शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
2
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
3
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
4
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
5
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
6
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
7
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
8
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
9
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
10
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
11
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
12
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
13
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
14
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
15
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
16
"१० वर्षांपूर्वी माझा घटस्फोट झाला, त्यानंतर...", Divorce बद्दल अपूर्वा नेमळेकरचं भाष्य, म्हणाली- "मी अजूनही सिंगल..."
17
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
18
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
19
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?

दुपारनंतर कधीही करा मूर्तीचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 13:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अनंत चर्तुदर्शीला होणारे दुपारी १२ नंतर आरती करुन चार वाजेनंतर विसर्जन करण्याची योग्य वेळ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अनंत चर्तुदर्शीला होणारे दुपारी १२ नंतर आरती करुन चार वाजेनंतर विसर्जन करण्याची योग्य वेळ असल्याचे मत ज्येष्ठ पुरोहित मधुकर जोशी यांनी मांडले आहे़ यंदा साधेपणाने होणारा गणेशोत्सव आणि घरीच बाप्पाचे विसर्जन या संदर्भात ‘पौरोहित्य’ करणाऱ्या ब्रह्मवृंदाचे मत जाणून घेतले होते़शहरासह जिल्ह्यात साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे़ यात पाचव्या, सहाव्या, सातव्या आणि नवव्या दिवशी अनेक ठिकाणी गणपती बाप्पाचे विसर्जन पूूर्ण करण्यात आले आहे़ आता फक्त काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे़ प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार मंडळांकडून मिरवणूक न काढता विसर्जन होणार आहे़ पालिकांकडून घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे़ यात घरगुती बाप्पाचे घरीच विसर्जन करावे अशा सूचना आहेत़ या पार्श्वभूमीवर शहरातील पुरोहितांसोबत चर्चा केली असता, मूर्तीचे वाहत्या पाण्यात साधेपणाने विसर्जन योग्य असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले़दरम्यान अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत याबाबत संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की, वीस वषार्पूर्वी गणपती मूर्ती दान आणि निर्माल्य दान करा ही मोहीम सुरू केली. सण-समारंभ आणि उत्सवांना पर्यावरणपूरक रूप देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या मोहिमेला सुरुवातीला विरोधाला सामोरे जावे लागले. पण हळूहळू या मोहिमेची उपयुक्तता समाजाला पटत गेली़विसर्जित मूर्ती दान आणि निर्माल्य संकलन हे समाजाने मोठ्या प्रमाणावर स्वीकारले आहे. गणपतीची मूर्ती पार्थिवाची म्हणजे पृथ्वी पासून अर्थात मातीची असावी असा धर्मशास्त्राचा संकेत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काही वर्षांपूर्वी तसा आदेश दिला आहे. त्याची अंमलबजावणी होत आहे़ अशाच स्वरूपाचा एक आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने देखील दिला आहे़ आज महानगरपालिका, नगरपालिका या क्षेत्रामध्ये सकारात्मक भूमिका याचमुळे बजावताना दिसतात. अनेक ठिकाणी निर्माल्य संकलन व विसर्जित मूर्ती संकलन केंद्रे नगरपालिकांनी सुरू केलेली आहेत. हा बदल उल्लेखनीय असल्याचे मत त्यांच्याकडून मांडण्यात आले़

गणेशमूर्ती दान ही मोहीम आज शासनाच्या धोरणाचा भाग बनली आहे. याचा संघटना म्हणून आनंद आणि समाधानाची भावना आहे. राज्यात एक कोटी कुटुंबात गणरायाची प्रतिष्ठापना करतात़ सक्तीची वर्गणी वसुली, गुलालाची उधळण, थर्माकोलचा वापर, कानठळ्या बसवणारा आवाज या अशा अनेक बाबी कोरोनाच्या प्रभावाने आपोआप टळल्या आहेत. पण याबाबतही प्रबोधन करण्याची आजही गरज जाणवते.-विनायक सावळे, सरचिटणीस, महाराष्ट्र, अंनिस

घरीच गणेश मूर्तींचे विसर्जन करणे शास्त्रसंमत नाही़ स्थापन केलेल्या मूर्तीचे वाहत्या पाण्यात विसर्जन केले पाहिजे़ यातून माती पाण्यात विरघळून ती प्रवाहित होते़ यातून पाण्याला वरदान प्राप्त होते़ घरीच किंवा थांबलेल्या पाण्यात गणपती मूर्ती विसर्जन केल्यास ते पायदळी येण्याचा धोका असतो़ यामुळे शक्यतो वाहत्या पाण्यात मूर्ती विसर्जित करणे योग्य राहिल़ दुपारी चार वाजेनंतर कधी गणेश मूर्ती विसर्जन केले जाऊ शकते़-मधुकर जोशी, ज्येष्ठ पुरोहित, नंदुरबाऱ