू शकला नाही. विद्यमान जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घातले. त्यांनी सर्व अधिका:यांच्या ताफ्यासह बुधवारी प्रत्यक्ष रापापूर येथे भेट देवून बाधित शेतकरी व घर, प्लॉटधारकांची बैठक घेतली. बैठकीत संबंधित बाधित  शेतक:यांनी आम्हाला धरणाच्या बुडीत क्षेत्रात आलेली व शासनाने संपादीत केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला द्यावा. शिवाय घरासाठी नवीन जागा देवून शासनाच्या योजनेतून घरकुल              बांधून द्यावे, अशी मागणी केली. अन्यथा धरणाचे काम पुन्हा सुरू करू देणार नाही, असे स्पष्ट प्रशासनास सांगितले. यावर जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी मोबदला देता येणार नाही. तथापि जे शेतकरी भूमिहिन झाले आहेत त्यांना शासनाच्या सबलीकरण योजनेतून जमिनी देता येईल. शिवाय घर, प्लॉटसाठी जागाही देता येईल. येत्या 15 ऑगस्ट 2019 र्पयत यावर ठोस कार्यवाही करण्याचे आश्वासन गावक:यांना दिले. त्यासंबंधीत प्रस्ताव तयार करण्याची सूचनादेखील तळोदा आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिका:यांना दिले. त्याच बरोबर घरकुलाचे प्रस्ताव तयार करण्याची सूचनाही पंचायत समितीच्या अधिका:यांना दिले. साहजिकच शेतक:यांच्या प्रश्नाबाबत प्रशासन आणि शेतक:यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याने गेल्या 16 वर्षापासून रखडलेल्या रापापूर धरणाचा प्रश्न मार्गी लागणार असून, गेल्या दोन दिवसापासून काम सुरू करण्यात आले आहे. रापापूर येथील  धरणामुळे तळोदा परिसरातील पाण्याच्या पातळीतही मोठय़ा प्रमाणात वाढ होणार असल्याचे  शेतकरी सांगतात. या बैठकीस प्रकल्पाधिकारी जितेंद्र डुडी, तहसीलदार पंकज लोखंडे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी विजय भांगरे, गटविकास अधिकारी           सावित्री खर्डे, लघु पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता देवेंद्र जोशी, सहायक कार्यकारी अभियंता संदीप भालेराव, सरपंच भिकलाल  वळवी, माजी उपसभापती यशवंत ठाकरे यांच्यासह अधिकारी व ग्रामस्थ, शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी मंजुळे यांनी सुरूवातीला तळोदा तालुक्यातील रेवानगर व त:हावद पुनर्वसन वसाहतींना भेट देवून  वसाहतींची पाहणी केली. त:हावद येथील वसाहतधारकांनी गावातील पाणीटंचाई, दवाखाना व अंतर्गत रस्त्यांची समस्या मांडली. यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. त्यानंतर रेवानगर येथे भेट दिली. ग्रामपंचायतीत त्यांनी गावक:यांशी संवाद साधला असता अंगणवाडी, नवीन वीज कनेक्शन, सिंचन सुविधा, शाळा वर्ग खोल्या याबाबत व्यथा मांडली.