शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

एकाचवेळी दोन्ही रस्त्यांचे काम सुरू झाल्याने वाहनधारकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:58 IST

प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील तापी नदी पूल ते बसस्थानकापर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू आहे. तसेच तापी पूल ते ...

प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील तापी नदी पूल ते बसस्थानकापर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू आहे. तसेच तापी पूल ते तळोदा चौफुली मार्गे बसस्थानकापर्यंतच्या मार्गावरील रस्त्याचे काम सुरू आहे. या वेळी दोन्ही ठेकेदारांनी एकाच वेळेला काम सुरू केल्यामुळे दररोज ट्रॅफिक जाम होत आहे. शिवाय पर्यायी रस्त्याची व्यवस्थादेखील केलेली नाही. त्यामुळे वाहतूकदारांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. गुुरुवारी ॲम्बुलन्सदेखील अर्धा तास यात अडकून पडली होती.

याबाबत असे की, प्रकाशा येथील तापी पुलापासून ते तळोदा चौफुली पर्यंतच्या मार्गावर कोळदा ते सेंधवा या रस्त्याचे काम सुरू आहे. संबंधित ठेकेदाराने उशिरा का होईना काम सुरू केले. परंतु या ठिकाणी वाहनधारकांना तळोदा व शहादाकडे जाण्यासाठी पर्यायी रस्त्याची सोय नाही, शिवाय दररोज मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून, सूचना फलकाच्या अभावामुळे रोज एक अपघात होत आहे. रस्त्यांच्या कामामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळा होत असून, पर्यायी रस्त्याची सोय करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.

तसेच तापी नदी पूल ते केदारेश्वरकडील मार्गाचे देखील रुंदीकरणाचे काम सुरू आहे. प्रकाशा ते म्हसावदपर्यंतच्या मार्गाचे काम सुरू असून, त्या अंतर्गत येथील डांबरीकरण सुरू झाले आहे. खास करून प्रकाशा बसस्थानक ते केदारेश्वरपर्यंतच्या मार्गावर रस्त्याचे काम सुरू झाले आहे. याठिकाणी पर्यायी रस्ता नसल्याने वाहतूकदारांची कोंडी होत आहे.

नंदुबारकडून प्रकाशाकडे येणारे सर्वच वाहनधारकांची गैरसोय होत असून, गुरुवारी सायंकाळी चार वाजेपासून तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली होती. शिवाय या ठिकाणी वाहनधारकांना मार्ग दाखवण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी एकही पोलीस कर्मचारी नाही. ज्या ठेकेदारांना काम घेतले आहे. त्याचे ही माणसं या ठिकाणी नसल्याने वाहनांना दिशा दाखवणारा कोणी नसल्याने वाहने कुठेही घुसत असल्याने ट्रॅफिक जाम झाली होती. सायंकाळी येथून ॲम्बुलन्सलादेखील अर्धा तास मार्ग नव्हता, अशी वेळ दुसऱ्यांदा येऊ नये. यासाठी संबंधित ठेकेदाराने खबरदारी घेणे गरजेचे आहे. पर्यायी रस्ता काढणे अत्यावश्यक आहे. वाहनांना मार्ग दाखवण्यासाठी त्यांचे स्वतःचे मनुष्य त्याठिकाणी उभी करणे गरजेचे आहे.

दोन रस्त्याचे काम एकाच वेळी सुरू झाल्याने वाहनधारकाना अडचणी आहे. निदान दोघं ठेकेदाराने एकेरी मार्ग तरी सुस्थितीत सुरू ठेवावा जेणेकरून ट्रॅफिक नियमित जाम होणार नाही. असे त्यांचे म्हणणे आहे.

उडणारी धूळ त्रासदायक

तापी पूल ते तळोदा चौफुलीपर्यंतच्या मार्गावर गेल्या १५ ते २० दिवसांपासून काम सुरू झाले आहे. या ठिकाणी रस्त्याचे खोदकाम झाल्यामुळे माती उडत आहे. मोठे वाहन गेल्यानंतर उडणारी धूळ दुचाकीधारकांच्या डोळ्यात जात अपघाताच्या घटना घडत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन ठेकेदाराला समज देणे आवश्यक आहे.