शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

आठ दिवसात वाढले तब्बल 500 रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वाढते सार्वजनीक कार्यक्रम आणि त्यामधील नियमांचे पालन होत नसल्याने सद्या कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वाढते सार्वजनीक कार्यक्रम आणि त्यामधील नियमांचे पालन होत नसल्याने सद्या कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. गेल्या आठ दिवसात अर्थात नव्या वर्षात तब्बल ५०० रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्याच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा मानली जात आहे. जिल्हाधिकारी यांनी याबाबत संबधीत यंत्रणेला नियमांची कडक अंमबलजावणी करण्याचे निर्देश द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नव्या वर्षात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. दररोज कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. सद्य स्थितीत जिल्ह्यातील बाधितांचा आकडा हा आठ हजाराचा पार गेला आहे. शहरी भागासह ग्रामिण भागात देखील कोरोनाचा कहर सुरू आहे. निर्बंध शिथीलमुळे धोकालग्न समारंभ, सार्वजनिक समारंभ आणि बाजारातील नियमांचे उल्लंघन यामुळे कोरोना वाढत असल्याचे चित्र आहे. लग्न समारंभांमध्ये पूर्वी उपस्थितीची मर्यादा राहत होती. त्यामुळे प्रत्येकजण सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून उपस्थित राहत होता. परंतु आता उपस्थितीवर कुठलीही मर्यादा नसल्यामुळे हजारोजण सहभागी होत आहेत. अशा वेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. मास्कचा वापर नाही किंवा सॅनिटायझरचा देखील वापर केला जात नसल्याचे ठिकठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. अशीच स्थिती विविध संस्था, संघटना यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमांमध्ये देखील तीच स्थिती राहत आहे. बाजारात देखील दाटीवाटीने विक्रेत बसत असून त्यांच्याकडे खरेदीदारांची होणारी गर्दी देखील त्याला आंमत्रण देत आहे. ग्रामिण भागातही वाढता प्रादुर्भावग्रामिण भागात देखील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे. शहादा व तळोदा तालुक्याच्या सिमेवरील शहादा तालुक्यातील कलमाडी येथे तब्बल ८० पेक्षा अधीक रुग्ण आढळून आले आहेत. आता या गावातील परिस्थीत नियंत्रणा असली तरी परिसरातील गावांमध्ये संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. ग्रामस्थांनी देखील याबाबत आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. वातावरण बदलाचा परिणामवातावरण बदलाचा देखील परिणाम दिसून येत आहे. सद्या विविध साथीचे आजार सुरू आहेत. त्यात सर्दी, खोकला, डोकेदुखी, ताप या आजारांनी डोके वर काढले आहे. संसर्गीत असलेले हे आजार योग्य औषधोपचाराने तीन ते चार दिवसात बरे होत असले तरी नागरिक घाबरून जात आहे. कोरोनाच्या लक्षणाची धास्ती घेऊन अनेकजण उपचार घेण्यासाठी टाळाटाळ देखील करीत आहेत तर काहीजण थेट स्वॅब देऊन मोकळे होत आहेत. सद्या खाजगी व सरकारी दवाखान्यांमध्ये असे रुग्ण उपचारासाठी दिसून येत आहेत. 

असे वाढले रुग्ण...  ३१ डिसेंबर रोजी जिल्ह्यात सात हजार ५१७ रुग्ण होते. तर मृतांची संख्या १६८ होती. आठ दिवसातच ही संख्या ५०० ने वाढून ती आता आठ हजार ८३ इतकी झाली आहे.  आठ दिवसात दहा रुग्ण देखील दगावले आहेत. आताच्या स्थितीत कोरोनामुळे मृत्यूची संख्या १७८ वर पोहचली आहे.  येत्या काळात संक्रमणाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.