शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दुपारनंतर कधीही करा मूर्तीचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 13:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अनंत चर्तुदर्शीला होणारे दुपारी १२ नंतर आरती करुन चार वाजेनंतर विसर्जन करण्याची योग्य वेळ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अनंत चर्तुदर्शीला होणारे दुपारी १२ नंतर आरती करुन चार वाजेनंतर विसर्जन करण्याची योग्य वेळ असल्याचे मत ज्येष्ठ पुरोहित मधुकर जोशी यांनी मांडले आहे़ यंदा साधेपणाने होणारा गणेशोत्सव आणि घरीच बाप्पाचे विसर्जन या संदर्भात ‘पौरोहित्य’ करणाऱ्या ब्रह्मवृंदाचे मत जाणून घेतले होते़शहरासह जिल्ह्यात साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे़ यात पाचव्या, सहाव्या, सातव्या आणि नवव्या दिवशी अनेक ठिकाणी गणपती बाप्पाचे विसर्जन पूूर्ण करण्यात आले आहे़ आता फक्त काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे़ प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार मंडळांकडून मिरवणूक न काढता विसर्जन होणार आहे़ पालिकांकडून घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे़ यात घरगुती बाप्पाचे घरीच विसर्जन करावे अशा सूचना आहेत़ या पार्श्वभूमीवर शहरातील पुरोहितांसोबत चर्चा केली असता, मूर्तीचे वाहत्या पाण्यात साधेपणाने विसर्जन योग्य असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले़दरम्यान अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत याबाबत संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की, वीस वषार्पूर्वी गणपती मूर्ती दान आणि निर्माल्य दान करा ही मोहीम सुरू केली. सण-समारंभ आणि उत्सवांना पर्यावरणपूरक रूप देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या मोहिमेला सुरुवातीला विरोधाला सामोरे जावे लागले. पण हळूहळू या मोहिमेची उपयुक्तता समाजाला पटत गेली़विसर्जित मूर्ती दान आणि निर्माल्य संकलन हे समाजाने मोठ्या प्रमाणावर स्वीकारले आहे. गणपतीची मूर्ती पार्थिवाची म्हणजे पृथ्वी पासून अर्थात मातीची असावी असा धर्मशास्त्राचा संकेत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काही वर्षांपूर्वी तसा आदेश दिला आहे. त्याची अंमलबजावणी होत आहे़ अशाच स्वरूपाचा एक आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने देखील दिला आहे़ आज महानगरपालिका, नगरपालिका या क्षेत्रामध्ये सकारात्मक भूमिका याचमुळे बजावताना दिसतात. अनेक ठिकाणी निर्माल्य संकलन व विसर्जित मूर्ती संकलन केंद्रे नगरपालिकांनी सुरू केलेली आहेत. हा बदल उल्लेखनीय असल्याचे मत त्यांच्याकडून मांडण्यात आले़

गणेशमूर्ती दान ही मोहीम आज शासनाच्या धोरणाचा भाग बनली आहे. याचा संघटना म्हणून आनंद आणि समाधानाची भावना आहे. राज्यात एक कोटी कुटुंबात गणरायाची प्रतिष्ठापना करतात़ सक्तीची वर्गणी वसुली, गुलालाची उधळण, थर्माकोलचा वापर, कानठळ्या बसवणारा आवाज या अशा अनेक बाबी कोरोनाच्या प्रभावाने आपोआप टळल्या आहेत. पण याबाबतही प्रबोधन करण्याची आजही गरज जाणवते.-विनायक सावळे, सरचिटणीस, महाराष्ट्र, अंनिस

घरीच गणेश मूर्तींचे विसर्जन करणे शास्त्रसंमत नाही़ स्थापन केलेल्या मूर्तीचे वाहत्या पाण्यात विसर्जन केले पाहिजे़ यातून माती पाण्यात विरघळून ती प्रवाहित होते़ यातून पाण्याला वरदान प्राप्त होते़ घरीच किंवा थांबलेल्या पाण्यात गणपती मूर्ती विसर्जन केल्यास ते पायदळी येण्याचा धोका असतो़ यामुळे शक्यतो वाहत्या पाण्यात मूर्ती विसर्जित करणे योग्य राहिल़ दुपारी चार वाजेनंतर कधी गणेश मूर्ती विसर्जन केले जाऊ शकते़-मधुकर जोशी, ज्येष्ठ पुरोहित, नंदुरबाऱ